शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

फेरीवाल्यांना सार्वजनिक रोड बंद करण्याचा अधिकार नाही, हायकोर्टाचे निरीक्षण 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: November 15, 2023 17:31 IST

रोड मोकळा ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची

नागपूर : राज्यातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये अनियंत्रित फेरीवाल्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. स्थायी व्यवसायापुढेही अडथळे निर्माण होतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशाच एका प्रकरणात आवश्यक आदेश जारी करताना फेरीवाल्यांना सार्वजनिक रोड व फुटपाथ बंद करण्याचा अधिकार नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. तसेच, सार्वजनिक रोड वाहतुकीसाठी व फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी प्रशासनाची आहे, याकडे लक्ष वेधले.

चंद्रपूरमधील रघुवंशी व्यापार संकुल असोसिएशन व ३० स्थायी व्यापाऱ्यांनी अनियंत्रित फेरीवाल्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली. चंद्रपूरच्या हृदयस्थळी असलेल्या आझाद मैदान उद्यानाजवळील सार्वजनिक रोडवर रविवार बाजार भरतो. फेरीवाले शनिवारी रात्रीपासूनच रोडचा ताबा घेतात. रविवारी संबंधित रोड दोन्ही बाजूने बंद केला जातो. त्यामुळे नागरिकांना रोडचा वापर करता येत नाही. परिणामी, ते या परिसरातील स्थायी दुकाने, रुग्णालये इत्यादी ठिकाणी जाऊ शकत नाही. महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व वाहतूक पोलिस निरीक्षक ही समस्या दूर करण्यासाठी काहीच उपाययोजना करीत नाही. त्यामुळे फेरीवाले अनियंत्रितपणे वागतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

केवळ रोडच्या उत्तरेकडे भरणार बाजार

या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, संबंधित रविवार बाजार केवळ रोडच्या उत्तर बाजूला भरवावा, बाजारात केवळ लायसन्सधारक फेरीवाले व्यवसाय करतील याकडे लक्ष द्यावे, दक्षिणेकडील रोड वाहतुक व पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवावा आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आदेश प्रशासनाला दिले. ही व्यवस्था केवळ येत्या ८ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावी. त्यानंतर पुढील आवश्यक आदेश दिले जातील, असे देखील स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. हरीश ठाकूर तर, महानगरपालिकेतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयhawkersफेरीवालेHigh Courtउच्च न्यायालय