शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

फेरीवाल्यांना सार्वजनिक रोड बंद करण्याचा अधिकार नाही, हायकोर्टाचे निरीक्षण 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: November 15, 2023 17:31 IST

रोड मोकळा ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची

नागपूर : राज्यातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये अनियंत्रित फेरीवाल्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. स्थायी व्यवसायापुढेही अडथळे निर्माण होतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशाच एका प्रकरणात आवश्यक आदेश जारी करताना फेरीवाल्यांना सार्वजनिक रोड व फुटपाथ बंद करण्याचा अधिकार नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. तसेच, सार्वजनिक रोड वाहतुकीसाठी व फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी प्रशासनाची आहे, याकडे लक्ष वेधले.

चंद्रपूरमधील रघुवंशी व्यापार संकुल असोसिएशन व ३० स्थायी व्यापाऱ्यांनी अनियंत्रित फेरीवाल्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली. चंद्रपूरच्या हृदयस्थळी असलेल्या आझाद मैदान उद्यानाजवळील सार्वजनिक रोडवर रविवार बाजार भरतो. फेरीवाले शनिवारी रात्रीपासूनच रोडचा ताबा घेतात. रविवारी संबंधित रोड दोन्ही बाजूने बंद केला जातो. त्यामुळे नागरिकांना रोडचा वापर करता येत नाही. परिणामी, ते या परिसरातील स्थायी दुकाने, रुग्णालये इत्यादी ठिकाणी जाऊ शकत नाही. महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व वाहतूक पोलिस निरीक्षक ही समस्या दूर करण्यासाठी काहीच उपाययोजना करीत नाही. त्यामुळे फेरीवाले अनियंत्रितपणे वागतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

केवळ रोडच्या उत्तरेकडे भरणार बाजार

या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, संबंधित रविवार बाजार केवळ रोडच्या उत्तर बाजूला भरवावा, बाजारात केवळ लायसन्सधारक फेरीवाले व्यवसाय करतील याकडे लक्ष द्यावे, दक्षिणेकडील रोड वाहतुक व पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवावा आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आदेश प्रशासनाला दिले. ही व्यवस्था केवळ येत्या ८ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावी. त्यानंतर पुढील आवश्यक आदेश दिले जातील, असे देखील स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. हरीश ठाकूर तर, महानगरपालिकेतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयhawkersफेरीवालेHigh Courtउच्च न्यायालय