शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

खाऊच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत

By admin | Updated: September 21, 2015 02:59 IST

खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते.

नागपुरातील बालिकेची संवेदना : मुख्यमंत्र्यांनी केले कौतुकनागपूर : खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते. याच पैशातून आपल्यासाठी अन्न उगविणाऱ्या शेतकऱ्याला मदत व्हावी या भावनेतून नागपूरच्या आठ वर्षीय रसिका जोशी या बालिकेने मुख्यमंत्री मदतनिधीला सर्व पैसे दिले. खाऊच्या पैशांची रक्कम जरी छोटी असली तरी यातून तिने राज्यातील जनतेला आभाळभर मोठी अशी प्रेरणा दिली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नाही. बॉलिवूडस्टार आमीर खान याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री मदतनिधीसाठी चेक दिला. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर रसिकाने वडील मनोज जोशी यांना विचारणा केली असता राज्यातील शेतकरी कसे संकटात आहेत व आमीर खान हा चेक त्यांच्या मदतीसाठी देत असल्याचे त्यांनी समजावून सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे शाळेतील टिफीनमधले अन्न मी खाऊ शकते, ते संकटात असल्याचे ऐकताच रसिकाच्या बालमनालादेखील वाईट वाटले व तिने कुणालाही न सांगता साठविलेले सर्व पैसे एकत्र केले. परिचितांसोबत रविवारी मुख्यमंत्र्यांकडे गेली असता रसिकाने खाऊचे पैसे साठवून ठेवलेली ‘पिगी बँक’च त्यांना सुपूर्द केली व या रकमेतून शेतकऱ्यांना मदत करा, असे सांगितले.(प्रतिनिधी)ही मौलिक मदत : मुख्यमंत्रीबळीराजाच्या मदतीसाठी एका आठ वर्षांच्या मुलीने केलेली ही मदत मौलिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या वयातील मुलीमध्ये ही संवेदना असणे हीच फार मोठी सुखावह बाब आहे. तिने दिलेली रक्कम निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. ही रक्कम लहान असली तरी यातून समाजाला निश्चितच मोठी प्रेरणा मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.