शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘ये दिल मांगे मोअर’

By admin | Updated: September 30, 2016 03:19 IST

पठाणकोट, उरी येथे घडलेल्या घटनेनंतर नागरिकांसोबतच माजी सैनिकांमध्ये एक रोष होता.

सेनेच्या कारवाईचे माजी सैनिकांकडून स्वागत : पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी ठोस कारवाईच आवश्यकनागपूर : पठाणकोट, उरी येथे घडलेल्या घटनेनंतर नागरिकांसोबतच माजी सैनिकांमध्ये एक रोष होता. बुधवारी मध्यरात्री सेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पठाणकोट आणि उरी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानला दिलेला एक मोठा झटका आहे. कदाचित याचा परिणाम युद्धात होऊ शकतो. त्यासाठीही आपले सैन्य तयार आहे. सरकारकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सैन्यामध्ये जोश आहे. संपूर्ण देशवासीयांचेही सेनेला पाठबळ आहे. भारत पाकिस्तानला नक्कीच धूळ चारणार अशी भावना माजी सैन्य अधिकारी व सैनिकांनी व्यक्त केली आहे.माजी सैनिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भारतीय सेनेच्या कारवाईमुळे आमच्यात उत्साह संचारला असल्याचे सांगत, ‘खुन से खेलेंगे होली, अगर वतन मुश्किल में है, सरफरोशी की तमन्ना, अब भी हमारे दिल में है’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कारगील युद्धाच्या वेळी शहीद विक्रम बत्रा यांनी ‘ये दिल मांगे मोअर’ असा देशभराला संदेश दिला होता. पाकिस्तानला आता वठणीवर आणण्यासाठी अशाच आणखी कारवायांची आवश्यकता असल्याचे मत माजी सैनिकांनी व्यक्त केले. पंतप्रधानांचे कौतुकपाकिस्तानविरोधात पहिल्यांदाच ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचेदेखील यावेळी माजी सैनिकांनी कौतुक केले. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लगेच कारवाई योग्य ठरली नसती. मोदी यांनी अगोदर कूटनीती वापरत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडले व योग्य वेळ साधून हा हल्ला केला. यामुळे सैन्याचे मनोबलदेखील वाढले असल्याचे माजी सैनिकांनी सांगितले.उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजलीवारंवार होत असलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक शहीद होत होते. सेनेमध्ये पाकिस्तानविरोधात एक खदखद निर्माण झाली होती. अशात उरी येथे झालेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. अनेक जवान जखमी झाले. त्यामुळे जवानांचा असंतोष अधिकच वाढला होता. त्यामुळे सरकार आणि सेनेकडून अशा कारवाईची अपेक्षा होती. देशाच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर असा अटॅक अपेक्षित होता. त्यावेळीही सेनेत जोश होता. पाकिस्तानच्या बॉर्डरवर आम्ही सज्ज होतो. परंतु सरकारचा आदेश नव्हता. त्यानंतर पठाणकोटचा हल्ला आता उरीचा यामुळे सैनिकांचे मनोबल ढासळले होते. सरकारने योग्य निर्णय घेत सर्जिकल आॅपरेशन राबवून सेनेचे मनोबल वाढविले आहे. सोबतच उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. -सिद्धार्थ मंडपे, माजी सैनिक पाकिस्तानवर दबाव निर्माण होईल. सर्जिकल आॅपरेशन हे युद्ध नाही, तर देशाच्या सीमेवर देशविरोधी दिसून आलेल्या घडामोडीवर हल्ला करून सीमेचे संरक्षण करण्याकरिता उचललेले पाऊल आहे. एलओसीवर होणारी ही प्रक्रिया नियमित आहे. यातून पाकिस्तानला धडा घ्यावा लागेल. कारण पाकिस्तानची युद्ध करायची ताकद नाही. छुपे हल्ले करून तो देशाची आंतरिक सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होता. या हल्ल्यामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण होईल. सरकारने पहिल्यांदा सेनेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र दिल्यामुळे सेनेला हे शक्य झाले आहे. देशाने एक साहसी पाऊल उचलले आहे. -निलकंठ व्यास, माजी सैनिक पाकिस्तानला समजेल असेच प्रत्युत्तर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेला सर्जिकल हल्ला स्वागतार्हच आहे. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. उरी येथे भारतीय सैन्याच्या शिबिरावर झालेल्या हल्ल्यानंतर या पावलाचीच गरज होती. यामुळे पाकिस्तानला दणका बसला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या ७० वर्षातील पाकिस्तानवर केलेला हा पहिला अशा प्रकारचा हल्ला आहे.-कर्नल (निवृत्त)अभय पटवर्धन सैनिकांसाठी देशाने एकत्र यावेभारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून जो पराक्रम दाखविला आहे, ते कौतुकास्पद आहे. देशातील आजी-माजी सैन्य अधिकारी-जवान, नागरिक यांना प्रचंड आनंद झाला आहे. देश या पावलाची प्रतीक्षा करत होता. परंतु उरी येथील हल्ल्यानंतर लगेच प्रत्युत्तर देणे योग्य ठरले नसते. केंद्र शासनाने अगोदर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी केली. त्यानंतर योग्य नियोजन करून हे आॅपरेशन पार पाडले. या हल्ल्यामुळे सीमेवर निश्चितच तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धाची ठिणगी कधीपण पेटू शकते. अशा परिस्थितीत सर्व राजकीय विरोध विसरून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल उंचावेल यासाठी संपूर्ण देश एक झाला पाहिजे. पाकिस्तान यावर शांत राहणार नाही. परंतु धमक्या देण्यापलीकडे आजच्या तारखेत हा देश काहीही करू शकत नाही. आजचा दिवस सर्व जवानांसाठी अभिमानाचाच दिवस आहे. -कर्नल (निवृत्त)सुनील देशपांडे