शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३१ रोजी सुनावणी

By admin | Updated: May 27, 2016 02:49 IST

नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी तीन आरोपी व्यापाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून,

डब्बा व्यापारप्रकरण : सरकारचे उत्तर दाखलनागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी तीन आरोपी व्यापाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून, त्यांच्या अर्जांवर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयात ३१ मे रोजी सुनावणी होणार आहे. दिनेश भंवरलाल सारडा रा. रामदासपेठ, अंकित ओमप्रकाश मालू रा. वाठोडा आणि विनय ओमप्रकाश अग्रवाल रा. सूर्यनगर, अशी आरोपी व्यापाऱ्यांची नावे आहेत. या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जातच तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने नकार देऊन सरकार पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यावर गुरुवारी सरकार पक्षाकडून न्यायालयात उत्तर दाखल करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले जावे, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने तिघांच्याही अर्जावर ३१ मे रोजी सुनावणी निश्चित केली आहे. १३ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी विविध व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घालून कोट्यवधींचा डब्बा व्यापार उजेडात आणला होता. २० जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४६८, ४७१, ४७७ (अ), ४२०, १२० (ब), २०१ आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या कलम २३(१)अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी कुशल किशोर लद्दड, विजय चंदूलाल गोखलानी, नीरज ओमप्रकाश अग्रवाल, प्रीतेश सुरेशकुमार लखोटिया यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आलेली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेल्या या तीन आरोपींव्यतिरिक्त बरेच आरोपी फरार आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि अतिरिक्त सरकारी वकील अजय माहूरकर काम पाहत आहेत.(प्रतिनिधी)