शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सीताबर्डीतील टनेल प्रकरणी २ आठवड्यात भूमिका मांडण्याचा हायकोर्टाचा आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 19, 2024 18:57 IST

या प्रकल्पावर विनाकारण कोट्यवधी रुपये खर्च होतील. शेकडो झाडे कापावी लागतील. त्यामुळे हा प्रकल्प थांबविणे आवश्यक आहे, असे दास यांचे म्हणणे आहे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सीताबर्डीमधील वादग्रस्त टनेल प्रकल्पासंदर्भातील प्रकरणात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला प्रतिवादी करून घेतले व या प्रकल्पावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही वादग्रस्त टनेल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (सिव्हिल लाइन्स) ते मानस चौक (सीताबर्डी) पर्यंत बांधली जाणार आहे. फ्रीडम पार्क चौकात ही टनेल महामार्गाच्या खाली राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणात महामार्ग प्राधिकरणला प्रतिवादी करून घेण्यात आले. न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते जयदीप दास यांच्या पत्राची दखल घेऊन या प्रकल्पाविरुद्ध स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.

दास यांनी ७ मार्च २०२४ रोजी न्यायालयाला पत्र लिहून या प्रकल्पाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रशासन वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली हा प्रकल्प पुढे रेटत आहे. सध्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते मानस चौकापर्यंत रोड उपलब्ध आहे. त्या रोडवर कधीच वाहतूककोंडी होत नाही. केवळ फ्रीडम पार्क चौकात वाहतूक सिग्नलमुळे वाहनांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे हा प्रकल्प आधीच्या विविध प्रकल्पांप्रमाणे वाहनचालकांना मनस्ताप देणारा ठरेल. तसेच या प्रकल्पावर विनाकारण कोट्यवधी रुपये खर्च होतील. शेकडो झाडे कापावी लागतील. त्यामुळे हा प्रकल्प थांबविणे आवश्यक आहे, असे दास यांचे म्हणणे आहे. ॲड. कुलदीप महल्ले यांनी ‘न्यायालय मित्र’ म्हणून तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.