शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

तलावांच्या सफाईसाठी सरसावले हात

By admin | Updated: September 18, 2016 02:47 IST

गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनिल सोले, ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकारनागपूर : गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने तलाव परिसरातील नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ७०० नागरिक सरसावले अन् अवघ्या दोन तासात त्यांनी सामूहिक प्रयत्न करून अवघा सोनेगाव तलाव आणि परिसर स्वच्छ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त सेवा दिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी सोनेगाव तलावाची स्वच्छता करण्यात आली. भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजता सोनेगाव तलाव परिसरात शेकडो महिला आणि पुरुष गोळा झाले. प्रत्येकाने आपल्या सोबत मोठमोठे घमेले, फावडे, टोपल्या आणल्या होत्या. तलावाकाठावरील कचरा, प्लास्टिक फावड्याच्या साहाय्याने तर तलावाच्या आतील कचरा बांबूला टोपल्या बांधून तलावाच्या काठावर आणण्यात आला. हा कचरा पोत्यात भरण्यात आला. हे पोते डम्पिंग यार्डमध्ये नेण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत सोनेगाव तलाव परिसर स्वच्छ झाला. तलावाच्या मध्यभागातील कचरा बोटीद्वारे काढण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संघटनेचे आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेवक प्रकाश तोतवानी, गिरीश देशमुख, नगरसेविका पल्लवी शामकुळे, नीलिमा बावणे, उषा निशितकर, भाजप दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष प्रकाश भोयर, किशोर वानखेडे, श्रीकांत भुरे, विवेक गर्गे, राम मुंजे, दिलीप दिवे, नंदा जिचकार, अनसूया गुप्ता, स्नेहल गोतमारे, आशिष पाठक, छोटू बोरीकर आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे सोनेगाव तलाव स्वच्छ होऊ शकला, त्यामुळे हे जनतेचे यश आहे, असे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)१५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जनसोनेगाव परिसरात विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आले होते. प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम टँकमध्ये विसर्जनाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार परिसरातील १५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्यात आले. शनिवारी राबविण्यात आलेल्या सफाई अभियानातही जवळपास ३ ट्रक कचरा तलावाबाहेर काढण्यात आला. तर २५० टन निर्माल्य खतासाठी अंबाझरी येथे पाठविण्यात आले.