शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ : रवींद्र देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:56 IST

हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्दे‘हिंदू संस्कृतीची वाटचाल’यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांडे यांनी केले.हिंदू धर्म-संस्कृती मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात ‘हिंदू संस्कृतीची वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक, समाजसेवक रमेश मंत्री होते. व्यासपीठावर हिंदू धर्म संस्कृती मंदिराचे अध्यक्ष गुरुनाथ ऊर्फ बापू भागवत उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, हिंदू संस्कृतीला स्वरूप देणारे अनेक महापुरुष, संत सर्व कालखंडात उदयास आले. कोणत्याही राष्ट्राचे प्राणतत्त्व म्हणजे संस्कृती होय. राष्ट्राच्या प्रगतीची मुळे संस्कृतीत असतात. राष्ट्राला झेप घ्यायची असल्यास संस्कृतीची मुळे घट्ट असणे गरजेचे असते. त्यामुळे हीच बाब हेरुन इंग्रजांनी हिंदू संस्कृतीची मुळे कापून टाकली. प्रगती साधण्यासाठी कोणत्याही राष्ट्राला संस्कृतीची ओळख असली पाहिजे. हिंदू संस्कृती विज्ञाननिष्ठ नसून हिंदू संस्कृतीत अंधश्रद्धा असल्याचा गैरसमज पसरविण्यात येतो. परंतु हिंदू संस्कृतीसारखी विज्ञाननिष्ठ दुसरी संस्कृती नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, वैज्ञानिक रचनेनुसार हिंदू संस्कृतीची रचना झाली आहे. हिंदू संस्कृतीत अस्पृश्यतेला थारा नाही. हिंदू संस्कृतीचा इतिहास उज्वल, पराक्रमाचा आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीची सर्वोच्च शिखरे हिंदू संस्कृतीने पादाक्रांत केली आहेत. हिंदू संस्कृती सुवर्णयुग निर्माण करणारी आहे. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. देशातील देवीदेवतांचा प्रवास एकात्मतेकडे नेणारा आहे. सगळे ज्योर्तिलिंग देशभरात पसरले आहेत. एकात्म समाज जीवन घडविण्यासाठी विशाल प्रयत्न संस्कृतीत केले गेले. हिंदू संस्कृती आध्यात्मिक आहे. स्वत:चा शोध घेऊन आत्मज्ञान प्राप्त केले की सृष्टीचा अर्थ कळतो. हिंदू संस्कृती व्यक्तीला आत्मविकासाकडे नेणारी आहे. आत्मविकास झाला की माणूस व्यापक होऊन त्याचा परिणाम भौतिक विकासावर होऊन समाज विकसित होतो. परंतु पाश्चिमात्य लोक संस्कृतीचा शोध भौतिक सुखात घेतात. हिंदू संस्कृतीत १०० कोटी लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकांनी देदीप्यमान इतिहास डोळ्यापुढे ठेवून जीवन पद्धती विकसित केल्यास आपण देशाला मार्गदर्शन करू शकतो असा विश्वास व्यक्त करून २१ वे शतकही हिंदू संस्कृतीचेच राहणार असल्याचे सांगितले. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. आभार करुणा साठे यांनी मानले.

टॅग्स :Hinduहिंदूcultureसांस्कृतिक