शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वेगळ्या विदर्भासाठी संघाचीही मदत घेणार

By admin | Updated: March 29, 2016 03:48 IST

विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त जनमानस जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

योगेश पांडे / आनंद डेकाटे ल्ल नागपूरविदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त जनमानस जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भासाठी जे सकारात्मक असतील अशा सर्वांना समर्थन मागण्यात येईल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीदेखील यासाठी मदत घेण्यात येईल, असे रोखठोक मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा देणाऱ्या अ‍ॅड. अणे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी विविध मुद्यांवर परखडपणे मते मांडली.ज्या दिवशी मी राजीनामा दिला त्याच दिवशी संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी महाराष्ट्रातून चार वेगवेगळी राज्ये निर्माण झाली पाहिजेत अशी भूमिका मांडली होती. सुयोग्य विकासासाठी लहान राज्ये व्हावीत असे मत संघश्रेष्ठींनी वारंवार मांडले आहे. विदर्भासाठी याअगोदर संघाकडे मदत मागितली होती. आता वेगळ्या विदर्भाचे आंदोलन नव्या स्वरूपात समोर येत आहे. त्यामुळे संघाकडून याबाबत नक्कीच समर्थन मागू,असे अ‍ॅड.अणे यांनी सांगितले. ‘आम आदमी पार्टी’, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हे पक्ष वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळे वेळ पडली विदर्भासाठी तर भाजपा, काँग्रेस या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात या विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेऊ, असेदेखील अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी प्रतिपादन केले.एकत्रितपणे वेगळ्या विदर्भासाठी चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. हे आंदोलन तळागाळात पोहोचले आहे. त्याला फक्त नवीन ऊर्जा देण्याची आवश्यकता आहे. लवकरच मी स्वत: संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांची समस्या सर्वश्रृत आहेच. शेतकरी संघटनांचीदेखील मदत लागणार आहे. शेतकरी संघटना वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ असलेल्या सर्व अराजकीय संस्थांनी एकत्र यावे यासाठी आवाहनदेखील करणार असल्याचे अ‍ॅड.अणे यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अ‍ॅड.मुकेश समर्थ व विदर्भ राज्य आघाडीचे सचिव संदेश सिंगलकर हे उपस्थित होते.विदर्भवादी पक्षांमध्ये समन्वय साधणार४आजच्या घडीला चार ते पाच विदर्भवादी पक्ष आहेत. काही पक्षांनी विदर्भाच्या मुद्यावरून पुढील महानगरपालिका निवडणुकांमध्ये लढण्याची घोषणादेखील केली आहे. परंतु याचा फायदा प्रस्थापित पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी मी तयार असल्याचे विधानदेखील अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केले.युवावर्गाला जोडण्यासाठी नवे तंत्र वापरणार४कुठलेही आंदोलन युवावर्गाच्या सहभागाशिवाय बळकट होत नाही हे सत्य आहे. आपल्या देशाने गेल्या काही वर्षांत हे अनुभवलेदेखील आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर तरुणाईमध्ये उत्सुकता आहे. विविध कारणांमुळे बाहेर गेलेल्या नागपूरकर तरुणांची तर वेगळा विदर्भ व्हावा हीच भावना आहे. त्यामुळे विदर्भाच्या आंदोलनात युवावर्गाला जास्तीतजास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे. चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘आप’प्रमाणेच एकविसाव्या शतकातील नव्या प्रचार व प्रसार तंत्राचा वापर करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी दिली.