शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

हापूसची तहान बैंगनफल्लीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:39 IST

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत.

ठळक मुद्देकळमन्यात आंब्याची आवक वाढली हापूस महागच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत. त्यातच आंध्र प्रदेशातील बैगनफल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी आणि पसंती आहे. पूर्वीच्या तुलनेत किरकोळमध्ये प्रति किलो भाव ५० ते ६० रुपयांवर आहेत. भाव कमी असल्यामुळे नागपूरकर आंब्याचा गोडवा चाखत आहेत. आता ऊन चांगले तापू लागल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे. सध्या घरोघरी आमरसाचा पाहुणचार सुरू आहे.भाव आणखी कमी होणाररसाचा आंबा म्हणून बैगनफल्लीचा नागपुरात सर्वाधिक खप आहे. किरकोळ बाजारात बहुतांश हातगाड्यांवर विक्री सुरू आहे. अवकाळी पाऊस न आल्यास पुढे आवक वाढून दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. २० दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ६० ते ८० आणि किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो असलेला बैगनपल्ली आंबा आता घाऊक बाजारात ४० च्या खाली गेला आहे. पुढील काही दिवसांत किरकोळमध्ये ५० च्या आत विक्री होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.दशहरी व लंगडा आंब्याला मागणीकळमन्यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्ली येथून दररोज १५० ते २०० ट्रक आंब्याची आवक होत आहे. यामध्ये बैगनफल्ली, तोतापुरी, दशहरी, लंगडा, केसर, हापूस आंब्यांचा समावेश आहे. याशिवाय नागपूरलगत भिवापूर, मांढळ, गोंदिया, वरुड येथून गावराणी आंब्यामध्ये मुख्यत्वे लंगडा, दशहरी, चौसा मोठ्या प्रमाणात येत आहे. कळमन्यात हापूस ४०० ते ६०० रुपये किलो, दशहरी ४० ते ५०, लंगडा ३० ते ४०, केसर १०० ते १५०, तोतापुरी ३५ ते ७०, बैगनफल्ली ३० ते ४० आणि गावराण २० ते ४० रुपये भाव आहेत. पण किरकोळमध्ये भाव कळमन्याच्या तुलनेत दीडपट आणि दुप्पट आहेत. रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे भाव जास्त असून मागणी कमी आहे. त्यामुळे आडतिये विक्रीसाठी फार कमी प्रमाणात बोलवीत आहेत. डझन पेट्यांमध्ये आवक सुरू आहे.आवक वाढली, दर कमीयावर्षी सर्व प्रकारच्या आंब्याची आवक वाढली असून नागपुरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बैगनफल्लीची आवक आंध्र प्रदेशातून होत आहे. कळमन्यात भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये भाव जास्त आहेत. पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.-आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,कळमना फळ बाजार असोसिएशन

टॅग्स :Mangoआंबा