शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार म.रा. जोशी यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:48 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशिलालेख, पोथ्यांमध्ये आपला इतिहास दडला आहे ‘भक्तीरंग’मधून निनादले अभंगांचे स्वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राची भूमी संतसाहित्याद्वारे भावार्थाशी जुळला आहे. येथेचे नव्हे तर येथील संस्कृतित सापडणारे शिलालेख आणि पोथ्यांमध्ये आपला पुरातन इतिहास दडलेला आहे. त्यातील भावार्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, असे कार्य होणे अपेक्षित असल्याची भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य म.रा. जोशी यांनी आज येथे व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी पंढरपूर संस्थानचे माजी पुजारी बडवे यांनी संस्थानकडून तुळशीमाळ, कुंकू, उपरणे, पोथी आणि प्रसाद अर्पण करून जोशी यांचा सत्कार केला.या भूमीत महानुभाव, दत्त, नाथ, वारकरी संप्रदाय निर्माण झाले आणि त्यावर कळसही चढविला गेला. वारकऱ्यांप्रमाणेच रामदासी पंथाने प्रचंड ग्रंथसंपदा दिली. या प्रत्येक संप्रदायाच्या ग्रंथांचे अभ्यास करताना, त्यातील चिंतन उलगडत गेले. मुस्लिम संप्रदायामध्ये दर्गे नाही. मात्र, महाराष्ट्रात ते आढळतात. या दर्ग्यांची देण हिंदू साधूंच्या समाधीतून मिळाली असल्याचे जोशी यावेळी म्हणाले. ही भूमीच देवाशी नाते सांगणारी असल्याने, येथील प्रत्येक चिंतनात सामान्य जणांचे भाव व्यक्त होत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपारिक अभंगासोबतच महेंद्र पेंढरकर यांच्या नव्या भक्तीमय गीतांचा सुरेल भावमयी कार्यक्रम ‘भक्तीरंग’ सादर झाला. प्रथमेश लघाटे, शरयू दाते, गुणवंत घटवई आणि सोनाली दीक्षित यांनी.. सावळाची, सावळे सुंदर, या पंढरीचे सुख, खेळ मांडियेला, आम्हा नकळे ज्ञान, काय शोधिसी तू, हरी भजना, बोलावा विठ्ठल, रवी तेजाने नाचत, जीवन पाण्याचा, रूणूझुणू रे भ्रमरा.. आदी अभंग सादर केले. संगीत संयोजन शैलेश दाणी यांचे होते. निरुपण रेणूका देशकर यांनी केले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी