शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हायकोर्ट : कथित पत्रकाराची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 21:42 IST

व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देरिव्हिजन याचिका फेटाळून लावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.शरद बाळकृष्ण देवतळे (५३) असे आरोपीचे नाव असून तो सेवाग्राम, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. प्रकरणातील माहितीनुसार, फिर्यादी सोनबा भैसारे यांनी १९९४-९५ मध्ये स्वत:च्या जमिनीवर ले-आऊट पाडून भूखंड विकले. ग्राहकांनी त्या भूखंडांवर घरे बांधली. दरम्यान, आरोपीने ले-आऊट अवैध असल्याच्या बातम्या छापण्याची व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची धमकी देऊन भैसारे यांना ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. भैसारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर २८ जुलै २००० रोजी सापळा रचण्यात आला व आरोपीला १० हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.या प्रकरणात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, सत्र न्यायालयाने दोष व दंड कायम ठेवून केवळ कारावासाची शिक्षा दोन वर्षे केली. परिणामी, आरोपीने उच्च न्यायालयात रिव्हिजन याचिका दाखल केली होती. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. महेश राय यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयJournalistपत्रकार