शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

काँग्रेसच्या स्थापना दिवसातही गटबाजी

By admin | Updated: December 29, 2016 02:36 IST

काँग्रेसच्या स्थापना दिवशीही काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

राऊत, चतुर्वेदी अनुपस्थित : मोहन प्रकाश, चव्हाणांनाही एकजुटीत अपयश नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिवशीही काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांची पक्षाच्या स्थापना दिन कार्यक्रमातील गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. एकजुटीने महापालिकेची निवडणूक जिंकण्याचे आवाहन करणारे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना स्थानिक नेत्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यात अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळाले. गटबाजी अशीच कायम राहिली तर पक्षाचे कसे होणार, अशी चिंता कार्यकर्ते व्यक्त करीत होते. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीवरून माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिले असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. या मुद्यावरून त्यांच्या समर्थकांनीही शहर काँग्रेसच्या एकाही बैठकीला हजेरी लावलेली नाही. यातून चतुर्वेदी-राऊत एक गट आणि मुत्तेमवार, अनिस अहमद-विकास ठाकरे असा दुसरा गट असे चित्र निर्माण झाले आहे. गटबाजीतून नागपुरात गांधी जयंतीचे दोन कार्यक्रम झाले. मुत्तेमवारांनी व्हेरायटी चौकात तर राऊत-चतुर्वेदी यांनी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम घेतला. नोटाबंदीवरील आंदोलनेही वेगवेगळी झाली. देशपांडे सभागृहात नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून माजी मंत्री विलास मुत्तेमवार, अनिस अहमद व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची नावे वगळण्यात आली होती. शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेत मात्र नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांची नावे टाकण्यात आली. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्यामुळे राऊत, चतुर्वेदी येतील अशी अपेक्षा होती. मात्र, तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात तीन मिनिटांसाठीही हे दोन्ही नेते आले नाही. याची एकच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्यासाठी राऊत व चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी) चव्हाणांचे एकजुटीचे आवाहन माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे या गटबाजीकडे लक्ष वेधले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी एकजूट दाखवा. दोन वर्षे जोमाने काम करा. लोकसभा व विधानसभाही जिंका, असे आवाहन केले. चव्हाणांचे एकजुटीचे आवाहन नेमके कुणासाठी होते, असा प्रश्न या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पडला.