शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आठवणींतून त्यांची कविता वर्तमान होते

By admin | Updated: August 1, 2014 01:11 IST

त्यांचे जगणेदेखील कविता होते, त्यांचे संस्कारदेखील कविताच होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कवितेचाच ध्यास होता अन् मृत्यूनंतरदेखील कवितेनेच त्यांना लोकांच्या हृदयात अमर केले.

सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार सोहळा : प्राजक्त देशमुख यांचा सन्माननागपूर : त्यांचे जगणेदेखील कविता होते, त्यांचे संस्कारदेखील कविताच होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कवितेचाच ध्यास होता अन् मृत्यूनंतरदेखील कवितेनेच त्यांना लोकांच्या हृदयात अमर केले. कवितेतून मानवी भावनांचा शोध घेणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री डॉ.सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृती आजदेखील ताज्याच आहेत. डॉ.सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार सोहळ्याप्रसंगी याचे प्रत्यंतर आले. शंकरनगर चौक येथील राष्ट्रभाषा संकुल परिसरात श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान व वैदर्भीय लेखिका संस्था अभिव्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमप्रसंगी उदयोन्मुख कवी व नाटककार प्राजक्त देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिका आशा बगे व डॉ.कविता शनवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिक येथील अभिनेता, नाटककार , दिग्दर्शक व कवी प्राजक्त देशमुख यांचा डॉ.कविता शनवारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राजक्त देशमुख यांनी ‘कवीचा मृत्यू’ आणि ‘भर पाणी भर...’ या दर्जेदार कविता सादर केल्या. माझे एकही पुस्तक छापून आले नसतानादेखील पुरस्कार देण्यात येत आहे, हेच या पुरस्काराचे वेगळेपण आहे व यापुढे कवितांच्या माध्यमातून सर्वांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करील असे देशमुख म्हणाले.डॉ.हेर्लेकर यांच्या कवितांमधून सौदर्य झळाळते. त्यांच्यात रसिकदृष्टी होती व कवितेच्या माध्यमातून त्या भावभावनांचा शोध घ्यायच्या. त्यांच्या कवितेतून दिसणारी संवेदनशीलता तरुणांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन डॉ.शनवारे यांनी केले. आशा बगे यांनी डॉ.हेर्लेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. कवितेच्या मातीतच त्यांचा जन्म झाला होता व नवोदितांसाठी त्या हक्काच्या मार्गदर्शक होत्या या शब्दांत बगे यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. याअगोदर वैदर्भीय लेखिका संस्था अभिव्यक्तीच्या वतीने डॉ.सुलभा हेर्लेकर यांच्या ‘आरस्पानी’ या कवितासंग्रहावर आधारित ‘आरस्पानी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन कल्याणी गोखले यांनी केले. संकल्पना संहिता सुप्रिया अय्यर यांची होती. कार्यक्रमाच्या संयोजिका मनीषा साधू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शुभदा फडणवीस यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)