शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणावर ‘हातोडा’

By admin | Updated: January 29, 2016 05:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमणावर अखेर गुरुवारी हातोडा चालला. ‘कॅम्पस’ला

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमणावर अखेर गुरुवारी हातोडा चालला. ‘कॅम्पस’ला लागून असलेल्या विद्यापीठाच्या या जागेवरील एक सावजी भोजनालय व ‘गॅरेज’च्या इमारतीला पाडण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जागेवरील इतर आठ ढाबे व भोजनालयांचे मालक उच्च न्यायालयात गेल्यामुळे त्यांच्याविरुद्धची कारवाई काही दिवसांसाठी टाळण्यात आली आहे.विद्यापीठाच्या मालकीच्या या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून विविध भोजनालय तसेच ढाबेमालकांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात नागपूरचे तहसीलदार सतीश समर्थ यांनी बुधवारी नोटीस जारी केली होती. त्यांच्याच नेतृत्वात मनपा व नासुप्रच्या पथकाने दुपारी १२ च्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. नासुप्रचे अधिकारी राजू पिंपळे, अनिल अवस्थी, संदीप राऊत व वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वातील नासुप्रचे पथक सकाळी ११.३० वाजताच पोहोचले होते. दुसरीकडे सहायक आयुक्त अशोक पाटील, मंजू शाह व जमशेद अली यांच्या नेतृत्वातील मनपाचे पथक पोहोचले. सुरुवातीला भोजनालय तसेच गॅरेजच्या मालकांना सामान काढण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानंतर सुमारे पाऊण एकरवरील अतिक्रमण तोडण्यात आले व ही जमीन विद्यापीठ प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. (प्रतिनिधी)आता सोमवारकडे लक्षअतिक्रमण करणाऱ्यांनी संबंधित जमिनीवर हक्क सांगताना येथे अनेक पिढ्यांपासून डेअरी व्यवसाय होत असल्याचा दावा अगोदरच केला आहे. गुरुवारी कारवाई होणार हे लक्षात आल्यानंतर आणखी काही भोजनालय तसेच ढाबामालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाईसंदर्भात रूपरेषा स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, मोकळ्या झालेल्या जागेच्या संरक्षणासाठी विद्यापीठाने खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.विद्यापीठाच्या अनास्थेमुळेच वाढले अतिक्रमण१९९२ साली विद्यापीठाने क्रीडा संकुलाच्या नावावर शासनाला जमीन दिली होती. मात्र, त्याचा योग्य उपयोग न झाल्याने ती जमीन परत करण्याची मागणी सिनेटमध्ये सदस्यांनी उचलून धरली. अखेर राज्य शासनाने ७०.९ एकर पैकी ४४ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापैकी ७.४५ एकर जमिनीवर अतिक्रमण करून धाबे, हॉटेल्स अनधिकृतपणे तयार करण्यात आले.