शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केरळसाठी संघाकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:49 IST

केरळ येथे आलेल्या जलप्रलयानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील युद्धस्तरावर मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून केरळकडे मदत पाठविण्यात येत असून पूरग्रस्तांच्या बचाव व पुनर्वसनासाठी सेवाभारतीतर्फे ३५० हून अधिक मदतशिबिरे उघडण्यात आली आहेत. देशभरातून पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक केरळमध्ये मदतकार्यासाठी पोहोचले असून यात नागपूर व विदर्भातील स्वयंसेवकांचादेखील समावेश आहे.

ठळक मुद्देस्वयंसेवकांकडून मदतकार्य सुरूसेवाभारतीची ३५० हून अधिक मदत शिबिरे, पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक मदतकार्यात लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळ येथे आलेल्या जलप्रलयानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील युद्धस्तरावर मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून केरळकडे मदत पाठविण्यात येत असून पूरग्रस्तांच्या बचाव व पुनर्वसनासाठी सेवाभारतीतर्फे ३५० हून अधिक मदतशिबिरे उघडण्यात आली आहेत. देशभरातून पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक केरळमध्ये मदतकार्यासाठी पोहोचले असून यात नागपूर व विदर्भातील स्वयंसेवकांचादेखील समावेश आहे.केरळमध्ये पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर तातडीने संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेथील नुकसान लक्षात घेता संघाकडून शक्य ती मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील स्वयंसेवकांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. देशभरातील स्वयंसेवकांकडून मदतकार्याला लागणार निधी, मदत साहित्य, कपडे, खाद्यपदार्थ, पाण्याच्या बॉटल, औषधे इत्यादी सामग्री युद्धस्तरावर गोळा करण्यात येत आहे. प्रांतस्तरावर याची नोंद घेण्यात येत आहे. नागपुरातूनदेखील संघ स्वयंसेवकांनी केरळकडे मदतसामग्री पाठविली आहे.सेवाभारतीतर्फे ३५० मदत शिबिरांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत पोहोचविण्यात येत आहे. सोबतच रक्त संकलन करण्यासाठी १० शिबिरे, अलपुझा जिल्ह्यात २० वैद्यकीय शिबिरे उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत चार लाखांहून अधिक ‘फूड पॅकेट्स’ वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.दुर्गम भागाकडे विशेष लक्षकेरळमधील वायनाडसारख्या जिल्हांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा, सैन्यदलाकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र दुर्गम भागामध्ये मदत पोहोचायला अडचणी येत आहे. त्यामुळे संघाने दुर्गम भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पुनर्वसनासाठीदेखील मदत करणारकेरळमधील नागरिकांना मदत करणे आमचे कर्तव्यच आहे. सध्या तेथील नागरिकांना मूलभूत साहित्य पोहोचविणे व त्यांचे आरोग्य ठीक कसे राहील, यावर भर देण्यात येत आहे. मात्र पुरामुळे केरळमधील हजारो घरे नुकसानग्रस्त झाली असून लाखो नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनासाठीदेखील आम्ही शक्य तेवढी मदत करू, अशी माहिती संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKeralaकेरळ