शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘ईडी’ च्या रडारवर ग्वालबन्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:59 IST

अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे.

ठळक मुद्देदिलीप ग्वालबन्शीविरुद्ध होणार मनी लाँड्रिंगची कारवाईविशेष पथकाने दाखल केली ३४ प्रकरणे, ४४ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे. ग्वालबन्शी आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेली नागपूर जिल्ह्यातील ९८.३३ एकर जमीन महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) जप्त करण्यात आलेली आहे.दिलीप ग्वालबन्शी आणि त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आलेली आहे. एसआयटीने दिलीप आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध १३ प्रकरणे दाखल केलेली आहेत. दिलीप, त्याचे साथीदार ईश्वर सुप्रेटकर, अंथोनी ऊर्फ जॉन स्वामी, प्रेम यादव, पप्पू ऊर्फ राहुल यादव यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून प्रेमव्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.मोक्काच्या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी दिलीप ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी यांनी गुन्हेगारीच्या माध्यमातून जमवलेल्या संपत्तीची माहिती प्राप्त केली. त्या आधारावर दिलीपच्या नावे ६५.३३ आणि शुभांगीच्या नावे ३३.०३ एकर जमीन असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या मालमत्ता पिपळा रिठी, तारसा, मौदा, गोरेवाडा, कामठीच्या खैरी, हजारी पहाड, कळमेश्वर, येरला आणि गिट्टीखदानच्या बोरगाव भागातील आहेत.पोलिसांनी या संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का विशेष न्यायालयात निवेदन सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने जप्तीची अनुमती दिली. मोक्काअंतर्गत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीप ग्वालबन्शी व पत्नीच्या संपत्तीबाबतची सूचना प्रवर्तन निदेशालय आणि आयकर विभागाला दिल्याचे सांगितले.ही संपत्ती अवैध मार्गाने प्राप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ईडी ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करणार आहे. दिलीप ग्वालबन्शीच्या पत्नीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.९९९ तक्रारींची सुरू आहे चौकशीपत्रकारांशी बोलताना कदम यांनी सांगितले की, एसआयटीने आतापर्यंत ३४ प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्यात १५० जणांना आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. ६५८ पीडितांना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आलेला आहे. ५२२ तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला असून ९९९ तक्रारींची चौकशी सुरू आहे. मात्र एसआयटीचे कामकाज गुंडाळले जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.