शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

हायकोर्ट : त्या मायलेकाला पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:18 IST

धंतोली पोलिसांनी खून प्रकरणात गोवल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या शीला व मनोज मधुकर गुडधे या मायलेकाला येत्या ३० एप्रिलपर्यंत पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांनी राज्य सरकारला दिला. तसेच, दिलेल्या मुदतीत या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास दोषी अधिकाऱ्यांना या रकमेवर स्वत:च्या खिशातून ९ टक्के व्याज अदा करावे लागेल अशी तंबीही दिली.

ठळक मुद्देधंतोली पोलिसांनी खून प्रकरणात गोवले होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली पोलिसांनी खून प्रकरणात गोवल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या शीला व मनोज मधुकर गुडधे या मायलेकाला येत्या ३० एप्रिलपर्यंत पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांनी राज्य सरकारला दिला. तसेच, दिलेल्या मुदतीत या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास दोषी अधिकाऱ्यांना या रकमेवर स्वत:च्या खिशातून ९ टक्के व्याज अदा करावे लागेल अशी तंबीही दिली.गुडधे मायलेकाला सोहन यादव याच्या खून प्रकरणात गोवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत निर्दोषत्व कायम राहिल्यानंतर गुडधे मायलेकाने भरपाईसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. तसेच, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए. एच. बरैय्या यांच्यासह अन्य दोषी पोलीस अधिकारी व प्रकरणातील खरे आरोपी यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याच्या आदेशावर काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती सरकारला मागण्यात आली तर, मयताची पत्नी कुसुम हिला द्यावयाची भरपाई निश्चित झाली किंवा नाही यावर उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरणला २ मेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले.असा आहे घटनाक्रमही घटना २८ सप्टेंबर २००४ रोजी यशवंत स्टेडियमजवळ घडली होती. तो गणेश विसर्जनाचा दिवस होता. त्या दिवशी यादवसोबत मनोज गुडधे व इतरांचे जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर यादवचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुडधे मायलेकाला गोवले होते. १० ऑगस्ट २००७ रोजी सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडल्यानंतर राज्य सरकारने त्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. २४ जुलै २०१८ रोजी उच्च न्यायालयाने दोघांचे निर्दोषत्व कायम ठेवून सरकारचे अपील खारीज केले. त्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी ती याचिकादेखील खारीज झाली.ठोस पुरावे नाहीतया प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करण्यात आला होता. त्यातही गुडधे मायलेकाविरुद्ध काहीच पुरावे आढळून आले नव्हते. उलट, सीआयडीने धंतोली पोलिसच खºया आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरल्याचे ताशेरे ओढले होते. त्यानंतर दिवंगत सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे व इतरांनी गुडधे मायलेकाला वाचविण्यासाठी लढा दिला होता.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे