शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली घेऊन ‘ते’ निघाले आपल्या गावाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 02:15 IST

अँकर । मारुती चितमपल्ली यांचे नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान - सत्कार समारंभात रंगला आठवणींचा हृद्यसोहळा

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मराठीला नव्या शब्दांची देणगी देणाऱ्यात जर कुणाचे नाव आदराने घेतले जात असेल तर ते मारुती चितमपल्ली यांचे. निसर्गवाटेत अवघे आयुष्य घालविणाºया या मूळ तेलुगू भाषिक निसर्गऋषीने तब्बल एक लाख शब्दमोती मराठी मातीला दिले. वन, वन्यजीव, वनस्पतींची खडान्खडा माहिती त्यांना आहे. त्यांचे हे सगळे संशोधन विदर्भातच झाले असल्याने त्यांना विदर्भाने ‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली दिली. निसर्गाचा हा सगळा खजिना घेऊन म्हणा वा भविष्याकडे सोपवून ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत.

वनांच्या अभ्यासात बरीच वर्षे विदर्भात घालविल्यानंतर मारुती चितमपल्ली रविवारी सकाळी नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत. आपले उर्वरित आयुष्य ते सोलापूरमध्ये आपल्या पुतण्याकडे घालविणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी शेवाळकर कुटुंबीयांनी विदर्भवासीयांच्या वतीने त्यांच्या प्रस्थान सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ लेखिका आशाताई बगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी चितमपल्ली यांनी विदर्भातील संशोधनविषयक बºयाच आठवणींना उजाळा दिला. पक्षी, वन्यप्राणी म्हणा वा वनस्पती यांवरील लिखाण असो वा भविष्यवेधी विद्यार्थ्यांना शिकवणी असो यावर पुसटशा आठवणी ते व्यक्त करत होते. नागझिरा येथील वनसंपत्तीने मोहिनी घातल्यावरच आपल्या लिखाणाला नवे वळण मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माहिती विभाग संचालक हेमराज बागूल, आशुतोष शेवाळकर, विजयाताई शेवाळकर, मनीषा शेवाळकर उपस्थित होते.जंगल वाचवणे आता तुमच्या हातात!विदर्भातील वनसंपदेवर भरभरून प्रेम करणाºया मारुती चितमपल्ली यांना विदर्भ सोडणे अत्यंत अवघड आहे, हे त्यांच्या एका भावनिक वाक्यावरून स्पष्ट होत होते. एवढे जंगल कुठेच नाही. ते विदर्भात आहे, ते सांभाळता आले पाहिजे. जंगल वाचवणे आता तुमच्या हातात आहे, या एका वाक्यावरूनच त्यांचा जंगलाविषयीचा लळा लक्षात येतो.