शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

संघ मुख्यालयाजवळ मनोरुग्णाचा हैदोस

By admin | Updated: August 27, 2016 01:54 IST

संघ मुख्यालयाजवळच्या इमारतीवर चढून एका मनोरुग्णाने गुरुवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला.

टॉवरवर चढला तीन तास गोंधळ नागरिकांसोबत पोलिसांनाही धमक्यानागपूर : संघ मुख्यालयाजवळच्या इमारतीवर चढून एका मनोरुग्णाने गुरुवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. तब्बल तीन तास त्याने परिसरातील नागरिक आणि पोलिसांना धमक्या दिल्या. शेवटी त्याला कसेबसे ताब्यात घेऊन पोलिसांनी मनोरुग्णालयात दाखल केले. सुरेश सुदनलाल नेवारे (वय २७) असे त्याचे नाव असून, तो सिवनी (मध्यप्रदेश) जवळच्या ब्राह्मणी गावातील रहिवासी आहे.दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे संघ मुख्यालयाला अतिउच्चदर्जाचे सुरक्षा कवच आहे. हे असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. संघ मुख्यालयाजवळच्या मुधोजी मार्गावर विठ्ठलराव बावणे यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरोपी सुरेश हा रेशीमबाग परिसरात फिरतो. गुरुवारी पहाटे २ च्या सुमारास तो बावणे यांच्या निर्माणाधीन इमारतीच्या टॉवरवर (चौथ्या माळ्यावर) चढला. त्याने तेथून आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने कोतवाली पोलिसांना पहाटे ३च्या सुमारास माहिती देऊन घटनास्थळी पाठवले. पोलीस पोहचेपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मनोरुग्ण सुरेशच्या हातात लाकडाची जाडजूड फळी होती. तो खाली जमलेल्यांना शिवीगाळ करून धमक्या देत होता. पोलीस पोहचल्याचे पाहून त्याने जास्तच गोंधळ सुरू केला. इकडे (इमारतीवर) कुणी चढल्यास त्याला ठार मारेन, खाली उडी मारेन, अशी धमकीही देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याची खाली उतरण्यासाठी मनधरणी सुरू केली. त्याची नजर चुकवून काही पोलीस टॉवरवर चढले आणि त्यांनी पहाटे ५ वाजता सुरेशला खाली उतरवले. त्यानंतर त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तो मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्याविरुद्ध मनोरुग्ण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. सुरेशने ठाण्यातही गोंधळ सुरू केला. तो काहीही करू शकतो, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी त्याला मनोरुग्णालयात दाखल केले. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह संघ मुख्यालयावर यापूर्वी दहशतवादी हल्ला झाला असून, अनेक दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर संघ मुख्यालय आणि संघ प्रमुख आहेत. त्यामुळे संघ मुख्यालयाला आत-बाहेर त्रिस्तरीय उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. असे असताना या संवेदनशील स्थळाच्या बाजूलाच एका मनोरुग्णाने तब्बल तीन तास गोंधळ घातल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.