शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर ...

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर जाण्याच्या घाईमध्ये हे ट्रक्स अशा तऱ्हेने वेग वाढवतात की अन्य लहान वाहन चालकांना आपली वाहने बाजूला थांबवून ते जाण्याची वाट बघावी लागत आहे. १५ दिवसापूर्वी शहराच्या आतून जाणाऱ्या ट्रकची संख्या कमी होती. मात्र, आता शहरातील रस्त्यांवर ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, विविध पोलीस स्टेशन्सच्या समोरून वायूवेगाने धावणाऱ्या या जडवाहतुकीवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. या अशा अवसानघातकी धोरणामुळे आगामी काळात गंभीर अपघातांचा संशय बळावला आहे.

मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर गेल्या तीन दिवसांपासून काही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ट्रक रोखत आहेत आणि चालानही फाडत आहेत. जोवर एका ट्रकचे चालान बनविल्या जाते, तोवर अनेक ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत पुढे निघाले असतात. त्याच अनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध मार्गांवर ट्रक वाहतुकीचा आढावा घेतला. यात वर्धा रोड, मानकापूरकडे जाणारा मार्ग, अमरावती मार्ग व कामठी रोड शहरातून जाणाऱ्या जडवाहतुकीची संख्या जास्त दिसून आली. यापूर्वी मध्यरात्रीनंतर ट्रक शहरातील रस्त्यांवर दिसत होते. मात्र, आता रात्री १० वाजतापासूनच शहरात ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे शहरातील काही उड्डाण पुलांवर अशा जड वाहतुकीवर निर्बंध आहेत. मात्र, पोलिसांच्या सुस्तीचा लाभ घेत उड्डाण पुलांवरून ट्रक धावताना दिसून येतात. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर पुलावरूनही ट्रक वाहतूक होत आहे. शहिद गोवारी उड्डाण पुलावरून अनेक ट्रक एलआयसी चौकापासून सुरू होणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गे शहराच्या बाहेर पडतात. एलआयसी चौकाजवळ तयार झालेल्या उड्डाण पुलावर ट्रक्सच्या गर्दीमुळे रात्री ट्रॅफिक जाम होत असल्याचेही निदर्शनास येते.

----------

बॉक्स...

पथकर वाचविण्याचा खेळ

नियमांनुसार विना कारण जड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. ट्रकच्या रहदारीसाठी अनेक रिंग रोड बनविण्यात आले आहेत. मात्र, ट्रक चालक पथकर वाचविण्यासाठी शहरात ट्रक घेऊन प्रवेश करत आहेत.

----------

बॉक्स...

उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्राचे ट्रॅफिक विभागाला विस्मरण

जड वाहतुकीमुळे होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका सादर झाली होती. याचिकेवरील सुनावणीमध्ये विना काम केवळ अंतर व पथकर वाचविण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना मोटर वाहन कायदा १९८८चे कलम १८४ अंतर्गत १००० रुपये व कलम १७९ अंतर्गत ५०० रुपये दंड ठोठावण्याचे राज्याच्या गृहविभागाने मान्य केले होते. अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र, काळ पुढे गेल्यावर गृह विभाग व ट्रॅफिक विभागाला आपल्याच अधिसूचनेचा विसर पडलेला आहे.

-------------

बाॅक्स....

कायद्याचे उल्लंघन हा गुन्हा

नियमांनुसार विना काम शहरात जड वाहनांनी प्रवेश करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. ज्या उड्डाण पुलांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी आहे, तेथून वाहतूक करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे असे मत ॲड. फिरदौस मिर्जा यांनी व्यक्त केले.

..........