शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

रामटेक, खात, बुटीबाेरी परिसरात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक/खात/बुटीबाेरी : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, खात (ता. माैदा), बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथे व परिसरातील गावांमध्ये ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक/खात/बुटीबाेरी : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, खात (ता. माैदा), बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथे व परिसरातील गावांमध्ये साेमवारी (दि. १०) सायंकाळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच या शहर व गावांमध्ये गारपीटही झाली. अंदाजे १५ मिनिटे गारपीट तर एक तास पावसाचा जाेर कायम हाेता. वादळ व जाेरात कडाडणाऱ्या विजांमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.

रामटेक व खात परिसरात मागील सहा दिवसापासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरीही बरसत आहेत. दिवसा हाेणाऱ्या दमट उकाड्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक वैतागले आहेत. त्यातच साेमवारी सायंकाळी रामटेक शहरासह परिसरात वादळाला सुरुवात झाली. काही वेळात पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली. पावसाचा जाेर अंदाजे एक तास तर गारपिटीचा जाेर १५ मिनिटे कायम हाेता.

ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये काेराेना संक्रमण आहे. त्यातच सततच्या दमट उकाडायुक्त प्रतिकूल वातावरणामुळे घराघरात ताप, सर्दी, खाेकल्याचे रुग्ण आढळून येत असल्याने तसेच काेराेना संक्रमणामुळे चिंतेत भर टाकली आहे. या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नसले तरी वादळ व गारपिटीमुळे काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे. वीज काेसळून कुठेही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.

...

घरांचे नुकसान

रामटेक शहरातील माकडांचा हैदाेस वर्षभर सुरू असताे. या माकडांनी उड्या मारून छताच्या कवेलूंची वाट लावली आहे. त्यात गारपिटीने भर टाकल्याने गरिबांचे माेठे नुकसान झाले आहे. फुटलेल्या कवेलीमधून पाणी गळत असल्याने काहींच्या घरातील गृहाेपयाेगी साहित्य भिजले तर काहींना पावसाचे पाणी गाेळा करण्यासाठी घरात ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागली व त्यातील पाणी वारंवार फेकावे लागले. वादळामुळे रामटेक शहरासह तालुक्यातील नगरधन, आजनी, लाेहडाेंगरी, हाताेडी, नंदापुरी, हमलापुरी, चिचाळा येथील घरांवरील कवेलू व टिनपत्र्यांचे शेड उडाले हाेते.

....

महिलांची तारांबळ

वादळामुळे रामटेक व माैदा तालुक्यातील खात व परिसरातील काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. काही गावांमधील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित हाेता तर काही गावात विजेचा लपंडाव सुरू हाेता. उन्हाळा असल्याने महिलांनी धान्य वाळवणे, वड्या, पापड, कुरुड्या, धापोडे, शेवया तयार करणे सुरू केले आहे. हे साहित्य छतावर अथवा अंगणात सुकवायला ठेवले जाते. ते पावसात भिजू नये म्हणून आवराआवर करताना महिलांची तारांबळ उडाली हाेती.