शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

गुंठेवारीचे ग्रहण सुटले

By admin | Updated: August 2, 2016 02:02 IST

गुंठेवारी कायद्यांतर्गत मंजूर असलेल्या ले-आऊटमधील भूखंडांच्या नियमितीकरणाचे ग्रहण सुटले आहे. ज्या

नागपूर: गुंठेवारी कायद्यांतर्गत मंजूर असलेल्या ले-आऊटमधील भूखंडांच्या नियमितीकरणाचे ग्रहण सुटले आहे. ज्या भूखंड धारकांकडे २००१ नंतरची रजिस्ट्री किंवा ताबापत्र आहे, असे भूखंड नियमित केले जात नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हा प्रश्न निकाली काढला आहे. आता २००१ नंतरचीही कागदपत्रे असणाऱ्यांचे भूखंड नासुप्रतर्फे विकास शुल्क आकारून नियमित केले जातील. याचा नागपुरातील सुमारे अडीच लाख भूखंड धारकांना फायदा होणार आहे. नागपूर शहराच्या बाह्य भागात चारही दिशेने गेल्या अनेक वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांकडे सोसायटीने करून दिलेले ताबापत्र आहे. महाराष्ट्र गुंठेवारी कायदा २००१ नुसार जमिनीच्या मालकीबाबत किंवा ताबा दर्शविणारे २००१ पूर्वीचे कागदपत्र असतील तर भूखंड नियमित केला जात होता. ज्या भूखंड धारकांनी या तारखेपूर्वी रजिस्ट्री केली नाही त्यांना संबंधित ले-आऊट गुंठेवारी अंतर्गत मंजूर असूनही त्याचा फायदा होत नव्हता. जवळपास सर्वच मंजूर गुंठेवारी ले-आऊटमध्ये ४० टक्क्यांहून अधिक भूखंड या अटीमुळे नियमित करता येत नव्हते. असे असले तरी संबंधित ले-आऊटमध्ये असलेल्या सर्व नागरी सुविधांचा फायदा भूखंड नियमित न झालेले नागरिक घेत होते. यामुळे तांत्रिक पेचात अडकलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी आ. कृष्णा खोपडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडून अट शिथिल करण्याची मागणी केली. आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी २६ एप्रिल २०१६ रोजी आमदार व नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तीत संबंधित अट शिथिल करण्याचे आदेश दिले. यानंतर २९ एप्रिल २०१६ रोजी नगरविकास विभागातर्फे संबंधित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) २००७ पासूनही दिलासा गुंठेवारी २००१ च्या कायद्यानुसार सन २००१ पूर्वीची कागदपत्रे असलेला भूखंडधारक भूखंड नियमितीकरणासाठी केव्हाही अर्ज करू शकतात. मात्र, नासुप्रने २००७ पूर्वी अर्ज करणाऱ्यांचेच भूखंड नियमित करण्याची अट नियमात नसतानाही लादली. आता नगर विकास विभागाने गुंठेवारी कायद्यातील कलम ४ (अ) नुसार ही अट रद्द केली आहे. त्यामुळे नागरिकांना भूखंड नियमितीकरणासाठी केव्हाही अर्ज करता येणार आहे. हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. दुप्पट विकास शुल्क भरावे लागणार गुंठेवारी अंतर्गत मंजूर असलेल्या ले-आऊटमधील २००१ नंतरचे भूखंड नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता नासुप्रकडे मोठ्या प्रमाणात विकास शुल्क जमा होणार आहे. २००१ पूर्वीच रजिस्ट्री असलेल्या नागरिकांकडून भूखंड नियमितीकरणासाठी प्रती चौरस फूट ५६ रुपये याप्रमाणे विकास शुल्क भरावे लागते. आता २००१ नंतरची रजिस्ट्री किंवा ताबापत्र असणाऱ्यांना दुप्पट म्हणजे प्रती चौरस फूट ११२ रुपये विकास शुल्क भरावे लागणार आहे. कुर्वे, गुज्जलवार यांची भूमिका महत्त्वाची नासुप्रचे तत्कालीन सभापती सचिन कुर्वे व मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांनी गुंठेवारी ले-आऊटच्या नियमितीकरणाचा प्रश्न सुटावा यासाठी २० आॅगस्ट २०१५ रोजी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर २९ मार्च २०१६ रोजी शासनाकडे पुन्हा सुधारित प्रस्तावही सादर केला. शहरातील मंजूर ले-आऊटमधील उर्वरित भूखंडांबाबत मार्ग काढण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या प्रस्तावात जनतेचे हित विचारात घेऊन मार्ग सुचविला होता. त्या प्रस्तावावार शिक्कामोर्तब झाले आहे. ४० वर्षांपासूनचा प्रश्न सुटला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने गेल्या ४० वर्षात जो निर्णय घेतला नाही तो प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्वरित मार्गी लावला आहे. याचा अडीच लाख नागपूरकरांना फायदा होईल. राज्य सरकारकडून गेल्या दोन वर्षांपासून ले-आऊट आरक्षण मुक्त करण्याचे निर्णय घेतले जात असताना काही भूखंड दलाल डिमांड नोट काढून देण्याच्या नावावर पैसे उकळण्याचा गोरखधंदा करीत आहेत. आता सर्वांचे भूखंड नियमित होणार असल्यामुळे नागरिकांनी कुणालाही पैसे देऊ नये. थेट नासुप्रशी संपर्क करावा. - आ. कृष्णा खोपडे