शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

‘तो’ थकला, व्याकूळ झाला होता...

By admin | Updated: July 25, 2016 02:24 IST

मागील चार दिवसांपासून वन विभाग ‘जय’चा युद्धपातळीवर शोध घेत आहे. मात्र त्याचा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही.

वन विभाग अस्वस्थ : ‘जय’ गेला कुठे ? जीवन रामावत नागपूर मागील चार दिवसांपासून वन विभाग ‘जय’चा युद्धपातळीवर शोध घेत आहे. मात्र त्याचा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. जर ‘जय’सोबत काही वाईट घडले तर आपली खैर नाही, याची आता त्यांना चाहूल लागली आहे. यामुळे अख्खा वन विभाग अस्वस्थ झाला आहे. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींचीसुद्धा चिंता वाढली आहे. वन्यजीवप्रेमींना ‘जय’ची प्रतीक्षा नागपूर : वन विभागाच्या मते, ‘जय’ हा १८ एप्रिल २०१६ पासून गायब झाला आहे. या दिवसापासून वन विभागाचा त्याच्याशी असलेला संपर्क तुटला आहे. दुसरीकडे त्याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ रोजी घेण्यात आलेला ‘जय’चा शेवटचा बोलका फोटो ‘लोकमत’कडे प्राप्त झाला आहे. तो या दिवशी पवनी वनपरिक्षेत्रातील फेटाळा बीटात सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास काही पर्यटकांना दिसून आला होता. यावेळी वन्यजीवप्रेमी पंकज देशमुख व नितीन रहाटे यांनी तब्बल पाऊण तास ‘जय’ला पाहण्याचा आनंद लुटला; शिवाय त्यांनी ‘जय’चे सुमारे २०० पेक्षा अधिक फोटोग्राफसुद्धा काढले. या वन्यजीवप्रेमींच्या मते, ‘जय’ हा त्या दिवशी फारच थकलेला आणि कमजोर दिसून येत होता, शिवाय त्याचे पोट खोल गेले होते. त्यावरून तो अनेक दिवसांपासून उपाशी असावा, असा भास होत होता. कदाचित भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याची चाल मंदावली होती. कदाचित यामुळेच ‘जय’च्या चेहऱ्यावरील तो ताजेपणा, त्याचा रुबाब, त्याची चाल आणि ती डरकाळी कुठे तरी हरविल्यासारखे भासत होते, असेही पंक ज देशमुख व नितीन रहाटे यांनी सांगितले. त्याचवेळी वन विभाग हा ‘जय’ सुरक्षित आहे, असा प्रत्यक्ष दावा करीत आहे. निश्चितच ‘जय’ हा कुठेही असो, मात्र तो सुरक्षित असावा, अशीच सर्व वन्यजीवप्रेमींची इच्छा आहे. कारण ‘जय’च्या चाहत्यांचा फार मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्याला पाहण्यासाठी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांच्या रांगा लागत होत्या. शिवाय त्याला कुणी एकदा बिघतले की ‘जय’ ला पुन्हापुन्हा पाहण्याचा मोह आवरू शकत नव्हता आणि त्यामुळेच पर्यटक हा पुन्हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या वाटेला लागत होता. यामुळेच अवघ्या तीन वर्षांत उमरेड-कऱ्हांडला संपूर्ण विदर्भातील पर्यटकांच्या आवडीचे प्रथम ‘डेस्टिनेशन’ ठरले होते. पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. शिवाय यातून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खजिन्यात कोट्यवधीची भर पडली. त्यामुळे ‘जय’ हा पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाला दुहेरी चिंतेत सोडून गेला आहे. (प्रतिनिधी) आता उमरेड-कऱ्हांडलाचे ‘ग्लॅमर’ कसे टिकणार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून ‘जय’ बाहेर होताच या अभयारण्याला मिळालेले ‘ग्लॅमर’ आता कसे टिकवायचे, हा आता पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने मागील तीन वर्षे ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. शिवाय त्याच्यावर २४ तास वॉच ठेवण्यासाठी त्याला सर्वप्रथम १५ सप्टेंबर २०१५ रोजी रेडिओ कॉलरने सज्ज केले. मात्र ती कॉलर लगेच दोन महिन्यांत बंद पडली. यानंतर १७ मार्च २०१६ रोजी ‘जय’ ला पुन्हा नवीन कॉलर लावली. मात्र दुर्दैवाने तीसुद्धा महिनाभरात म्हणजे, १८ एप्रिल रोजी ‘फेल’ झाली. आणि कदाचित ‘जय’ ने सुद्धा हीच संधी शोधून अचानक उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला रामराम ठोकला.