शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

हिम्मत है मर्दा तर बनशील योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST

- रोजगार हिरावला तर निर्माण केले पर्याय : रडगाणे न गाता काळाशी देत आहेत लढा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

- रोजगार हिरावला तर निर्माण केले पर्याय : रडगाणे न गाता काळाशी देत आहेत लढा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या आणि व्यवसायही बुडाला. ज्यांच्याकडे थोडीफार शिल्लक होती, त्यांनी ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा करत वाट बघितली तर काहींनी आपल्या व्यथा सरकारदरबारी मांडत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. पण काहींनी ‘संघर्ष हेच आपले जीवन आहे’ ही गोष्ट मनाशी बांधत ‘रुकना नहीं’ असे म्हणत मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. कुणाकडे हात पसरण्यापेक्षा आपला गाडा आपणच हाकावा, ही भावना मनाशी बांधत त्यांनी पर्याय शोधले. येणारे प्रत्येक संकट हे तुमची परीक्षा असते आणि या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर पुढचे संकट सौम्य वाटतात, ही अनेक हतबल तरुणांसाठी प्रेरणा ठरतात.

प्रेसचे काम थांबले, कबाडीचे काम सुरू केले ()

गजानन जैस हा २१ वर्षीय तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताचीच म्हणून तो वर्धमाननगर येथील एका प्रेसच्या दुकानात कापड प्रेस करतो. त्यातील मिळकतीच्या भरवशावर तो आपल्या शिक्षणाचा खर्च करतो. मात्र, कोरोना संक्रमणामुळे नागरिकांनी प्रेस करण्यासाठी कपडे देणे बंद केले आणि ते दुकान बंद पडले. तेव्हा त्याने प्रारंभी एका कंपनीकडून सोयामिल्कच्या बॉटल्स रिटेलमध्ये विकण्यास सुरुवात केली. तेथूनच रिकाम्या बॉटल्स जमा करून कबाडीचे काम सुरू केले. आता तो अनेक कंपन्यांना रिकाम्या बॉटल्स पुरवतो.

कोट -

माझा खर्च मलाच चालवायचा आहे, हे घरच्या परिस्थितीवरून लहानपणापासूनच समजले होते. त्यामुळे, प्रेसचे काम बंद पडल्याने थांबणे हा गुन्हा होता, ही माझी समज. मी तात्काळ काही ज्येष्ठांच्या सहकार्याने कबाडीचे काम सुरू केले.

- गजानन जैस

नोकरी गेली तर भाजीपाला विक्री सुरू ()

कृष्णा ठाकरे हा २२ वर्षीय तरुण लॉकडाऊनपूर्वी एका कार वॉशिंग सेंटरमध्ये नोकरीला होता. त्याला तेथे १५ ते २० हजार रुपये पगार होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. घरी आई-वडील व भाऊ आहे. गेल्याच वर्षी त्याचे लग्नही झाले. त्यामुळे, त्याने कशाचाही विचार न करता घराचा गाडा चालविण्यासाठी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. हातठेल्यावर तो वस्तोवस्ती फिरतो. त्यांच्या स्वभावामुळे आणि जिद्दीमुळे ग्राहकही त्याच्यावर खूश आहेत. आज तो १५-२० हजार रुपये कमवत नाही. मात्र, येणारे उत्पन्न परिश्रमाचे असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो.

कोट -

नोकरी गेली म्हणून थांबणे, हा श्राप समजतो. जो थांबला तो गेला. माझ्या आणि कुटुंबीयांसाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहे. कुणी एक-दोन दिवस देईल. आयुष्यभर पोसणार नाही. आज संघर्ष असला तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील.

- कृष्णा ठाकरे

........................