शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणावर ‘हातोडा’

By admin | Updated: January 29, 2016 05:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमणावर अखेर गुरुवारी हातोडा चालला. ‘कॅम्पस’ला

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमणावर अखेर गुरुवारी हातोडा चालला. ‘कॅम्पस’ला लागून असलेल्या विद्यापीठाच्या या जागेवरील एक सावजी भोजनालय व ‘गॅरेज’च्या इमारतीला पाडण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जागेवरील इतर आठ ढाबे व भोजनालयांचे मालक उच्च न्यायालयात गेल्यामुळे त्यांच्याविरुद्धची कारवाई काही दिवसांसाठी टाळण्यात आली आहे.विद्यापीठाच्या मालकीच्या या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून विविध भोजनालय तसेच ढाबेमालकांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात नागपूरचे तहसीलदार सतीश समर्थ यांनी बुधवारी नोटीस जारी केली होती. त्यांच्याच नेतृत्वात मनपा व नासुप्रच्या पथकाने दुपारी १२ च्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. नासुप्रचे अधिकारी राजू पिंपळे, अनिल अवस्थी, संदीप राऊत व वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वातील नासुप्रचे पथक सकाळी ११.३० वाजताच पोहोचले होते. दुसरीकडे सहायक आयुक्त अशोक पाटील, मंजू शाह व जमशेद अली यांच्या नेतृत्वातील मनपाचे पथक पोहोचले. सुरुवातीला भोजनालय तसेच गॅरेजच्या मालकांना सामान काढण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानंतर सुमारे पाऊण एकरवरील अतिक्रमण तोडण्यात आले व ही जमीन विद्यापीठ प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. (प्रतिनिधी)आता सोमवारकडे लक्षअतिक्रमण करणाऱ्यांनी संबंधित जमिनीवर हक्क सांगताना येथे अनेक पिढ्यांपासून डेअरी व्यवसाय होत असल्याचा दावा अगोदरच केला आहे. गुरुवारी कारवाई होणार हे लक्षात आल्यानंतर आणखी काही भोजनालय तसेच ढाबामालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाईसंदर्भात रूपरेषा स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, मोकळ्या झालेल्या जागेच्या संरक्षणासाठी विद्यापीठाने खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.विद्यापीठाच्या अनास्थेमुळेच वाढले अतिक्रमण१९९२ साली विद्यापीठाने क्रीडा संकुलाच्या नावावर शासनाला जमीन दिली होती. मात्र, त्याचा योग्य उपयोग न झाल्याने ती जमीन परत करण्याची मागणी सिनेटमध्ये सदस्यांनी उचलून धरली. अखेर राज्य शासनाने ७०.९ एकर पैकी ४४ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापैकी ७.४५ एकर जमिनीवर अतिक्रमण करून धाबे, हॉटेल्स अनधिकृतपणे तयार करण्यात आले.