शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अगरबत्ती तयार करणारे हात होणार बेकार

By admin | Updated: October 27, 2014 00:30 IST

बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे.

हजारो कारागिरांवर बेरोजगारीचे संकट : एकट्या उत्तर नागपुरातच चार हजार कारागीरनागपूर : बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे. नागपूर आणि परिसरातील हजारो महिलांचे हात यंत्रामुळे बेकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपूर, कामठी, गोंदिया, भंडारा या परिसरात पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती तयार करणारे हजारो कारागीर आहेत. या पारंपरिक उद्योगाने विशेषत: झोपडपट्ट्यांमधील महिलांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकट्या उत्तर नागपुरातच सुमारे चार हजार कारागिरांचे कुटुंब या उद्योगावर अवलंबून आहेत. उत्तर नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती करण्याचे छोटे-छोटे घरगुती कारखाने आहेत. १० महिलांपासून ते ४०० महिलांपर्यंतच्या लोकांना एकेका कारखान्याने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या कारागिरांनी तयार केलेला माल मोठे व्यापारी विकत घेतात आणि आकर्षक पॅकेजिंग करून ते विकतात, असा हा व्यापार चालतो. अगरबत्ती तयार करणे ही एक कला आहे. कोळसा, मैदा, नुरवा यांच्या मिश्रणातून पावडर तयार केली जाते. यात विविध प्रकारचे सेंट टाकून अगरबत्ती बनवली जाते. अगरबत्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काड्याही विविध प्रकारच्या असतात. आसाम आणि बालाघाट येथील विशिष्ट बांबुपासून या काड्या तयार केल्या जातात. सध्या बालाघाटी काडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एका महिलेला हजार अगरबत्तीमागे पूर्वी १५ ते १८ रुपये रोजी मिळत असे. प्रत्येक जण दिवसभरात किमान १०० रुपये रोजी मिळवतात. अनेक जणांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य अगरबत्ती तयार करतात. अनेकांनी तर सुट्यांमध्ये आणि फावल्या वेळात अगरबत्ती तयार करून आपले शिक्षण पूर्ण केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नागपूर आणि परिसरातील हा व्यवसाय संकटात सापडला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी आता अगरबत्ती तयार करण्यासाठी यंत्र वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे येथील पारंपरिक कारागीर बेरोजगार झाले आहे. उत्तर नागपुरातील एकेक कारखाना बंद पडू लागला आहे. कारागिरांची रोजगारासाठी वणवण सुरू आहे. (प्रतिनिधी)