शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अर्धा टक्काच नागपूरकर करतात रक्तदान

By admin | Updated: October 1, 2015 03:23 IST

२५ लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानी नागपुरात रक्तदानाच्या संख्येचा आढावा घेतला असता केवळ अर्धा टक्काच रक्तदान होत असल्याची माहिती आहे.

रोज एक हजार पिशव्यांची गरज : उपलब्धता ५०० ते ७०० पिशव्यांचीचनागपूर : २५ लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानी नागपुरात रक्तदानाच्या संख्येचा आढावा घेतला असता केवळ अर्धा टक्काच रक्तदान होत असल्याची माहिती आहे. नागपुरात मेडिकल हब तयार होत असताना रक्ताची मागणीही झपाट्याने वाढली आहे. परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे रक्त मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. केवळ नागपुरातच नव्हे तर देशातही एक टक्कासुद्धा रक्तदानाचे प्रमाण नसल्याची माहिती असून ही परिस्थिती बदलविण्यासाठी रक्तदानाबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे.उपराजधानीत अनेक मोठी रुग्णालये आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा यात समावेश असून विदर्भासह शेजारच्या राज्यातून मोठ्या संख्येने रुग्ण नागपुरात येतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. परंतु रक्तदानाचे प्रमाण कमी आणि मागणीचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त होत असल्यामुळे रुग्णांना रक्त मिळणे कठीण होत आहे. शहरात दिवसाकाठी १ हजार रक्त पिशव्यांची गरज असताना जवळपास ५०० ते ७०० रक्ताच्या पिशव्या उपलब्ध होत असल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरीश वरभे यांनी दिली. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उन्हाळ्यात सर्वाधिक तुटवडाउपराजधानीत सर्वात कडक ऊन पडत असल्यामुळे उन्हाळ््यात रक्तदानाचे प्रमाण अतिशय कमी होते. कडक उन्हामुळे रक्तदान करण्याची नागरिकांची मानसिकता राहत नाही. त्यामुळे या दिवसात रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. ही परिस्थिती बदलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रक्तदात्यांना आवाहन करण्याची गरज आहे.स्वातंत्र्य दिनीच रक्तदानअनेक रक्तदाते केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला रक्तदान करतात. देशप्रेमापोटी या दिवशी स्वत:हून जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. परंतु वर्षभर हे रक्तदाते रक्तदानासाठी पुढाकार घेत नसल्याची माहिती रक्तदान क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिली. त्यामुळे देशप्रेमाची ही भावना एका विशिष्ट दिवशीच मनात न ठेवता वर्षातून किमान चार वेळा रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तदानासारखे पवित्र दान नाही ‘रक्तदान हे सर्व दानात आदर्श दान आहे. रक्तदानामुळे आपण आपल्यासारखा दुसरा जीव वाचवू शकतो. रक्तदानासाठी केवळ ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो. रक्तदान केल्यानंतर २४ तासात रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे रक्तदान करून प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे.’-डॉ. बाळकृष्ण महाजन, कर्मचारी मध्य रेल्वे नागपूर विभागइतरांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे ‘अनेकदा अपघातात गंभीर जखमी होऊन जास्त रक्तस्राव होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. संबंधित रुग्णाला वेळीच रक्तपुरवठा केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविणे शक्य होते. त्यामुळे मी १९७० पासून नियमितपणे रक्तदान करीत आहे. अनेकदा वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान करतो. यापुढेही हे सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे.’-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल नागपूर विभागरक्तदान ही सामाजिक बांधिलकी‘समाजात वावरत असताना समाजाप्रति प्रत्येकाची बांधिलकी असते. रक्तदानाच्या माध्यमातून आपण ही सामाजिक बांधिलकी जोपासू शकतो. रक्तदान केल्यामुळे शरीराची काहीच हानी होत नसून कुठलीच समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे रक्तदानाविषयी गैरसमज बाळगणे चुकीचे आहे. रक्तदानामुळे इतरांचे प्राण वाचविणे शक्य होत असल्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. ’-डॉ. राजेश नाईक, रक्तदाता, नागपूर