शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर ...

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर जाण्याच्या घाईमध्ये हे ट्रक्स अशा तऱ्हेने वेग वाढवतात की अन्य लहान वाहन चालकांना आपली वाहने बाजूला थांबवून ते जाण्याची वाट बघावी लागत आहे. १५ दिवसापूर्वी शहराच्या आतून जाणाऱ्या ट्रकची संख्या कमी होती. मात्र, आता शहरातील रस्त्यांवर ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, विविध पोलीस स्टेशन्सच्या समोरून वायूवेगाने धावणाऱ्या या जडवाहतुकीवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. या अशा अवसानघातकी धोरणामुळे आगामी काळात गंभीर अपघातांचा संशय बळावला आहे.

मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर गेल्या तीन दिवसांपासून काही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ट्रक रोखत आहेत आणि चालानही फाडत आहेत. जोवर एका ट्रकचे चालान बनविल्या जाते, तोवर अनेक ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत पुढे निघाले असतात. त्याच अनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध मार्गांवर ट्रक वाहतुकीचा आढावा घेतला. यात वर्धा रोड, मानकापूरकडे जाणारा मार्ग, अमरावती मार्ग व कामठी रोड शहरातून जाणाऱ्या जडवाहतुकीची संख्या जास्त दिसून आली. यापूर्वी मध्यरात्रीनंतर ट्रक शहरातील रस्त्यांवर दिसत होते. मात्र, आता रात्री १० वाजतापासूनच शहरात ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे शहरातील काही उड्डाण पुलांवर अशा जड वाहतुकीवर निर्बंध आहेत. मात्र, पोलिसांच्या सुस्तीचा लाभ घेत उड्डाण पुलांवरून ट्रक धावताना दिसून येतात. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर पुलावरूनही ट्रक वाहतूक होत आहे. शहिद गोवारी उड्डाण पुलावरून अनेक ट्रक एलआयसी चौकापासून सुरू होणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गे शहराच्या बाहेर पडतात. एलआयसी चौकाजवळ तयार झालेल्या उड्डाण पुलावर ट्रक्सच्या गर्दीमुळे रात्री ट्रॅफिक जाम होत असल्याचेही निदर्शनास येते.

----------

बॉक्स...

पथकर वाचविण्याचा खेळ

नियमांनुसार विना कारण जड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. ट्रकच्या रहदारीसाठी अनेक रिंग रोड बनविण्यात आले आहेत. मात्र, ट्रक चालक पथकर वाचविण्यासाठी शहरात ट्रक घेऊन प्रवेश करत आहेत.

----------

बॉक्स...

उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्राचे ट्रॅफिक विभागाला विस्मरण

जड वाहतुकीमुळे होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका सादर झाली होती. याचिकेवरील सुनावणीमध्ये विना काम केवळ अंतर व पथकर वाचविण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना मोटर वाहन कायदा १९८८चे कलम १८४ अंतर्गत १००० रुपये व कलम १७९ अंतर्गत ५०० रुपये दंड ठोठावण्याचे राज्याच्या गृहविभागाने मान्य केले होते. अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र, काळ पुढे गेल्यावर गृह विभाग व ट्रॅफिक विभागाला आपल्याच अधिसूचनेचा विसर पडलेला आहे.

-------------

बाॅक्स....

कायद्याचे उल्लंघन हा गुन्हा

नियमांनुसार विना काम शहरात जड वाहनांनी प्रवेश करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. ज्या उड्डाण पुलांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी आहे, तेथून वाहतूक करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे असे मत ॲड. फिरदौस मिर्जा यांनी व्यक्त केले.

..........