शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला विशेष महत्त्व

By admin | Updated: January 16, 2016 03:38 IST

राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला विशेष महत्त्व असून रामकथेचे आपल्यावर संस्कार झाले, त्याचा उपयोग राज्यकारभार करताना होतो,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : रामकथा प्रवचनस्थळाला दिली भेटनागपूर : राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला विशेष महत्त्व असून रामकथेचे आपल्यावर संस्कार झाले, त्याचा उपयोग राज्यकारभार करताना होतो, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.रामदेवबाबा टेकडी परिसरात श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीतर्फे आयोजित रामकथा कार्यक्रमात ते बोलत होते. पूज्यसंत श्री विजय कौशलजी महाराज यांचे ११ जानेवारी पासून रामकथेवर प्रवचन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रामकथा स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, गोविंदलाल अग्रवाल, खासदार अजय संचेती, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. समीर मेघे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर उपस्थित होते.ज्या-ज्या वेळी राजसत्ता भ्रष्ट झाली त्या-त्या वेळी धर्म सत्तेचा आधार घेण्यात आला. प्रभू रामचंद्रांनी सामान्यातील सामान्य माणसाचे पौरुषत्व जागृत करून असुरी शक्तीवर विजय मिळवला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला जी जबाबदारी मिळाली आहे ती यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल व कुठल्याही प्रकारे अधर्म होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पूज्यसंत श्री. विजय कौशलजी महाराज यांच्या हस्ते हनुमान कथा व भैय्या भरत या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, आज आनंदाचा दिवस असून या ऐतिहासिक रामकथेचा पाचवा दिवस आहे. योगायोगाने मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला रामकथेचा आस्वाद घेता आला. हा शुभसंदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)