शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने साेयाबीनची प्रत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची योग्य वाढ, योग्यवेळी उघाड आणि पाऊस यांचा समतोल साधला गेला होता. यामुळे यंदा अनेकांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरले होते. अशातच सप्टेंबर महिना उजाडला आणि अतिपावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणीच फेरले. उमरेड विभागात केवळ दोन दिवस वगळता तब्बल २४ दिवस पाऊस झाला. या अतिपावसामुळे आता सोयाबीनची प्रत खालावली असून, चकाकीसुद्धा गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच दाणे काळवंडले, खराब, मातीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना चौफेर मार बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

असंख्य शेतकरी भरपावसात काही तासांची उघडीप मिळताच कशीबशी सोयाबीन पिकाची कापणी करत आहेत. शिवाय मजुरीचा दरही ३५० ते ४०० रुपये झाला असून, आधीच प्रचंड नुकसान आणि त्यात कापणीचे आकाशाला भिडलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

सध्या संपूर्ण पानगळ होत, सोयाबीन कापणीला आले आहे. अशातच पाऊस आणखी लांबला तर उरलेसुरले चार आणे पीकही मातीत जाईल, अशी बिकट परिस्थिती आहे. दुसरीकडे शेंगांमधूनच कोंब निघण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. उत्पादनात घट, दाणा सडका आणि कोंब निघाल्याने अधिक फटका अशा गंभीर परिस्थितीत सोयाबीन उत्पादक सापडला आहे. सततच्या पावसामुळे कापणी कधी करायची, असाही प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

.....

उगवण क्षमता?

अतिपावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली असल्याने आता गुणवत्ता शाबूत असलेल्या सोयाबीनचे उत्पादन अशक्य झाले आहे. शिवाय यंदाच्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमतासुद्धा कमी राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पुढील हंगामाच्या पेरणीसाठी चांगलीच अडचण निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

.....

पाऊसच पाऊस

परिसरात १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत उमरेड तालुक्यात ८३४.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केवळ १९ आणि २० सप्टेंबर हे दोन दिवस वगळता इतर दिवशी पावसाचे आगमन झाले आहे. शिवाय अजूनही वादळी पावसाच्या शक्यतेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

....

कचराच अधिक

सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील तण नियोजनाचे गणितसुद्धा बिघडले आहे. यामुळे आता अनेकांच्या शेतात सोयाबीनऐवजी कचराच अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पावसामुळे ओलावा अधिक पकडून राहिल्याने कापणीसाठी शेतमजुरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

....

कापणीनंतर मळणी करा

सोयाबीनची कापणी करताना अर्धा दिवस कापणी आणि अर्धा दिवस उचल असे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शिवाय बरेच दिवस शेतात ढीग लावून ठेवू नये. कापणीनंतर त्यावर पुन्हा पाऊस झाल्यास अशा सोयाबीनचा ढीगही लावणे अशक्य होणार आहे. कापणीनंतर मळणीदेखील काही दिवसातच करावी, असाही सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

.....

आशेचा किरण

उमरेड विभागात सोयाबीन उत्पादकांचे हाल-बेहाल झाल्याचे चित्र आहे. ही कठीण परिस्थिती अनेकदा ‘लोकमत’ने मांडली. दरम्यान, हवालदिल शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाकडून खेचून आणणार, असा शब्द आमदार राजू पारवे यांनी दिला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसून येत आहे.