शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

हेल्मेट आवश्यकच, पण वापर ऐच्छिक हवा!

By admin | Updated: March 4, 2016 03:02 IST

वाहतूक शाखेने हेल्मेटसक्ती करून कारवाईला सुरुवात केल्यावर पोलिसांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली.

जनमत चाचणी : वापरण्यात अडचणी येत असल्याच्याही प्रतिक्रियानागपूर : वाहतूक शाखेने हेल्मेटसक्ती करून कारवाईला सुरुवात केल्यावर पोलिसांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली. मार्च महिना जवळ आल्यामुळे पोलिसांना आपले टार्गेट पूर्ण करायचे असल्याने हेल्मेटसक्ती करण्यात आल्याचे आरोपही झाले. हे आरोप-प्रत्यारोप होत असताना नागपुरातील तिरपुडे कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेटसक्तीवर जनमत चाचणी घेतली. या चाचणीत नागरिकांनी हेल्मेट वापरण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा, अशीही भूमिका मांडली. शहरात यापूर्वीही वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या त्या वेळी हेल्मेटच्या विरोधात राजकीय पाठबळ लाभल्याने हेल्मेटसक्तीचे प्रयत्न शहरात फिसकटले. फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा वाहतूक शाखेने अचानक हेल्मेटसक्ती करून कारवाईस सुरुवात केली. मात्र यावेळी राजकीय पक्षांनी नागरिकांना हेल्मेट विकत घेण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असा पवित्रा घेतला. वाहतूक शाखेनेही प्रतिसाद देत १ मार्चपासून कारवाईला प्रारंभ केला. यादरम्यान पोलिसांवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु हेल्मेटसक्ती विरोधात सक्षम आंदोलन उभे होऊ शकले नाही. त्यामुळे दंडाच्या भीतीने का होईना, नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले. पोलिसांच्या भीतीपोटी की स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले, या विषयावर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान शहरातील विविध भागात जनमत चाचणी घेतली. यात २४०० उत्तरदात्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व सहा प्रश्नांच्या आधारे मते नोंदविण्यात आली. मोटरवाहन नियमान्वये दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराच्या अनिवार्यतेबाबत माहिती असल्याचे ९०.४१ टक्के नागरिकांनी सांगितले. हेल्मेटविना दुचाकीस्वारास गंभीर अपघात होऊ शकतो काय, या प्रश्नावर ७६.०४ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा काय? यावर ३१.१७ टक्के नागरिकांनी होकारात्मक प्रतिसाद दिला. सोबतच हेल्मेट वापरामुळे दोन्ही बाजूंना पाहणे कठीण होते, जीव गुदमरतो, अपघाताची भीती वाटते, हेल्मेट बाळगणे अडचणीचे जाते, आरोग्याच्या समस्या उद्भवतात, आदी तक्रारीही चाचणीतून पुढे आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्या पुढाकाराने डॉ. दीपक मसराम, प्रा. मनीष देशमुख, प्रा. संध्या फटिंग, प्रा. दिगंबर टुले यांच्या मार्गदर्शनात ५० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही चाचणी पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)