शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

अतिपावसाने साेयाबीनची प्रत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची योग्य वाढ, योग्यवेळी उघाड आणि पाऊस यांचा समतोल साधला गेला होता. यामुळे यंदा अनेकांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरले होते. अशातच सप्टेंबर महिना उजाडला आणि अतिपावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणीच फेरले. उमरेड विभागात केवळ दोन दिवस वगळता तब्बल २४ दिवस पाऊस झाला. या अतिपावसामुळे आता सोयाबीनची प्रत खालावली असून, चकाकीसुद्धा गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच दाणे काळवंडले, खराब, मातीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना चौफेर मार बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

असंख्य शेतकरी भरपावसात काही तासांची उघडीप मिळताच कशीबशी सोयाबीन पिकाची कापणी करत आहेत. शिवाय मजुरीचा दरही ३५० ते ४०० रुपये झाला असून, आधीच प्रचंड नुकसान आणि त्यात कापणीचे आकाशाला भिडलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

सध्या संपूर्ण पानगळ होत, सोयाबीन कापणीला आले आहे. अशातच पाऊस आणखी लांबला तर उरलेसुरले चार आणे पीकही मातीत जाईल, अशी बिकट परिस्थिती आहे. दुसरीकडे शेंगांमधूनच कोंब निघण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. उत्पादनात घट, दाणा सडका आणि कोंब निघाल्याने अधिक फटका अशा गंभीर परिस्थितीत सोयाबीन उत्पादक सापडला आहे. सततच्या पावसामुळे कापणी कधी करायची, असाही प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

.....

उगवण क्षमता?

अतिपावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली असल्याने आता गुणवत्ता शाबूत असलेल्या सोयाबीनचे उत्पादन अशक्य झाले आहे. शिवाय यंदाच्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमतासुद्धा कमी राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पुढील हंगामाच्या पेरणीसाठी चांगलीच अडचण निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

.....

पाऊसच पाऊस

परिसरात १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत उमरेड तालुक्यात ८३४.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केवळ १९ आणि २० सप्टेंबर हे दोन दिवस वगळता इतर दिवशी पावसाचे आगमन झाले आहे. शिवाय अजूनही वादळी पावसाच्या शक्यतेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

....

कचराच अधिक

सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील तण नियोजनाचे गणितसुद्धा बिघडले आहे. यामुळे आता अनेकांच्या शेतात सोयाबीनऐवजी कचराच अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पावसामुळे ओलावा अधिक पकडून राहिल्याने कापणीसाठी शेतमजुरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

....

कापणीनंतर मळणी करा

सोयाबीनची कापणी करताना अर्धा दिवस कापणी आणि अर्धा दिवस उचल असे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शिवाय बरेच दिवस शेतात ढीग लावून ठेवू नये. कापणीनंतर त्यावर पुन्हा पाऊस झाल्यास अशा सोयाबीनचा ढीगही लावणे अशक्य होणार आहे. कापणीनंतर मळणीदेखील काही दिवसातच करावी, असाही सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

.....

आशेचा किरण

उमरेड विभागात सोयाबीन उत्पादकांचे हाल-बेहाल झाल्याचे चित्र आहे. ही कठीण परिस्थिती अनेकदा ‘लोकमत’ने मांडली. दरम्यान, हवालदिल शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाकडून खेचून आणणार, असा शब्द आमदार राजू पारवे यांनी दिला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसून येत आहे.