शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमा विशेष: गुरुदेव सेवाश्रमाचा मानव कल्याणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 10:27 IST

गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.

ठळक मुद्देपरिवर्तनाचा विचार समाजात पेरला

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘गुरु हाडामांसाचा नोव्हे, गुरु नव्हे जाति-संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञानतत्त्वची आहे, अनुभवियांचे’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाडामांसाच्या व्यक्तीला गुरू समजून त्याची पूजा करण्यापेक्षा, त्याचे तत्त्वज्ञान जे सत्याच्या मार्गावर असेल त्याची पूजा करा, असे प्रबोधन केले आहे. गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामहितापासून राष्ट्रहितापर्यंतची संकल्पना मांडली आहे. महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सेवाभाव, राष्ट्रहित, मानवकल्याण हे विचार समाजात रुजविले आहे. राष्ट्रसंतांच्या या विचारांनी प्रभावित होऊन ते हयात असताना देशभरात ४० हजार शाखा स्थापन झाल्या होत्या. त्याकाळी सामान्यजनांपासून राज्यकर्तेही त्यांच्या विचारांचे पाईक होते. पण राष्ट्रसंतांनी गुरु म्हणून कुणालाही माळ घातली नाही आणि कानही फुंकले नाही. राष्ट्रसंतांनी गुरुला देव मानले. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला गुरुदेव असे नाव दिले. गुरुदेव मासिक, गुरुदेव विद्यामंदिर, श्रीगुरुदेव सेवाश्रम, श्री गुरुदेव आदर्श विवाह संस्था, श्री गुरुदेव सेवामंडळ या संस्था उभारल्या. राष्ट्रसंत या संस्थांबद्दल म्हणतात, या संस्था तुकडोजी महाराजांच्या चेल्याचपाट्यांच्या संस्था नाही, तर परिवर्तनाचा विचार आहे. खरोखरच राष्ट्रसंतांनी या संस्थांच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार समाजात पेरला.परंतु आज समाजात गुरुचे पीक आलेले दिसते. देवभोळे लोक गुरुच्या पूजनात धन्यता मानत आहे. त्यांचा गुरु कारागृहाच्या आत असला तरी, त्याच्या पूजनाचे भव्य सोहळे साजरे होत आहे. अंधश्रद्धेत समाजाला बुडविणाऱ्या गुरुंना राष्ट्रसंतांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. सोबतच ज्या व्यक्तीला आपण श्रद्धास्थानी पूजतो, त्या गुरुच्या विद्वत्तेची पारख करण्यास सांगितले आहे. गुरुबद्दलचे आजही हे तत्त्वज्ञान गुरुदेव सेवाश्रमातून प्रचारक समाजात रुजवित आहे. गुरुदेव सेवाश्रमात गुरुपूजन सोहळ्यात राष्ट्रसंतांचे पूजन न करता त्यांचे विचार पुजले जात आहे.राष्ट्रसंतांनी गुरुदेव या शब्दाची फोड ‘अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा’ अशी केली आहे. हे सत्कार्य करणाºया प्रत्येक व्यक्तीला गुरु मानले आहे. त्यामुळे गुरुदेव सेवाश्रमाशी जुळलेली सर्व मंडळी एकमेकांशी भेटल्यानंतर ‘जयगुरु’ असे संबोधतात. कारण प्रत्येक व्यक्ती ही महान असल्याचे ते समजतात.राष्ट्रसंतांपासून प्रभावित होऊन अनेकजण त्यांना गुरू करण्यास इच्छुक होते. पण तुकडोजी महाराज त्यांना वेडा असे संबोधून रोज प्रार्थना, ज्ञान करीत जा आणि त्यानुसार जगत जा, असा सल्ला द्यायचे. राष्ट्रसंतांचा हाच कित्ता आजही गुरुदेव सेवाश्रम, गुरुदेव सेवामंडळातून गिरविला जात आहे.- ज्ञानेश्वर रक्षक, उपसेवाधिकारी,श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा