शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

हिरवळ ३३ टक्के तर वनक्षेत्र १८ चौ. किमी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे ...

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता हळूहळू आपला सन्मान गमावेल अशी भीती व्यक्त होत आहे. कारण स्थिती तसेच चित्र दाखवत आहे. नागपूर शहराचे ग्रीन कव्हर तब्बल ३३ टक्क्यांनी घटले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.६२ चौरस किलोमीटरची घट झाली आहे. अशात वाढते प्रदूषण आणि तापमान माणसांसाठी तापदायक ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

२००० सालापासून नागपूरच्या केंद्रबिंदूपासून ते ३० किमीच्या परिघात असलेल्या वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ. किमी वनक्षेत्र होते. २०१३ पर्यंत ते ९१ चौ. किमीवर आले तर २०१८-१९ पर्यंत ते ७४ चौ. किमीपर्यंत खाली घसरले. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०१७ नंतर २०१९-२० मध्ये जिल्ह्याच्या वनक्षेत्रात १८.६२ चौ. किमीची घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. आता केवळ वनक्षेत्र घटण्याची चिंता राहिली नाही तर प्रदूषणात झालेली भरमसाट वाढ आणि तापमानात होणारी वाढ हेही चिंतेचे कारण ठरत आहे.

विकसित शहर म्हणून भरमसाट चालणाऱ्या बांधकाम कार्याने धूलिकणांच्या प्रदूषणात कित्येक पटीने वाढ झाली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या अहवालानुसार धूलिकणांच्या प्रदूषणात ५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशात हिरवळ कमी झाल्याने तापमानातही २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवेची गुणवत्ता ६०-७० च्या आसपास असणे अपेक्षित असताना मुंबई, पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांची पातळी गेल्या काही वर्षांत १५० च्या पार गेली. शहरातील तलावांची स्थितीसुद्धा दयनीय झाली आहे. शहरात कधीतरी असलेल्या १६ तलावांपैकी केवळ पाच तलाव सुस्थितीत आहेत व त्यातील काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काही गमावत चालल्याची चिंता करावी लागणार आहे.

२०२० पासून कोरोना महामारीच्या प्रकोपाचा काळ मानवासाठी भयावह आठवणी देणारा ठरला असला तरी पर्यावरणाबाबत दिलासा देणारा ठरला. या महामारीने जगाला थांबविले आणि प्रदूषणालाही खाली आणले. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जे शक्य झाले नाही ते कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले. प्रदूषणाचा स्तर अनेक वर्षांच्या नीचांकीवर आला होता. एक प्रकारे पृथ्वीचा व पर्यावरणाचा जीर्णोद्धारच होण्याच्या मार्गावर होता. मात्र पुन्हा सर्व पूर्ववत होत असताना प्रदूषणाची स्थितीही जैसे थे होत आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी लॉकडाऊनसारख्या पर्यायावर विचार करावा लागेल. वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांच्या मते राज्यातील १८ शहरांसाठी ‘क्लीन एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे.