शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘ईडी’ च्या रडारवर ग्वालबन्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:59 IST

अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे.

ठळक मुद्देदिलीप ग्वालबन्शीविरुद्ध होणार मनी लाँड्रिंगची कारवाईविशेष पथकाने दाखल केली ३४ प्रकरणे, ४४ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे. ग्वालबन्शी आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेली नागपूर जिल्ह्यातील ९८.३३ एकर जमीन महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) जप्त करण्यात आलेली आहे.दिलीप ग्वालबन्शी आणि त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आलेली आहे. एसआयटीने दिलीप आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध १३ प्रकरणे दाखल केलेली आहेत. दिलीप, त्याचे साथीदार ईश्वर सुप्रेटकर, अंथोनी ऊर्फ जॉन स्वामी, प्रेम यादव, पप्पू ऊर्फ राहुल यादव यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून प्रेमव्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.मोक्काच्या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी दिलीप ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी यांनी गुन्हेगारीच्या माध्यमातून जमवलेल्या संपत्तीची माहिती प्राप्त केली. त्या आधारावर दिलीपच्या नावे ६५.३३ आणि शुभांगीच्या नावे ३३.०३ एकर जमीन असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या मालमत्ता पिपळा रिठी, तारसा, मौदा, गोरेवाडा, कामठीच्या खैरी, हजारी पहाड, कळमेश्वर, येरला आणि गिट्टीखदानच्या बोरगाव भागातील आहेत.पोलिसांनी या संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का विशेष न्यायालयात निवेदन सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने जप्तीची अनुमती दिली. मोक्काअंतर्गत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीप ग्वालबन्शी व पत्नीच्या संपत्तीबाबतची सूचना प्रवर्तन निदेशालय आणि आयकर विभागाला दिल्याचे सांगितले.ही संपत्ती अवैध मार्गाने प्राप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ईडी ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करणार आहे. दिलीप ग्वालबन्शीच्या पत्नीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.९९९ तक्रारींची सुरू आहे चौकशीपत्रकारांशी बोलताना कदम यांनी सांगितले की, एसआयटीने आतापर्यंत ३४ प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्यात १५० जणांना आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. ६५८ पीडितांना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आलेला आहे. ५२२ तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला असून ९९९ तक्रारींची चौकशी सुरू आहे. मात्र एसआयटीचे कामकाज गुंडाळले जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.