शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तलावांच्या सफाईसाठी सरसावले हात

By admin | Updated: September 18, 2016 02:47 IST

गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनिल सोले, ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकारनागपूर : गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने तलाव परिसरातील नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ७०० नागरिक सरसावले अन् अवघ्या दोन तासात त्यांनी सामूहिक प्रयत्न करून अवघा सोनेगाव तलाव आणि परिसर स्वच्छ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त सेवा दिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी सोनेगाव तलावाची स्वच्छता करण्यात आली. भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजता सोनेगाव तलाव परिसरात शेकडो महिला आणि पुरुष गोळा झाले. प्रत्येकाने आपल्या सोबत मोठमोठे घमेले, फावडे, टोपल्या आणल्या होत्या. तलावाकाठावरील कचरा, प्लास्टिक फावड्याच्या साहाय्याने तर तलावाच्या आतील कचरा बांबूला टोपल्या बांधून तलावाच्या काठावर आणण्यात आला. हा कचरा पोत्यात भरण्यात आला. हे पोते डम्पिंग यार्डमध्ये नेण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत सोनेगाव तलाव परिसर स्वच्छ झाला. तलावाच्या मध्यभागातील कचरा बोटीद्वारे काढण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संघटनेचे आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेवक प्रकाश तोतवानी, गिरीश देशमुख, नगरसेविका पल्लवी शामकुळे, नीलिमा बावणे, उषा निशितकर, भाजप दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष प्रकाश भोयर, किशोर वानखेडे, श्रीकांत भुरे, विवेक गर्गे, राम मुंजे, दिलीप दिवे, नंदा जिचकार, अनसूया गुप्ता, स्नेहल गोतमारे, आशिष पाठक, छोटू बोरीकर आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे सोनेगाव तलाव स्वच्छ होऊ शकला, त्यामुळे हे जनतेचे यश आहे, असे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)१५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जनसोनेगाव परिसरात विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आले होते. प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम टँकमध्ये विसर्जनाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार परिसरातील १५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्यात आले. शनिवारी राबविण्यात आलेल्या सफाई अभियानातही जवळपास ३ ट्रक कचरा तलावाबाहेर काढण्यात आला. तर २५० टन निर्माल्य खतासाठी अंबाझरी येथे पाठविण्यात आले.