शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST

भिवापूर: खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकरी शेताची मशागत, खते व बियाण्यांची खरेदी आदी कामात गुंतला आहे. अशात बियाणे ...

भिवापूर: खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकरी शेताची मशागत, खते व बियाण्यांची खरेदी आदी कामात गुंतला आहे. अशात बियाणे व खतांची खरेदी व वापर करताना योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांची फसगत होते. त्यामुळे उगवणशक्ती, बीज प्रक्रिया, रासायनिक खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रत्येक गावात कार्यशाळा घेतल्या जात आहे. यात शेतकरीबांधवांना खरीप हंगामाबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. तालुक्यातील वासी येथे अशाप्रकारच्या कार्यशाळेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामात कोणत्याही पिकाची पेरणी करताना नुकसान होऊ नये म्हणून बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे, बीजप्रक्रिया करणे, रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणे, उगवणशक्ती तपासून पेरणी करावी, बियाण्याला बुरशीनाशके व जीवाणू खते यांची बीजप्रक्रिया करावी, बियाण्यांची पेरणी बीबीएफ यंत्राद्वारे करावी, रासायनिक खतांचा वापर १० टक्के कमी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी श्याम गिरी यांनी रासायनिक खतांचा वापर १० टक्के कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. बियाण्यांची उगवणशक्ती तपासणीचे प्रात्यक्षिक कृषी सहायक एस.व्ही. मेंघरे यांनी तर बियाणास बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक पी.एस. कळसकर यांनी करून दाखवले. कृषी पर्यवेक्षक एस.बी. झाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला वासी येथील शेतकरीबांधव उपस्थित होते.

===Photopath===

290521\img-20210529-wa0079.jpg

===Caption===

वासी येथील शेतक-यांशी खरीप हंगामाबाबत मनमोकळ्या चर्चा करतांना तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे