शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार म.रा. जोशी यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:48 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशिलालेख, पोथ्यांमध्ये आपला इतिहास दडला आहे ‘भक्तीरंग’मधून निनादले अभंगांचे स्वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राची भूमी संतसाहित्याद्वारे भावार्थाशी जुळला आहे. येथेचे नव्हे तर येथील संस्कृतित सापडणारे शिलालेख आणि पोथ्यांमध्ये आपला पुरातन इतिहास दडलेला आहे. त्यातील भावार्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, असे कार्य होणे अपेक्षित असल्याची भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य म.रा. जोशी यांनी आज येथे व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी पंढरपूर संस्थानचे माजी पुजारी बडवे यांनी संस्थानकडून तुळशीमाळ, कुंकू, उपरणे, पोथी आणि प्रसाद अर्पण करून जोशी यांचा सत्कार केला.या भूमीत महानुभाव, दत्त, नाथ, वारकरी संप्रदाय निर्माण झाले आणि त्यावर कळसही चढविला गेला. वारकऱ्यांप्रमाणेच रामदासी पंथाने प्रचंड ग्रंथसंपदा दिली. या प्रत्येक संप्रदायाच्या ग्रंथांचे अभ्यास करताना, त्यातील चिंतन उलगडत गेले. मुस्लिम संप्रदायामध्ये दर्गे नाही. मात्र, महाराष्ट्रात ते आढळतात. या दर्ग्यांची देण हिंदू साधूंच्या समाधीतून मिळाली असल्याचे जोशी यावेळी म्हणाले. ही भूमीच देवाशी नाते सांगणारी असल्याने, येथील प्रत्येक चिंतनात सामान्य जणांचे भाव व्यक्त होत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपारिक अभंगासोबतच महेंद्र पेंढरकर यांच्या नव्या भक्तीमय गीतांचा सुरेल भावमयी कार्यक्रम ‘भक्तीरंग’ सादर झाला. प्रथमेश लघाटे, शरयू दाते, गुणवंत घटवई आणि सोनाली दीक्षित यांनी.. सावळाची, सावळे सुंदर, या पंढरीचे सुख, खेळ मांडियेला, आम्हा नकळे ज्ञान, काय शोधिसी तू, हरी भजना, बोलावा विठ्ठल, रवी तेजाने नाचत, जीवन पाण्याचा, रूणूझुणू रे भ्रमरा.. आदी अभंग सादर केले. संगीत संयोजन शैलेश दाणी यांचे होते. निरुपण रेणूका देशकर यांनी केले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी