शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ब्रिटिशकालीन पुलावरील जड वाहतूक धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : शहरालगत वाहणाऱ्या कन्हान नदीवरील १४७ वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल माेडकळीस आला असला तरी त्यावरून जड ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : शहरालगत वाहणाऱ्या कन्हान नदीवरील १४७ वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल माेडकळीस आला असला तरी त्यावरून जड व ओव्हरलाेड वाहनांची रहदारी सुरूच आहे. या जड वाहतुकीमुळे भविष्यात माेठी जीवितहानी हाेण्याची शक्यता असल्याने ही वाहतूक कायम बंद करण्याची मागणी केली जात आहे.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला हा पूल महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दाेन राज्यांना जाेडणारा आहे. ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती सन १८७४ मध्ये केली असून, १४७ वर्षे वय असलेल्या या पुलाचे आयुष्यही संपत आले आहे. हा पूल माेडकळीस आला असला तरी त्यावरून जड व ओव्हरलाेड वाहनांची २४ तास रहदारी सुरूच असते. या पुलाच्या काॅलमचे सिमेंटचे पापुद्रे व सळाकी उघड्या पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक धाेकादायक ठरण्याची शक्यता बळावली आहे.

संभाव्य धाेका टाळण्यासाठी भारतीय जनता युवा माेर्चाच्या कन्हान शहरातील कार्यकर्त्यांनी ठाणेदार विलास काळे यांना निवेदन देऊन ही जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात शैलेश शेळकी, रिंकेश चवरे, संजय रंगारी, मयूर माटे, सचिन वासनिक, वृषभ बावणकर, अमन घोडेस्वार यांचा समावेश हाेता.

...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली

या पुलाचे आयुष्य व सध्याची अवस्था लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वीच या पुलावरून जड वाहतूक कायमची बंद करावी, असे आदेश दिले हाेते. त्याअनुषंगाने पुलाच्या बाजूला तशा आशयाचा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, या आदेशाची पायमल्ली केली जात असताना पाेलीस व बांधकाम विभागातील अधिकारी काहीही कारवाई करायला तयार नाहीत.