शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

हिरवळ ३३ टक्के तर वनक्षेत्र १८ चौ. किमी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे ...

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता हळूहळू आपला सन्मान गमावेल अशी भीती व्यक्त होत आहे. कारण स्थिती तसेच चित्र दाखवत आहे. नागपूर शहराचे ग्रीन कव्हर तब्बल ३३ टक्क्यांनी घटले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.६२ चौरस किलोमीटरची घट झाली आहे. अशात वाढते प्रदूषण आणि तापमान माणसांसाठी तापदायक ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

२००० सालापासून नागपूरच्या केंद्रबिंदूपासून ते ३० किमीच्या परिघात असलेल्या वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ. किमी वनक्षेत्र होते. २०१३ पर्यंत ते ९१ चौ. किमीवर आले तर २०१८-१९ पर्यंत ते ७४ चौ. किमीपर्यंत खाली घसरले. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०१७ नंतर २०१९-२० मध्ये जिल्ह्याच्या वनक्षेत्रात १८.६२ चौ. किमीची घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. आता केवळ वनक्षेत्र घटण्याची चिंता राहिली नाही तर प्रदूषणात झालेली भरमसाट वाढ आणि तापमानात होणारी वाढ हेही चिंतेचे कारण ठरत आहे.

विकसित शहर म्हणून भरमसाट चालणाऱ्या बांधकाम कार्याने धूलिकणांच्या प्रदूषणात कित्येक पटीने वाढ झाली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या अहवालानुसार धूलिकणांच्या प्रदूषणात ५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशात हिरवळ कमी झाल्याने तापमानातही २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवेची गुणवत्ता ६०-७० च्या आसपास असणे अपेक्षित असताना मुंबई, पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांची पातळी गेल्या काही वर्षांत १५० च्या पार गेली. शहरातील तलावांची स्थितीसुद्धा दयनीय झाली आहे. शहरात कधीतरी असलेल्या १६ तलावांपैकी केवळ पाच तलाव सुस्थितीत आहेत व त्यातील काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काही गमावत चालल्याची चिंता करावी लागणार आहे.

२०२० पासून कोरोना महामारीच्या प्रकोपाचा काळ मानवासाठी भयावह आठवणी देणारा ठरला असला तरी पर्यावरणाबाबत दिलासा देणारा ठरला. या महामारीने जगाला थांबविले आणि प्रदूषणालाही खाली आणले. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जे शक्य झाले नाही ते कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले. प्रदूषणाचा स्तर अनेक वर्षांच्या नीचांकीवर आला होता. एक प्रकारे पृथ्वीचा व पर्यावरणाचा जीर्णोद्धारच होण्याच्या मार्गावर होता. मात्र पुन्हा सर्व पूर्ववत होत असताना प्रदूषणाची स्थितीही जैसे थे होत आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी लॉकडाऊनसारख्या पर्यायावर विचार करावा लागेल. वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांच्या मते राज्यातील १८ शहरांसाठी ‘क्लीन एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे.