शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

येथे मिळतो मोकळा श्वास, गावातील घाण हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:08 IST

शिरीष खोबे नरखेड : ऑक्सिजनअभावी देशभरात अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने शेकडो लोकांना कोरोनाची बाधा झाली. ...

शिरीष खोबे

नरखेड : ऑक्सिजनअभावी देशभरात अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने शेकडो लोकांना कोरोनाची बाधा झाली. मात्र नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या येनीकोणी (ता. नरखेड) या गावाने कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. ते यशस्वीही झाले. मात्र गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी या गावात तब्बल सात वर्षांपासून ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. आज या गावात सार्वजनिक जागेवर लावण्यात आलेल्या झाडांना ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. एकेकाळी दारूच्या अड्ड्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गावात आज सर्वत्र मोकळा श्वास घेता येतो. गावातील घाणही हद्दपार झाली आहे.

जेमतेम १५०० लोकसंख्या असलेल्या या गावात सात वर्षांपूर्वी समस्यांचा डोंगर उभा होता. भौतिक सुविधांचा अभाव होता. गावठी दारूचे अड्डे, सट्टा आणि जुगाराचेही गुत्थे चालायचे. जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले होते. गावातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रोगराईने डोके वर काढले होते. परंतु या गावाचा आमूलाग्र बदल झाला तो २०१४ नंतर. यासाठी ग्रामपंचायतने रहिवाशांना भौतिक सुविधा पुरविण्याचा विडाच उचलला. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता शुद्ध पिण्याचे पाणी, बंदिस्त गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, रिकाम्या जागेवर परसबाग, गावात पक्के रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड. प्रत्येक झाडाला पाणी मिळावे व पाण्याची बचत व्हावी याकरिता ड्रीप इरिगेशनचा उपयोग केला. त्यामुळे आज हे गाव पूर्णपणे बदलले आहे.

घरकुलासाठी भूमिहीनांना जमीन पट्ट्याचे वाटप करण्यात आले. गावाच्या मध्य भागातून वाहणाऱ्या नाल्यावर कोल्हापुरी बंधारे, नाल्याचे सुशोभिकरण, शेतकऱ्यांसाठी शेततलाव, पाणलोट, रेन वाॅटर हार्वेस्टिंग व्यवस्थापन, गाव हागणदारीमुक्त, रोगराईमुक्त राहण्यासाठी शौचालय बांधकाम करण्यात आले. कचरा संकलनाद्वारे त्यापासून कम्पोस्ट खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प गावात राबविण्यात आला. सुसज्ज रुग्णालय, लहान मुलांचे नियमित लसीकरण, ग्रामपंचायत कार्यालयाची प्रशस्त इमारत, सामाजिक कार्यासाठी सभामंडप, स्मार्ट शाळा व अंगणवाडी, शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता आरओचे पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वयंपाकगृह, पथदिवे, स्मशानभूमी, चांगले पांदण रस्ते, आधुनिक क्रीडांगण, खुल्या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली. अर्थात ग्रामस्थांच्या संकल्पामुळेच हे शक्यही झाले. या गावातील प्रत्येक चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यासोबतच महिला व युवतींच्या सबलीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने गौरव

येनीकोणी ग्रामपंचायतने तालुक्यापासून देशाच्या विशिष्ट पुरस्काराच्या यादीत स्वत:च्या नावाची नोंद करून घेतली. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्शग्राम तंटामुक्त पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ, पंचायत समितीचे विविध पुरस्कार, सरपंच सेवा संघाचा पुरस्कार, महाराष्ट्र सरपंच संघटनेचा पुरस्कारही पटकाविला आहे. आता केंद्र सरकारचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पटकावून या गावाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

--

कोणतेही विकासात्मक कार्य करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामस्थांना संपूर्ण कामातच सहभागी करून घेत असतो. ग्रामस्थही माझं गाव म्हणून सर्वच प्रकारे मदत करीत असतात. त्यामुळेच येनीकोणीचा आज लूक बदलला आहे.

- उषा मनीष फुके,

सरपंच, येनीकोणी