शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

तो लढला देशासाठी, ती लढली पोटासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:13 IST

१९४४ ला नागपूर जिल्ह्यातील कामठी गोराबाजार येथील एक युवकही भारतीय वायुसेनेत भरती झाला. बन्सीलाल जानोरे त्याचे नाव. त्यावेळी देशसेवेने तो झपाटलेला होता. तो देशासाठी लढला, युद्धात गोळीही लागली, तरीही तो लढत राहिला.

ठळक मुद्देदुसऱ्या महायुद्धातील सैनिकाच्या विधवेने जिंकली संघर्षमय लढाईजिल्हा प्रशासन करणार मदत

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/मनसर : देशासाठी दुसऱ्या महायुद्धात अनेक योद्ध्यांनी प्राणांची आहुती दिली. सरकारच्या आवाहनाला साद देत १९४४ ला नागपूर जिल्ह्यातील कामठी गोराबाजार येथील एक युवकही भारतीय वायुसेनेत भरती झाला. बन्सीलाल जानोरे त्याचे नाव. त्यावेळी देशसेवेने तो झपाटलेला होता. तो देशासाठी लढला, युद्धात गोळीही लागली, तरीही तो लढत राहिला. कालांतराने या योद्ध्याचे आजारपणामुळे निधन झाले.मात्र देशसेवेसाठी लढण्याची प्रेरणा देणारी त्याची पत्नी आजतागायत पेन्शनसाठी लढा दिला. कमलाबाई जानोरे त्यांचे नाव. ८१ वर्षांच्या या अशिक्षितबाईने गावातील ग्रामपंचायतचा आधार घेत पेन्शनची लढाई लढली आणि ती जिंकलीही. या लढाईत नागपूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांना बळ दिले.१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ या काळात दुसरे महायुद्ध झाले. या महायुद्धात सहभागी होण्यासाठी बन्सीलाल जानोरे १३ सप्टेंबर १९४४ साली भारतीय वायुसेनेत भरती झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सरकारने त्यांना ३ मे १९४८ रोजी सेवामुक्त केले. यानंतर ते नागपूर येथे भाड्याने राहत होते. त्या काळात सैनिकांना पेन्शन मिळत नसल्याने त्यांनी स्वत:चा उदरनिर्वाह भाड्याच्या खोलीत राहून अर्धांगिनीसोबत केला.कालांतराने आजारपणामुळे १६ सप्टेंबर १९८३ ला बन्सीलाल यांचे निधन झाले. या घटनेला आज ३५ वर्षे झाली आहेत. मुलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर पोटाच्या लढाईसाठी कमलाबाई कधी फळ तर कधी भाजीपाला विकून दोेनवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी काम करीत राहिल्या. मात्र वय साथ देत नसल्याने त्यांनी १० वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे भावाकडे आश्रय घेतला. कधी भावाकडे तरकधी मनसर येथील वृद्धाश्रमात कमलाबाई राहातात. आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्यासाठी सरकारची मदत मिळावी यासाठी कमलाबाईने नातेवाईकांच्या मदतीने नागपूर जिल्ह्यात सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. यात त्यांच्याजवळ असलेल्या एका प्रमाणपत्राच्या आधारावर या महिलेला सरकारची कोणतेही मदत झाली नसल्याची बाब जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे कमलाबाईच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आणि तो जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरही केला. लवकरच कमलाबाईला थकबाकीसह सरकारची मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी दिली.वन रँक वन पेन्शनवर देशात वादंग उठले असताना नागपूर जिल्हा प्रशासनाने या महिलेच्या हक्कासाठी केलेली लढाईही तिकतीच प्रेरणादायी आहे.

आजाराने ग्रस्त कमलाबाईकमलाबाई सध्या आजाराने ग्रस्त आहेत. कधी मनसर येथील वृद्धाश्रमात तरी कधी भावाच्या घरी जीवन जगणाऱ्या कमलाबाई गुडघ्याच्या आजारासह अनेक व्याधीने त्रस्त आहेत. सरकारी मदत मिळाल्यानंतर त्यांना चांगले उपचार मिळाल्यास मदत होईल, असा विश्वास कमलाबाईचे भाऊ ओमकुमार चौकसे यांनी व्यक्त केला.

अशी मिळेल मदतदुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या विधवांना सरकारचे आर्थिक साहाय्य मिळत असल्याचे कमलाबाई आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीन वर्षांपूर्वी कळले. त्यानुसार कमलाबाईने मदतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले.राज्य सरकारने २९ डिसेंबर १९८९ पासून दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत पदमुक्त झालेल्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या विधवांसाठी दरमहा मासिक निवृत्ती वेतनाची योजना लागू केली आहे. १ आॅक्टोबर १९८९ पासून ही योजना कार्यान्वित झाली असून, सुरुवातीच्या काळात निवृत्ती वेतनाची ही रक्कम दरमहा ३०० रुपये होती. सरकारने यात वेळोवेळी वाढ केली. त्यानुसार ही रक्कम आता प्रतिमहा तीन हजार रुपये इतकी मिळते.१ आॅक्टोबर १९८९ ते आतापर्यंतच्या कालावधीचा विचार करता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपूर यांच्या कार्यालयानुसार कमलाबाई यांना सरकारकडून ४ लाख ३७ हजार ७५५ रुपये इतकी थकबाकी मिळणार आहे. यासोबतच तीन हजार रुपये नियमित निवृत्ती वेतनही मिळेल.

टॅग्स :Governmentसरकार