शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

शिक्षणमंत्र्यांना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: July 21, 2015 03:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शाळा व्यवस्थापन हस्तांतरणाच्या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री विनोद

वादग्रस्त कारवाईवर स्थगिती : शाळा व्यवस्थापन हस्तांतरण प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शाळा व्यवस्थापन हस्तांतरणाच्या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दणका दिला आहे. तावडे यांनी शाळा व्यवस्थापन हस्तांतरणाचा आदेश रद्द करण्याच्या तक्रारीवर सुनावणी आयोजित केली होती. या विषयीच्या पुढील कारवाईवर स्थगिती देण्यात आली आहे. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत या प्रकरणावर तावडे यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष संबंधित रिट याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्या शिक्षण संस्थेला वरीलप्रमाणे अंतरिम दिलासा देतानाच तावडे व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले. अन्य प्रतिवादींमध्ये शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक, साईबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, मंडळाचे अध्यक्ष रमेशसिंग राजपूत व शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रसिंग राजपूत यांचा समावेश आहे. दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथील वसंतराव नाईक मागासवर्गीय शिक्षण संस्थेने ही याचिका दाखल केली आहे. साईबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील निपाणा (ता. मोटाळा) येथे संचालित करमवीर भिकामसिंग पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन याचिकाकर्त्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. हे हस्तांतरण महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन हस्तांतरण) कायदा-१९७१ अंतर्गत झाले आहे. व्यवस्थापन हस्तांतरणासाठी कायद्याचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. असे असतानाही तावडे यांनी साईबाबा मंडळाचे अध्यक्ष व शाळा मुख्याध्यापकाच्या दबावाखाली व्यवस्थापन हस्तांतरणाचा आदेश रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. तावडे यांना कायद्यांतर्गत सुनावणी घेण्याचे काहीच अधिकार नाहीत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नीता जोग तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील मीना हिवसे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी आहे पार्श्वभूमी१६ एप्रिल २०१३ रोजी संबंधित शाळेचे व्यवस्थापन याचिकाकर्त्या संस्थेकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ४ आॅक्टोबर २०१३ रोजी शिक्षण विभागाचे सचिवांनी विशिष्ट अटी व शर्तीसह व्यवस्थापन हस्तांतरणास परवानगी दिली. त्यानुसार शाळेचे व्यवस्थापन याचिकाकर्त्यांकडे सोपविण्यात आले. त्यावेळी या प्रक्रियेस कोणीच विरोध केला नाही. एक वर्षानंतर जुन्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष रमेशसिंग राजपूत व मुख्याध्यापक रवींद्रसिंग राजपूत यांनी विविध अधिकाऱ्यांकडे याचिकाकर्त्यांविरुद्ध तक्रारी केल्या. अन्य सदस्यांनीही त्यांचीच री ओढली. मुख्याध्यापकांनी पदाचा दुरुपयोग करून शाळा बंद पाडण्यासाठी १०० विद्यार्थ्यांना बदली प्रमाणपत्र दिले. १३ जुलै २०१५ रोजी तावडे यांनी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी १७ जुलै रोजी सुनावणी निश्चित केल्याचे कळविले. १५ जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांना ही माहिती दिली. परिणामी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.