शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

अतिपावसाने साेयाबीनची प्रत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची योग्य वाढ, योग्यवेळी उघाड आणि पाऊस यांचा समतोल साधला गेला होता. यामुळे यंदा अनेकांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरले होते. अशातच सप्टेंबर महिना उजाडला आणि अतिपावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणीच फेरले. उमरेड विभागात केवळ दोन दिवस वगळता तब्बल २४ दिवस पाऊस झाला. या अतिपावसामुळे आता सोयाबीनची प्रत खालावली असून, चकाकीसुद्धा गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच दाणे काळवंडले, खराब, मातीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना चौफेर मार बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

असंख्य शेतकरी भरपावसात काही तासांची उघडीप मिळताच कशीबशी सोयाबीन पिकाची कापणी करत आहेत. शिवाय मजुरीचा दरही ३५० ते ४०० रुपये झाला असून, आधीच प्रचंड नुकसान आणि त्यात कापणीचे आकाशाला भिडलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

सध्या संपूर्ण पानगळ होत, सोयाबीन कापणीला आले आहे. अशातच पाऊस आणखी लांबला तर उरलेसुरले चार आणे पीकही मातीत जाईल, अशी बिकट परिस्थिती आहे. दुसरीकडे शेंगांमधूनच कोंब निघण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. उत्पादनात घट, दाणा सडका आणि कोंब निघाल्याने अधिक फटका अशा गंभीर परिस्थितीत सोयाबीन उत्पादक सापडला आहे. सततच्या पावसामुळे कापणी कधी करायची, असाही प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

.....

उगवण क्षमता?

अतिपावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली असल्याने आता गुणवत्ता शाबूत असलेल्या सोयाबीनचे उत्पादन अशक्य झाले आहे. शिवाय यंदाच्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमतासुद्धा कमी राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पुढील हंगामाच्या पेरणीसाठी चांगलीच अडचण निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

.....

पाऊसच पाऊस

परिसरात १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत उमरेड तालुक्यात ८३४.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केवळ १९ आणि २० सप्टेंबर हे दोन दिवस वगळता इतर दिवशी पावसाचे आगमन झाले आहे. शिवाय अजूनही वादळी पावसाच्या शक्यतेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

....

कचराच अधिक

सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील तण नियोजनाचे गणितसुद्धा बिघडले आहे. यामुळे आता अनेकांच्या शेतात सोयाबीनऐवजी कचराच अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पावसामुळे ओलावा अधिक पकडून राहिल्याने कापणीसाठी शेतमजुरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

....

कापणीनंतर मळणी करा

सोयाबीनची कापणी करताना अर्धा दिवस कापणी आणि अर्धा दिवस उचल असे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शिवाय बरेच दिवस शेतात ढीग लावून ठेवू नये. कापणीनंतर त्यावर पुन्हा पाऊस झाल्यास अशा सोयाबीनचा ढीगही लावणे अशक्य होणार आहे. कापणीनंतर मळणीदेखील काही दिवसातच करावी, असाही सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

.....

आशेचा किरण

उमरेड विभागात सोयाबीन उत्पादकांचे हाल-बेहाल झाल्याचे चित्र आहे. ही कठीण परिस्थिती अनेकदा ‘लोकमत’ने मांडली. दरम्यान, हवालदिल शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाकडून खेचून आणणार, असा शब्द आमदार राजू पारवे यांनी दिला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसून येत आहे.