शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अगरबत्ती तयार करणारे हात होणार बेकार

By admin | Updated: October 27, 2014 00:30 IST

बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे.

हजारो कारागिरांवर बेरोजगारीचे संकट : एकट्या उत्तर नागपुरातच चार हजार कारागीरनागपूर : बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे. नागपूर आणि परिसरातील हजारो महिलांचे हात यंत्रामुळे बेकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपूर, कामठी, गोंदिया, भंडारा या परिसरात पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती तयार करणारे हजारो कारागीर आहेत. या पारंपरिक उद्योगाने विशेषत: झोपडपट्ट्यांमधील महिलांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकट्या उत्तर नागपुरातच सुमारे चार हजार कारागिरांचे कुटुंब या उद्योगावर अवलंबून आहेत. उत्तर नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती करण्याचे छोटे-छोटे घरगुती कारखाने आहेत. १० महिलांपासून ते ४०० महिलांपर्यंतच्या लोकांना एकेका कारखान्याने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या कारागिरांनी तयार केलेला माल मोठे व्यापारी विकत घेतात आणि आकर्षक पॅकेजिंग करून ते विकतात, असा हा व्यापार चालतो. अगरबत्ती तयार करणे ही एक कला आहे. कोळसा, मैदा, नुरवा यांच्या मिश्रणातून पावडर तयार केली जाते. यात विविध प्रकारचे सेंट टाकून अगरबत्ती बनवली जाते. अगरबत्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काड्याही विविध प्रकारच्या असतात. आसाम आणि बालाघाट येथील विशिष्ट बांबुपासून या काड्या तयार केल्या जातात. सध्या बालाघाटी काडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एका महिलेला हजार अगरबत्तीमागे पूर्वी १५ ते १८ रुपये रोजी मिळत असे. प्रत्येक जण दिवसभरात किमान १०० रुपये रोजी मिळवतात. अनेक जणांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य अगरबत्ती तयार करतात. अनेकांनी तर सुट्यांमध्ये आणि फावल्या वेळात अगरबत्ती तयार करून आपले शिक्षण पूर्ण केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नागपूर आणि परिसरातील हा व्यवसाय संकटात सापडला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी आता अगरबत्ती तयार करण्यासाठी यंत्र वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे येथील पारंपरिक कारागीर बेरोजगार झाले आहे. उत्तर नागपुरातील एकेक कारखाना बंद पडू लागला आहे. कारागिरांची रोजगारासाठी वणवण सुरू आहे. (प्रतिनिधी)