शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

रानडुकरांचा हैदाेस, पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी, महेंद्री शिवारात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ते शेतातील गहू, हरभरा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी, महेंद्री शिवारात रानडुकरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ते शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकांची प्रचंड नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. त्यामुळे वन विभागाने या रानडुकरांचा कायम बंदाेबस्त करावा तसेच झालेल्या बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

जलालखेडा परिसरात जंगल असले तरी आजवर शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा फारसा त्रास हाेत नव्हता. अलीकडच्या काळात नीलगाई (राेही) व रानडुकरांचा वावर या भागात वाढत चालला आहे. सध्या शेतात रबी व भाजीपाल्याची पिके आहेत. खरीप पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांनी रबी पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मागील काही दिवसापासून चांदणीबर्डी व महेंद्री शिवारात रानडुकरांनी कापणीला आलेले गहू व हरभऱ्याच्या तसेच भाजीपाल्याच्या पिकांची नासाडी करायला सुरुवात केली आहे.

रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर थंडीत कुडकुडत शेतात थांबतात. मात्र, त्याचा फारसा फायदा हाेताना दिसून येत नाही. कापणीला आलेले हरभऱ्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याची माहिती महेंद्री येथील शेतकरी नारायण नाखले यांनी दिली. असाच प्रकार अन्य शेतकऱ्यांच्या शेतात घडला आहे. त्यामुळे वन विभागाने या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि नेहमीप्रमाणे तुटपुंजी नुकसान भरपाई न देता ती बाजारभावाप्रमाणे द्यावी तसेच या रानडुकरांचा कायम बंदाेबसत करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

...

कायम बंदाेबस्त करा

नरखेड तालुक्यातील काही भागात नीलगाई (राेही) तर काही भागात रानडुकरांचा वावर प्रचंड वाढला आहे. वन्यप्राणी शेतातील पीक नष्ट करीत असल्याने शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागते. या प्राण्यांना सांभाळण्याची जबाबदारी वन विभागाची असल्याने त्यांनी वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी. ते शेत अथवा नागरी वस्तीच्या दिशेने आल्यास त्यांचा वेळीच बंदाेबस्त करावा. वन कर्मचाऱ्यांना वन्यप्राणी सांभाळता येत नसल्याने त्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची लेखी परवानगी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीही काही शेतकऱ्यांनी केली आहे.