शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

हज यात्रेकरूंच्या गैरसोयीची हायकोर्टाकडून दखल

By admin | Updated: September 27, 2014 02:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हज यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याच्या वृत्ताची दखल घेऊन ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हज यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याच्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व पुखराज बोरा यांनी आज, शुक्रवारी याचिकेवर सुनावणी करून भारतीय विमानतळ प्राधिकरण, राज्य शासन व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली. प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी १३ आॅक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पहिल्या हज विमानाने २६५ यात्रेकरूंचा जत्था रवाना होणार होता. यात्रेकरू २२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता हज हाऊस येथे पोहोचले होते. त्यांना मध्यरात्रीनंतर २ वाजता विमानतळावर सोडण्यात आले. २.३० वाजता यात्रेकरूंना विमानात बसविण्यात आले. विमान उड्डाण भरण्यास सज्ज असता तांत्रिक बिघाड झाला. यानंतर विमानतळावर बिकट परिस्थिती निर्माण झाली. विमानतळ कर्मचारी एसी वारंवार बंद करीत होते. परिणामी यात्रेकरूंना गुदमरल्यासारखे होत होते. खाद्य पदार्थ व राहण्याची अपुरी व्यवस्था असल्यामुळे यात्रेकरूंना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तीन यात्रेकरू बेशुद्ध पडले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करावे लागले. गैरसोयीमुळे यात्रेकरूंनी प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या. सकाळी ६ वाजताचे विमान १०.२५ वाजता रवाना झाले होते. या घटनेला २५ सप्टेंबर रोजीच्या अंकात शहरातील सर्वच वर्तमानपत्रांनी व्यापक प्रसिद्धी दिली होती.(प्रतिनिधी)