शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

म्हणे मेळघाटात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा अमरावतीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा अमरावतीच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. या कालावधीत चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले. या मृत्यूंचे नेमके कारण काय याचे उत्तर कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत आदिवासी विकास विभागाकडे विचारणा केली होती. २०१७ पासून मेळघाटात किती अर्भक, बालमृत्यू झाले, कुपोषणामुळे किती मृत्यू झाले आदी प्रश्न त्यांनी विचारले होते. मेळघाट क्षेत्र हे ३२३ गावांनी बनले असून, तेथील लोकसंख्या ३ लाख ३ हजार ४८० इतकी आहे. त्यातील २ लाख ३५ हजार २४१ नागरिक आदिवासी आहेत. अमरावतीच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मार्च २०१७ ते ३१ मे २०२१ या कालावधीत १ हजार ४४९ बाल व अर्भक मृत्यू झाले. यात ० ते २८ दिवसांच्या वयोगटातील नवजात बाळांची संख्या ७४२ इतकी होती, तर ४३२ अर्भकांचा मृत्यू झाला. १ ते ६ या वयोगटातील ३४५ बालकांचा मृत्यू झाला. यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे झालेला नसून, सर्व मृत्यू विविध आजारांमुळे झाले, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करीत असले तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वर्ष-अर्भक मृत्यू - नवजात अर्भक मृत्यू (० ते २८ दिवस)-बालमृत्यू (१ ते ६ वर्ष)

मार्च २०१७ - १६० - १२० - १२७

मार्च २०१८ - १५१ - ६६ - ५१

मार्च २०१९ - १४४ - १०१ - ६४

मार्च २०२० - १२२ - ७४ - ५०

मार्च २०२१ - १५५ - ५७ - ४१

मे २०२१ - १० - १४ - १२