शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर ...

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर जाण्याच्या घाईमध्ये हे ट्रक्स अशा तऱ्हेने वेग वाढवतात की अन्य लहान वाहन चालकांना आपली वाहने बाजूला थांबवून ते जाण्याची वाट बघावी लागत आहे. १५ दिवसापूर्वी शहराच्या आतून जाणाऱ्या ट्रकची संख्या कमी होती. मात्र, आता शहरातील रस्त्यांवर ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, विविध पोलीस स्टेशन्सच्या समोरून वायूवेगाने धावणाऱ्या या जडवाहतुकीवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. या अशा अवसानघातकी धोरणामुळे आगामी काळात गंभीर अपघातांचा संशय बळावला आहे.

मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर गेल्या तीन दिवसांपासून काही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ट्रक रोखत आहेत आणि चालानही फाडत आहेत. जोवर एका ट्रकचे चालान बनविल्या जाते, तोवर अनेक ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत पुढे निघाले असतात. त्याच अनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध मार्गांवर ट्रक वाहतुकीचा आढावा घेतला. यात वर्धा रोड, मानकापूरकडे जाणारा मार्ग, अमरावती मार्ग व कामठी रोड शहरातून जाणाऱ्या जडवाहतुकीची संख्या जास्त दिसून आली. यापूर्वी मध्यरात्रीनंतर ट्रक शहरातील रस्त्यांवर दिसत होते. मात्र, आता रात्री १० वाजतापासूनच शहरात ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे शहरातील काही उड्डाण पुलांवर अशा जड वाहतुकीवर निर्बंध आहेत. मात्र, पोलिसांच्या सुस्तीचा लाभ घेत उड्डाण पुलांवरून ट्रक धावताना दिसून येतात. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर पुलावरूनही ट्रक वाहतूक होत आहे. शहिद गोवारी उड्डाण पुलावरून अनेक ट्रक एलआयसी चौकापासून सुरू होणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गे शहराच्या बाहेर पडतात. एलआयसी चौकाजवळ तयार झालेल्या उड्डाण पुलावर ट्रक्सच्या गर्दीमुळे रात्री ट्रॅफिक जाम होत असल्याचेही निदर्शनास येते.

----------

बॉक्स...

पथकर वाचविण्याचा खेळ

नियमांनुसार विना कारण जड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. ट्रकच्या रहदारीसाठी अनेक रिंग रोड बनविण्यात आले आहेत. मात्र, ट्रक चालक पथकर वाचविण्यासाठी शहरात ट्रक घेऊन प्रवेश करत आहेत.

----------

बॉक्स...

उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्राचे ट्रॅफिक विभागाला विस्मरण

जड वाहतुकीमुळे होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका सादर झाली होती. याचिकेवरील सुनावणीमध्ये विना काम केवळ अंतर व पथकर वाचविण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना मोटर वाहन कायदा १९८८चे कलम १८४ अंतर्गत १००० रुपये व कलम १७९ अंतर्गत ५०० रुपये दंड ठोठावण्याचे राज्याच्या गृहविभागाने मान्य केले होते. अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र, काळ पुढे गेल्यावर गृह विभाग व ट्रॅफिक विभागाला आपल्याच अधिसूचनेचा विसर पडलेला आहे.

-------------

बाॅक्स....

कायद्याचे उल्लंघन हा गुन्हा

नियमांनुसार विना काम शहरात जड वाहनांनी प्रवेश करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. ज्या उड्डाण पुलांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी आहे, तेथून वाहतूक करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे असे मत ॲड. फिरदौस मिर्जा यांनी व्यक्त केले.

..........