शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेसच्या स्थापना दिवसातही गटबाजी

By admin | Updated: December 29, 2016 02:36 IST

काँग्रेसच्या स्थापना दिवशीही काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

राऊत, चतुर्वेदी अनुपस्थित : मोहन प्रकाश, चव्हाणांनाही एकजुटीत अपयश नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिवशीही काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांची पक्षाच्या स्थापना दिन कार्यक्रमातील गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. एकजुटीने महापालिकेची निवडणूक जिंकण्याचे आवाहन करणारे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना स्थानिक नेत्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यात अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळाले. गटबाजी अशीच कायम राहिली तर पक्षाचे कसे होणार, अशी चिंता कार्यकर्ते व्यक्त करीत होते. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीवरून माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिले असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. या मुद्यावरून त्यांच्या समर्थकांनीही शहर काँग्रेसच्या एकाही बैठकीला हजेरी लावलेली नाही. यातून चतुर्वेदी-राऊत एक गट आणि मुत्तेमवार, अनिस अहमद-विकास ठाकरे असा दुसरा गट असे चित्र निर्माण झाले आहे. गटबाजीतून नागपुरात गांधी जयंतीचे दोन कार्यक्रम झाले. मुत्तेमवारांनी व्हेरायटी चौकात तर राऊत-चतुर्वेदी यांनी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम घेतला. नोटाबंदीवरील आंदोलनेही वेगवेगळी झाली. देशपांडे सभागृहात नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून माजी मंत्री विलास मुत्तेमवार, अनिस अहमद व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची नावे वगळण्यात आली होती. शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेत मात्र नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांची नावे टाकण्यात आली. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्यामुळे राऊत, चतुर्वेदी येतील अशी अपेक्षा होती. मात्र, तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात तीन मिनिटांसाठीही हे दोन्ही नेते आले नाही. याची एकच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्यासाठी राऊत व चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी) चव्हाणांचे एकजुटीचे आवाहन माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे या गटबाजीकडे लक्ष वेधले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी एकजूट दाखवा. दोन वर्षे जोमाने काम करा. लोकसभा व विधानसभाही जिंका, असे आवाहन केले. चव्हाणांचे एकजुटीचे आवाहन नेमके कुणासाठी होते, असा प्रश्न या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पडला.