शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट आवश्यकच, पण वापर ऐच्छिक हवा!

By admin | Updated: March 4, 2016 03:02 IST

वाहतूक शाखेने हेल्मेटसक्ती करून कारवाईला सुरुवात केल्यावर पोलिसांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली.

जनमत चाचणी : वापरण्यात अडचणी येत असल्याच्याही प्रतिक्रियानागपूर : वाहतूक शाखेने हेल्मेटसक्ती करून कारवाईला सुरुवात केल्यावर पोलिसांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली. मार्च महिना जवळ आल्यामुळे पोलिसांना आपले टार्गेट पूर्ण करायचे असल्याने हेल्मेटसक्ती करण्यात आल्याचे आरोपही झाले. हे आरोप-प्रत्यारोप होत असताना नागपुरातील तिरपुडे कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेटसक्तीवर जनमत चाचणी घेतली. या चाचणीत नागरिकांनी हेल्मेट वापरण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा, अशीही भूमिका मांडली. शहरात यापूर्वीही वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या त्या वेळी हेल्मेटच्या विरोधात राजकीय पाठबळ लाभल्याने हेल्मेटसक्तीचे प्रयत्न शहरात फिसकटले. फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा वाहतूक शाखेने अचानक हेल्मेटसक्ती करून कारवाईस सुरुवात केली. मात्र यावेळी राजकीय पक्षांनी नागरिकांना हेल्मेट विकत घेण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असा पवित्रा घेतला. वाहतूक शाखेनेही प्रतिसाद देत १ मार्चपासून कारवाईला प्रारंभ केला. यादरम्यान पोलिसांवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु हेल्मेटसक्ती विरोधात सक्षम आंदोलन उभे होऊ शकले नाही. त्यामुळे दंडाच्या भीतीने का होईना, नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले. पोलिसांच्या भीतीपोटी की स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले, या विषयावर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान शहरातील विविध भागात जनमत चाचणी घेतली. यात २४०० उत्तरदात्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व सहा प्रश्नांच्या आधारे मते नोंदविण्यात आली. मोटरवाहन नियमान्वये दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराच्या अनिवार्यतेबाबत माहिती असल्याचे ९०.४१ टक्के नागरिकांनी सांगितले. हेल्मेटविना दुचाकीस्वारास गंभीर अपघात होऊ शकतो काय, या प्रश्नावर ७६.०४ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा काय? यावर ३१.१७ टक्के नागरिकांनी होकारात्मक प्रतिसाद दिला. सोबतच हेल्मेट वापरामुळे दोन्ही बाजूंना पाहणे कठीण होते, जीव गुदमरतो, अपघाताची भीती वाटते, हेल्मेट बाळगणे अडचणीचे जाते, आरोग्याच्या समस्या उद्भवतात, आदी तक्रारीही चाचणीतून पुढे आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्या पुढाकाराने डॉ. दीपक मसराम, प्रा. मनीष देशमुख, प्रा. संध्या फटिंग, प्रा. दिगंबर टुले यांच्या मार्गदर्शनात ५० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही चाचणी पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)