शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

राज्यमार्ग बनलाय मृत्यूमार्ग

By admin | Updated: June 7, 2015 03:12 IST

हल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे.

शरद मिरे  भिवापूरहल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढतो आहे. जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या मार्गावर भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ विविध अपघात झाले. या अपघातांमध्ये १४ जणांना प्राणास मुकावे लागले तर, १६ जण जखमी व्हावे लागले. त्यामुळे हा मार्ग आता ‘मृत्यूमार्ग’ बनत चालला आहे. भिवापूर हे नागपूर- गडचिरोली राज्य महामार्ग क्रमांक - ९ वरील नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण! या मार्गावरून नागपूर - गडचिरोली, नागपूर - चंद्रपूर, नागपूर - भंडारा - गोंदिया व पुढे आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणारी वाहने धावतात. या वाहनांमध्ये एसटी बसेस, ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसेस, इतर प्रवासी वाहने, ट्रक, रेती, गिट्टी, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने अव्याहतपणे धावत असतात. गोसेखुर्द प्रकल्प, मोखेबर्डी व आंभोरा उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या वाहतुकीत आणखी भर पडली आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागपूर ते नागभीड (जिल्हा चंद्रपूर) या ११० कि.मी. अंतराच्या राज्यमार्गाची अक्षरश: वाट लागली आहे. मार्गावरील खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मार्ग राज्य महामार्ग असला तरी, त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे ‘ओव्हरटेक’ करण्याच्या प्रयत्नात जड वाहने पायी चालणाऱ्यांना उडविण्याच्या घटना या मार्गावर सामान्य झाल्या आहेत. या अपघातांमधील अर्धे अपघात सुसाट वेग आणि दारू पिऊन वाहने चालविल्याने झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या वाहनांच्या वेगावर सध्या कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यांच्याविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत वाहनचालकांची तपासणी केली जात नाही. सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असतो.