शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हा तर आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:44 IST

उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांचा आवश्यक डेटा राज्य शासनाला मागविला होता.

ठळक मुद्देसंघर्ष वाहिनीच्या बैठकीतील सूर : न्यायालय, रस्त्यावर लढाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांचा आवश्यक डेटा राज्य शासनाला मागविला होता. मात्र शासनाने जाणूनबुजून कर्मचाºयांचा डेटा सादर न केल्याने न्यायालयाने बढत्या रद्द करण्याचे आदेश दिले. एकतर ही शासनाची घोडचूक आहे किंवा सरकारचाच या निर्णयाला पाठिंबा आहे. आज पदोन्नती रद्द केली, उद्या एखादा नियम लावून आरक्षणावर हात घातला जाईल. आरक्षण संपविण्यासाठी छुपा अजेंडा राबविला जात आहे का, असा सवाल संघर्ष वाहिनीतर्फे आयोजित बैठकीत करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारे दिलेल्या बढत्या रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. तूर्तास हा निर्णय तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात आला असला तरी यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. संघर्ष वाहिनीच्या पुढाकाराने विमुक्त भटक्या जमातीतील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनातर्फे रविवारी या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले. दीनानाथ वाघमारे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अ‍ॅड. वरुण कुमार, अ‍ॅड. नीतेश ग्वालबन्सी, राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, राजू चव्हाण, धनराज खडसे, धर्मपाल शेंडे, किशोर सायगन, वनिता वºहाडे, गोविंद राठोड, अनिल राऊत, शंकर फुंड, गणेश सोनुने आदी पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते.न्यायालयात पदोन्नत झालेल्या कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गेल्या १७ वर्षांपासून पदोन्नती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासन अकार्यक्षम झाले काय, असा सवाल यावेळी करण्यात आला. आरक्षण घेत असलेला समाज हा मागासवर्गीय असून वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळाले नसल्यानेच ही तरतूद करण्यात आली. त्यामुळे सरकारने हा डेटा न्यायालयात सादर करणे गरजेचे होते. मात्र तो देण्यात आला नाही. या निर्णयामुळे १३ वर्षात पदोन्नत झालेले कर्मचारी त्यांच्या पूर्वपदावर अवनत होणार असल्याने शासन प्रशासनात प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता दीनानाथ वाघमारे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भटक्या विमुक्त समाजातील पदोन्नत झालेले हजारो कर्मचारी निर्णयामुळे दहशतीत आले आहेत. सरकारचाच या धोरणाला पाठिंबा असल्याने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलेही तरी न्याय मिळेल याची शाश्वती काय, असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मात्र बढत्या रद्द झाल्या तर न्यायालयासोबत रस्त्यावरही लढाई लढू असा इशारा त्यांनी लोकमतशी बोलताना दिला.