शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अतिपावसाने साेयाबीनची प्रत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची योग्य वाढ, योग्यवेळी उघाड आणि पाऊस यांचा समतोल साधला गेला होता. यामुळे यंदा अनेकांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरले होते. अशातच सप्टेंबर महिना उजाडला आणि अतिपावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणीच फेरले. उमरेड विभागात केवळ दोन दिवस वगळता तब्बल २४ दिवस पाऊस झाला. या अतिपावसामुळे आता सोयाबीनची प्रत खालावली असून, चकाकीसुद्धा गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच दाणे काळवंडले, खराब, मातीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना चौफेर मार बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

असंख्य शेतकरी भरपावसात काही तासांची उघडीप मिळताच कशीबशी सोयाबीन पिकाची कापणी करत आहेत. शिवाय मजुरीचा दरही ३५० ते ४०० रुपये झाला असून, आधीच प्रचंड नुकसान आणि त्यात कापणीचे आकाशाला भिडलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

सध्या संपूर्ण पानगळ होत, सोयाबीन कापणीला आले आहे. अशातच पाऊस आणखी लांबला तर उरलेसुरले चार आणे पीकही मातीत जाईल, अशी बिकट परिस्थिती आहे. दुसरीकडे शेंगांमधूनच कोंब निघण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. उत्पादनात घट, दाणा सडका आणि कोंब निघाल्याने अधिक फटका अशा गंभीर परिस्थितीत सोयाबीन उत्पादक सापडला आहे. सततच्या पावसामुळे कापणी कधी करायची, असाही प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

.....

उगवण क्षमता?

अतिपावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली असल्याने आता गुणवत्ता शाबूत असलेल्या सोयाबीनचे उत्पादन अशक्य झाले आहे. शिवाय यंदाच्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमतासुद्धा कमी राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पुढील हंगामाच्या पेरणीसाठी चांगलीच अडचण निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

.....

पाऊसच पाऊस

परिसरात १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत उमरेड तालुक्यात ८३४.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केवळ १९ आणि २० सप्टेंबर हे दोन दिवस वगळता इतर दिवशी पावसाचे आगमन झाले आहे. शिवाय अजूनही वादळी पावसाच्या शक्यतेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

....

कचराच अधिक

सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील तण नियोजनाचे गणितसुद्धा बिघडले आहे. यामुळे आता अनेकांच्या शेतात सोयाबीनऐवजी कचराच अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पावसामुळे ओलावा अधिक पकडून राहिल्याने कापणीसाठी शेतमजुरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

....

कापणीनंतर मळणी करा

सोयाबीनची कापणी करताना अर्धा दिवस कापणी आणि अर्धा दिवस उचल असे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शिवाय बरेच दिवस शेतात ढीग लावून ठेवू नये. कापणीनंतर त्यावर पुन्हा पाऊस झाल्यास अशा सोयाबीनचा ढीगही लावणे अशक्य होणार आहे. कापणीनंतर मळणीदेखील काही दिवसातच करावी, असाही सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

.....

आशेचा किरण

उमरेड विभागात सोयाबीन उत्पादकांचे हाल-बेहाल झाल्याचे चित्र आहे. ही कठीण परिस्थिती अनेकदा ‘लोकमत’ने मांडली. दरम्यान, हवालदिल शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाकडून खेचून आणणार, असा शब्द आमदार राजू पारवे यांनी दिला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसून येत आहे.