शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

वेगळ्या विदर्भासाठी संघाचीही मदत घेणार

By admin | Updated: March 29, 2016 03:48 IST

विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त जनमानस जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

योगेश पांडे / आनंद डेकाटे ल्ल नागपूरविदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त जनमानस जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भासाठी जे सकारात्मक असतील अशा सर्वांना समर्थन मागण्यात येईल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीदेखील यासाठी मदत घेण्यात येईल, असे रोखठोक मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा देणाऱ्या अ‍ॅड. अणे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी विविध मुद्यांवर परखडपणे मते मांडली.ज्या दिवशी मी राजीनामा दिला त्याच दिवशी संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी महाराष्ट्रातून चार वेगवेगळी राज्ये निर्माण झाली पाहिजेत अशी भूमिका मांडली होती. सुयोग्य विकासासाठी लहान राज्ये व्हावीत असे मत संघश्रेष्ठींनी वारंवार मांडले आहे. विदर्भासाठी याअगोदर संघाकडे मदत मागितली होती. आता वेगळ्या विदर्भाचे आंदोलन नव्या स्वरूपात समोर येत आहे. त्यामुळे संघाकडून याबाबत नक्कीच समर्थन मागू,असे अ‍ॅड.अणे यांनी सांगितले. ‘आम आदमी पार्टी’, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हे पक्ष वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळे वेळ पडली विदर्भासाठी तर भाजपा, काँग्रेस या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात या विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेऊ, असेदेखील अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी प्रतिपादन केले.एकत्रितपणे वेगळ्या विदर्भासाठी चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. हे आंदोलन तळागाळात पोहोचले आहे. त्याला फक्त नवीन ऊर्जा देण्याची आवश्यकता आहे. लवकरच मी स्वत: संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांची समस्या सर्वश्रृत आहेच. शेतकरी संघटनांचीदेखील मदत लागणार आहे. शेतकरी संघटना वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ असलेल्या सर्व अराजकीय संस्थांनी एकत्र यावे यासाठी आवाहनदेखील करणार असल्याचे अ‍ॅड.अणे यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अ‍ॅड.मुकेश समर्थ व विदर्भ राज्य आघाडीचे सचिव संदेश सिंगलकर हे उपस्थित होते.विदर्भवादी पक्षांमध्ये समन्वय साधणार४आजच्या घडीला चार ते पाच विदर्भवादी पक्ष आहेत. काही पक्षांनी विदर्भाच्या मुद्यावरून पुढील महानगरपालिका निवडणुकांमध्ये लढण्याची घोषणादेखील केली आहे. परंतु याचा फायदा प्रस्थापित पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी मी तयार असल्याचे विधानदेखील अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केले.युवावर्गाला जोडण्यासाठी नवे तंत्र वापरणार४कुठलेही आंदोलन युवावर्गाच्या सहभागाशिवाय बळकट होत नाही हे सत्य आहे. आपल्या देशाने गेल्या काही वर्षांत हे अनुभवलेदेखील आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर तरुणाईमध्ये उत्सुकता आहे. विविध कारणांमुळे बाहेर गेलेल्या नागपूरकर तरुणांची तर वेगळा विदर्भ व्हावा हीच भावना आहे. त्यामुळे विदर्भाच्या आंदोलनात युवावर्गाला जास्तीतजास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे. चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘आप’प्रमाणेच एकविसाव्या शतकातील नव्या प्रचार व प्रसार तंत्राचा वापर करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी दिली.