शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गुरुपौर्णिमा विशेष: गुरुदेव सेवाश्रमाचा मानव कल्याणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 10:27 IST

गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.

ठळक मुद्देपरिवर्तनाचा विचार समाजात पेरला

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘गुरु हाडामांसाचा नोव्हे, गुरु नव्हे जाति-संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञानतत्त्वची आहे, अनुभवियांचे’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाडामांसाच्या व्यक्तीला गुरू समजून त्याची पूजा करण्यापेक्षा, त्याचे तत्त्वज्ञान जे सत्याच्या मार्गावर असेल त्याची पूजा करा, असे प्रबोधन केले आहे. गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामहितापासून राष्ट्रहितापर्यंतची संकल्पना मांडली आहे. महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सेवाभाव, राष्ट्रहित, मानवकल्याण हे विचार समाजात रुजविले आहे. राष्ट्रसंतांच्या या विचारांनी प्रभावित होऊन ते हयात असताना देशभरात ४० हजार शाखा स्थापन झाल्या होत्या. त्याकाळी सामान्यजनांपासून राज्यकर्तेही त्यांच्या विचारांचे पाईक होते. पण राष्ट्रसंतांनी गुरु म्हणून कुणालाही माळ घातली नाही आणि कानही फुंकले नाही. राष्ट्रसंतांनी गुरुला देव मानले. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला गुरुदेव असे नाव दिले. गुरुदेव मासिक, गुरुदेव विद्यामंदिर, श्रीगुरुदेव सेवाश्रम, श्री गुरुदेव आदर्श विवाह संस्था, श्री गुरुदेव सेवामंडळ या संस्था उभारल्या. राष्ट्रसंत या संस्थांबद्दल म्हणतात, या संस्था तुकडोजी महाराजांच्या चेल्याचपाट्यांच्या संस्था नाही, तर परिवर्तनाचा विचार आहे. खरोखरच राष्ट्रसंतांनी या संस्थांच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार समाजात पेरला.परंतु आज समाजात गुरुचे पीक आलेले दिसते. देवभोळे लोक गुरुच्या पूजनात धन्यता मानत आहे. त्यांचा गुरु कारागृहाच्या आत असला तरी, त्याच्या पूजनाचे भव्य सोहळे साजरे होत आहे. अंधश्रद्धेत समाजाला बुडविणाऱ्या गुरुंना राष्ट्रसंतांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. सोबतच ज्या व्यक्तीला आपण श्रद्धास्थानी पूजतो, त्या गुरुच्या विद्वत्तेची पारख करण्यास सांगितले आहे. गुरुबद्दलचे आजही हे तत्त्वज्ञान गुरुदेव सेवाश्रमातून प्रचारक समाजात रुजवित आहे. गुरुदेव सेवाश्रमात गुरुपूजन सोहळ्यात राष्ट्रसंतांचे पूजन न करता त्यांचे विचार पुजले जात आहे.राष्ट्रसंतांनी गुरुदेव या शब्दाची फोड ‘अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा’ अशी केली आहे. हे सत्कार्य करणाºया प्रत्येक व्यक्तीला गुरु मानले आहे. त्यामुळे गुरुदेव सेवाश्रमाशी जुळलेली सर्व मंडळी एकमेकांशी भेटल्यानंतर ‘जयगुरु’ असे संबोधतात. कारण प्रत्येक व्यक्ती ही महान असल्याचे ते समजतात.राष्ट्रसंतांपासून प्रभावित होऊन अनेकजण त्यांना गुरू करण्यास इच्छुक होते. पण तुकडोजी महाराज त्यांना वेडा असे संबोधून रोज प्रार्थना, ज्ञान करीत जा आणि त्यानुसार जगत जा, असा सल्ला द्यायचे. राष्ट्रसंतांचा हाच कित्ता आजही गुरुदेव सेवाश्रम, गुरुदेव सेवामंडळातून गिरविला जात आहे.- ज्ञानेश्वर रक्षक, उपसेवाधिकारी,श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा