शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर ...

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर जाण्याच्या घाईमध्ये हे ट्रक्स अशा तऱ्हेने वेग वाढवतात की अन्य लहान वाहन चालकांना आपली वाहने बाजूला थांबवून ते जाण्याची वाट बघावी लागत आहे. १५ दिवसापूर्वी शहराच्या आतून जाणाऱ्या ट्रकची संख्या कमी होती. मात्र, आता शहरातील रस्त्यांवर ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, विविध पोलीस स्टेशन्सच्या समोरून वायूवेगाने धावणाऱ्या या जडवाहतुकीवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. या अशा अवसानघातकी धोरणामुळे आगामी काळात गंभीर अपघातांचा संशय बळावला आहे.

मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर गेल्या तीन दिवसांपासून काही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ट्रक रोखत आहेत आणि चालानही फाडत आहेत. जोवर एका ट्रकचे चालान बनविल्या जाते, तोवर अनेक ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत पुढे निघाले असतात. त्याच अनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध मार्गांवर ट्रक वाहतुकीचा आढावा घेतला. यात वर्धा रोड, मानकापूरकडे जाणारा मार्ग, अमरावती मार्ग व कामठी रोड शहरातून जाणाऱ्या जडवाहतुकीची संख्या जास्त दिसून आली. यापूर्वी मध्यरात्रीनंतर ट्रक शहरातील रस्त्यांवर दिसत होते. मात्र, आता रात्री १० वाजतापासूनच शहरात ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे शहरातील काही उड्डाण पुलांवर अशा जड वाहतुकीवर निर्बंध आहेत. मात्र, पोलिसांच्या सुस्तीचा लाभ घेत उड्डाण पुलांवरून ट्रक धावताना दिसून येतात. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर पुलावरूनही ट्रक वाहतूक होत आहे. शहिद गोवारी उड्डाण पुलावरून अनेक ट्रक एलआयसी चौकापासून सुरू होणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गे शहराच्या बाहेर पडतात. एलआयसी चौकाजवळ तयार झालेल्या उड्डाण पुलावर ट्रक्सच्या गर्दीमुळे रात्री ट्रॅफिक जाम होत असल्याचेही निदर्शनास येते.

----------

बॉक्स...

पथकर वाचविण्याचा खेळ

नियमांनुसार विना कारण जड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. ट्रकच्या रहदारीसाठी अनेक रिंग रोड बनविण्यात आले आहेत. मात्र, ट्रक चालक पथकर वाचविण्यासाठी शहरात ट्रक घेऊन प्रवेश करत आहेत.

----------

बॉक्स...

उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्राचे ट्रॅफिक विभागाला विस्मरण

जड वाहतुकीमुळे होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका सादर झाली होती. याचिकेवरील सुनावणीमध्ये विना काम केवळ अंतर व पथकर वाचविण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना मोटर वाहन कायदा १९८८चे कलम १८४ अंतर्गत १००० रुपये व कलम १७९ अंतर्गत ५०० रुपये दंड ठोठावण्याचे राज्याच्या गृहविभागाने मान्य केले होते. अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र, काळ पुढे गेल्यावर गृह विभाग व ट्रॅफिक विभागाला आपल्याच अधिसूचनेचा विसर पडलेला आहे.

-------------

बाॅक्स....

कायद्याचे उल्लंघन हा गुन्हा

नियमांनुसार विना काम शहरात जड वाहनांनी प्रवेश करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. ज्या उड्डाण पुलांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी आहे, तेथून वाहतूक करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे असे मत ॲड. फिरदौस मिर्जा यांनी व्यक्त केले.

..........