शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मूल्यांकनात हलगर्जी; प्राध्यापकांवर कारवाई ?

By admin | Updated: August 24, 2016 03:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे

नागपूर विद्यापीठ : शिस्तपालन समितीकडे प्रकरण पाठविणार, ‘बीएसस्सी’च्या निकालांची डोकेदुखीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे ते ‘बीएसस्सी’च्या चार सत्रांच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लावण्याचे. प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. काही प्राध्यापक तर एकदाही मूल्यांकनासाठी आलेले नसून त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत विद्यापीठाने दिले आहेत. संबंधित प्राध्यापकांची प्रकरणे शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात येतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले, तरी ‘बीएसस्सी’ अभ्यासक्रमाच्या पहिल्या ४ सत्रांच्या २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडलेले आहे. विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापक नियमितपणे मूल्यांकनाला येत नसल्याने ही स्थिती ओढवलेली आहे. एकीकडे हिवाळी परीक्षांची तयारी सुरू झाली असताना ‘बीएसस्सी’च्या प्रलंबित निकालांमुळे परीक्षा विभागाची दमछाक होत आहे. शिवाय विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत आहे. विद्यापीठाने यासंदर्भात १४२ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. परंतु काही प्राध्यापक मूल्यांकनासाठी आलेलेच नाही. अशा प्राध्यापकांवर कारवाई करणे गरजेचे असून शिस्तपालन समितीकडे त्यांची प्रकरणे पाठविण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)कारवाई केली तरी फटकाचदरम्यान, विद्यापीठातील अनेक अधिकारी विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापकांवर कारवाई करण्याच्या पक्षात नाहीत. अगोदरच विज्ञान शाखेत मूल्यांकनाची बोंब आहे. त्यात कारवाई झाली तर त्याचा फटका विद्यापीठालाच बसणार आहे. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी सध्या कारवाईपेक्षा विद्यार्थ्यांचे निकाल जास्त महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. मूल्यांकन लवकरात लवकर कसे होईल यावर आमचा भर असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.२९ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर ?विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचे ८२५ च्या जवळपास निकाल जाहीर केले आहेत. इतर परीक्षांचे निकाल २९ आॅगस्टपर्यंत लावण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. ‘बीएसस्सी’ वगळता इतर निकाल त्या कालावधीत लावण्यात येतील. जर प्राध्यापक हवे त्या प्रमाणात आले तर २९ आॅगस्टपर्यंत ‘बीएसस्सी’चेदेखील बहुतांश मूल्यांकन पूर्ण होईल, असा विश्वास परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी व्यक्त केला.संस्थाचालक, प्राचार्यांना विनंतीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मागील आठवड्याात विद्यापीठात प्राचार्यांची बैठकदेखील घेण्यात आली होती. प्राध्यापकांना सर्व कामांतून आठवडाभर दूर ठेवून मूल्यांकनाला पाठविण्यात यावे, अशी विनंती संस्थाचालक व प्राचार्यांना परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.