शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

रानडुकरांचा हैदाेस, पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी, महेंद्री शिवारात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ते शेतातील गहू, हरभरा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी, महेंद्री शिवारात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ते शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकांची प्रचंड नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. त्यामुळे वन विभागाने या रानडुकरांचा कायम बंदाेबस्त करावा तसेच झालेल्या बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

जलालखेडा परिसरात जंगल असले तरी आजवर शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा फारसा त्रास हाेत नव्हता. अलीकडच्या काळात नीलगाई (राेही) व रानडुकरांचा वावर या भागात वाढत चालला आहे. सध्या शेतात रबी व भाजीपाल्याची पिके आहेत. खरीप पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांनी रबी पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मागील काही दिवसापासून चांदणीबर्डी व महेंद्री शिवारात रानडुकरांनी कापणीला आलेले गहू व हरभऱ्याच्या तसेच भाजीपाल्याच्या पिकांची नासाडी करायला सुरुवात केली आहे.

रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर थंडीत कुडकुडत शेतात थांबतात. मात्र, त्याचा फारसा फायदा हाेताना दिसून येत नाही. कापणीला आलेले हरभऱ्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची माहिती महेंद्री येथील शेतकरी नारायण नाखले यांनी दिली. असाच प्रकार अन्य शेतकऱ्यांच्या शेतात घडला आहे. त्यामुळे वन विभागाने या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि नेहमीप्रमाणे तुटपुंजी नुकसान भरपाई न देता ती बाजारभावाप्रमाणे द्यावी तसेच या रानडुकरांचा कायम बंदाेबसत करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

...

कायम बंदाेबस्त करा

नरखेड तालुक्यातील काही भागात नीलगाई (राेही) तर काही भागात रानडुकरांचा वावर प्रचंड वाढला आहे. वन्यप्राणी शेतातील पीक नष्ट करीत असल्याने शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागते. या प्राण्यांना सांभाळण्याची जबाबदारी वन विभागाची असल्याने त्यांनी वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी. ते शेत अथवा नागरी वस्तीच्या दिशेने आल्यास त्यांचा वेळीच बंदाेबस्त करावा. वन कर्मचाऱ्यांना वन्यप्राणी सांभाळता येत नसल्याने त्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची लेखी परवानगी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीही काही शेतकऱ्यांनी केली आहे.