शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

समाजातील शेवटचा घटक जागृत करणार एचसीबीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:29 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहिती नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी एक किरण पुढे सरसावली आहे. ती किरण आहे, हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर.

ठळक मुद्देचौकट तोडली : विदर्भातील दुर्गम गावांत घेतली जाणार शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहिती नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी एक किरण पुढे सरसावली आहे. ती किरण आहे, हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर.ही संघटना आतापर्यंत एका विशिष्ट चौकटीतच कार्य करीत होती. ती वकिलांच्या समस्यांबाहेर क्वचितच गेली असेल. या चौकटीला पहिल्यांदा तोडण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या व्यापक नेतृत्वाने वकिलांना समाजातील दुर्लक्षित घटकाच्या मदतीस धावून जाण्यासाठी प्रेरित केले आहे. हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविला जाणार आहे. दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ११ चमू तयार करण्यात येणार असून प्रत्येक चमूत १० वकिलांचा समावेश राहणार आहे. या चमू एकाचवेळी १० ठिकाणी शिबिरे आयोजित करतील. एका ठिकाणच्या शिबिरामध्ये आजूबाजूची सर्व गावे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परिणामी एकाचवेळी १५० ते २०० गावांतील नागरिकांच्या समस्या सोडविता येतील. शिबिर दोन ते तीन तास चालेल. या शिबिरामुळे नागरिकांच्या कुटुंब, जमीन, भरपाई इत्यादीशी संबंधित छोट्याछोट्या समस्या जागेवरच सुटतील. मोठ्या समस्या सोडविण्यासाठी कोठे जायचे, काय करायचे, कुणाला भेटायचे याचे योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण कमी होईल व पक्षकारांची आर्थिक बचत होईल असा संघटनेला विश्वास आहे. या उपक्रमात स्थानिक वकील व विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करून घेण्याची संघटनेची योजना आहे. गडचिरोली हा राज्यातील सर्वात दुर्लक्षित जिल्हा आहे. त्यामुळे या उपक्रमाची सुरुवात या जिल्ह्यातून केली जाणार आहे. येत्या २१ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १० दुर्गम भागांमध्ये शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. देणग्यांतून मिळणारी रक्कम या उपक्रमावर खर्च केली जाणार आहे.न्या. भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटनमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते शुक्रवारी या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना न्या. गवई यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. वकिलांकडे पक्षकारांचे शोषण करणारा प्राणी म्हणून पाहिले जाते. या उपक्रमामुळे ही ओळख पुसली जाईल असा विश्वास आहे. वकील स्वत:चा व्यवसाय बाजूला ठेवून व पदरचा खर्च करून हा उपक्रम राबविणार आहेत. ही भावना अभिनंदनास्पद आहे. नागरिकांना हक्काची जाणीव झाली तरच ते न्यायाची मागणी करतील. अनेक समस्या स्थानिक स्तरावरच सुटू शकतात. त्यासाठी न्यायालयात जाण्याची गरज नसते. अशा शिबिरांमुळे अधिकारी नागरिकांना वेठीस धरण्याचे धाडस करणार नाहीत. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर ही असा उपक्रम राबविणारी देशातील पहिली संघटना आहे. इतरांसाठी ही संघटना आदर्श ठरली आहे. देशातील वकिलांच्या अन्य संघटनाही असे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपतील असे मत न्या. गवई यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.ही सामाजिक बांधिलकी - अ‍ॅड. किलोरहा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राबविण्यात येणार आहे. वकील राज्यघटनेचे अभ्यासक रहात असल्यामुळे त्यांना अधिकारांची पूर्ण जाणीव असते. परिणामी, ते समाजातील दुर्लक्षित घटकाला त्यांच्या अधिकारांबाबत अवगत करण्याचे कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतात. वकिलांनी हा उपक्रम स्वत:ची जबाबदारी समजून यशस्वी करावा असे आवाहन अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले. ग्रंथालय प्रभारी अ‍ॅड. उमेश बिसेन यांनी संचालन केले तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले. अन्य पदाधिकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल