शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

तलावांच्या सफाईसाठी सरसावले हात

By admin | Updated: September 18, 2016 02:47 IST

गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनिल सोले, ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकारनागपूर : गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने तलाव परिसरातील नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ७०० नागरिक सरसावले अन् अवघ्या दोन तासात त्यांनी सामूहिक प्रयत्न करून अवघा सोनेगाव तलाव आणि परिसर स्वच्छ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त सेवा दिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी सोनेगाव तलावाची स्वच्छता करण्यात आली. भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजता सोनेगाव तलाव परिसरात शेकडो महिला आणि पुरुष गोळा झाले. प्रत्येकाने आपल्या सोबत मोठमोठे घमेले, फावडे, टोपल्या आणल्या होत्या. तलावाकाठावरील कचरा, प्लास्टिक फावड्याच्या साहाय्याने तर तलावाच्या आतील कचरा बांबूला टोपल्या बांधून तलावाच्या काठावर आणण्यात आला. हा कचरा पोत्यात भरण्यात आला. हे पोते डम्पिंग यार्डमध्ये नेण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत सोनेगाव तलाव परिसर स्वच्छ झाला. तलावाच्या मध्यभागातील कचरा बोटीद्वारे काढण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संघटनेचे आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेवक प्रकाश तोतवानी, गिरीश देशमुख, नगरसेविका पल्लवी शामकुळे, नीलिमा बावणे, उषा निशितकर, भाजप दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष प्रकाश भोयर, किशोर वानखेडे, श्रीकांत भुरे, विवेक गर्गे, राम मुंजे, दिलीप दिवे, नंदा जिचकार, अनसूया गुप्ता, स्नेहल गोतमारे, आशिष पाठक, छोटू बोरीकर आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे सोनेगाव तलाव स्वच्छ होऊ शकला, त्यामुळे हे जनतेचे यश आहे, असे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)१५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जनसोनेगाव परिसरात विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आले होते. प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम टँकमध्ये विसर्जनाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार परिसरातील १५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्यात आले. शनिवारी राबविण्यात आलेल्या सफाई अभियानातही जवळपास ३ ट्रक कचरा तलावाबाहेर काढण्यात आला. तर २५० टन निर्माल्य खतासाठी अंबाझरी येथे पाठविण्यात आले.