शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हायकोर्टाचा निर्णय : केळीबाग रोडवरील दुकानदारांची याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 22:35 IST

महाल येथील केळीबाग रोडवरील २५ दुकानदारांनी भूसंपादन प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेल्या दोन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे फेटाळून लावल्या.

ठळक मुद्देभूसंपादनावर घेतला होता आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाल येथील केळीबाग रोडवरील २५ दुकानदारांनी भूसंपादन प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेल्या दोन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे फेटाळून लावल्या. तसेच, त्यांना नियमानुसार नवीन याचिका दाखल करण्याची मुभा दिली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. केळीबाग रोड २४ मीटर रुंद केला जात असून त्याला राज्य सरकारने मंजुरी प्रदान केली आहे. हा डीपी रोड आहे. रोडसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा व भूसंपादन कायद्यांतर्गत २७ आॅगस्ट २०१९ रोजी अधिसूचना जारी केली आहे, तर त्या आधारावर विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी ३१ आॅक्टोबर २०१९ रोजी संबंधित दुकानदारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हरीशकुमार सोमियानी व इतर आणि सुनीलकुमार चौधरी व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या रोडसाठी २४ मीटरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जात आहे. त्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच, त्यांनी नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई मागितली होती. परंतु, तांत्रिक चुका केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला नाही. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.२० हजार रुपये दावा खर्चउच्च न्यायालयाने दोन्ही याचिकांमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये दावा खर्च बसवला. तसेच, ही रक्कम दोन आठवड्यात उच्च न्यायालय विधी सेवा उप-समिती नागपूरला अदा करण्याचा आदेश दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांना दणका बसला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMahalमहाल