शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

अर्धा टक्काच नागपूरकर करतात रक्तदान

By admin | Updated: October 1, 2015 03:23 IST

२५ लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानी नागपुरात रक्तदानाच्या संख्येचा आढावा घेतला असता केवळ अर्धा टक्काच रक्तदान होत असल्याची माहिती आहे.

रोज एक हजार पिशव्यांची गरज : उपलब्धता ५०० ते ७०० पिशव्यांचीचनागपूर : २५ लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानी नागपुरात रक्तदानाच्या संख्येचा आढावा घेतला असता केवळ अर्धा टक्काच रक्तदान होत असल्याची माहिती आहे. नागपुरात मेडिकल हब तयार होत असताना रक्ताची मागणीही झपाट्याने वाढली आहे. परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे रक्त मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. केवळ नागपुरातच नव्हे तर देशातही एक टक्कासुद्धा रक्तदानाचे प्रमाण नसल्याची माहिती असून ही परिस्थिती बदलविण्यासाठी रक्तदानाबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे.उपराजधानीत अनेक मोठी रुग्णालये आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा यात समावेश असून विदर्भासह शेजारच्या राज्यातून मोठ्या संख्येने रुग्ण नागपुरात येतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. परंतु रक्तदानाचे प्रमाण कमी आणि मागणीचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त होत असल्यामुळे रुग्णांना रक्त मिळणे कठीण होत आहे. शहरात दिवसाकाठी १ हजार रक्त पिशव्यांची गरज असताना जवळपास ५०० ते ७०० रक्ताच्या पिशव्या उपलब्ध होत असल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरीश वरभे यांनी दिली. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उन्हाळ्यात सर्वाधिक तुटवडाउपराजधानीत सर्वात कडक ऊन पडत असल्यामुळे उन्हाळ््यात रक्तदानाचे प्रमाण अतिशय कमी होते. कडक उन्हामुळे रक्तदान करण्याची नागरिकांची मानसिकता राहत नाही. त्यामुळे या दिवसात रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. ही परिस्थिती बदलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रक्तदात्यांना आवाहन करण्याची गरज आहे.स्वातंत्र्य दिनीच रक्तदानअनेक रक्तदाते केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला रक्तदान करतात. देशप्रेमापोटी या दिवशी स्वत:हून जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. परंतु वर्षभर हे रक्तदाते रक्तदानासाठी पुढाकार घेत नसल्याची माहिती रक्तदान क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिली. त्यामुळे देशप्रेमाची ही भावना एका विशिष्ट दिवशीच मनात न ठेवता वर्षातून किमान चार वेळा रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तदानासारखे पवित्र दान नाही ‘रक्तदान हे सर्व दानात आदर्श दान आहे. रक्तदानामुळे आपण आपल्यासारखा दुसरा जीव वाचवू शकतो. रक्तदानासाठी केवळ ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो. रक्तदान केल्यानंतर २४ तासात रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे रक्तदान करून प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे.’-डॉ. बाळकृष्ण महाजन, कर्मचारी मध्य रेल्वे नागपूर विभागइतरांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे ‘अनेकदा अपघातात गंभीर जखमी होऊन जास्त रक्तस्राव होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. संबंधित रुग्णाला वेळीच रक्तपुरवठा केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविणे शक्य होते. त्यामुळे मी १९७० पासून नियमितपणे रक्तदान करीत आहे. अनेकदा वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान करतो. यापुढेही हे सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे.’-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल नागपूर विभागरक्तदान ही सामाजिक बांधिलकी‘समाजात वावरत असताना समाजाप्रति प्रत्येकाची बांधिलकी असते. रक्तदानाच्या माध्यमातून आपण ही सामाजिक बांधिलकी जोपासू शकतो. रक्तदान केल्यामुळे शरीराची काहीच हानी होत नसून कुठलीच समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे रक्तदानाविषयी गैरसमज बाळगणे चुकीचे आहे. रक्तदानामुळे इतरांचे प्राण वाचविणे शक्य होत असल्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. ’-डॉ. राजेश नाईक, रक्तदाता, नागपूर