शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

हिरवळ ३३ टक्के तर वनक्षेत्र १८ चौ. किमी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे ...

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता हळूहळू आपला सन्मान गमावेल अशी भीती व्यक्त होत आहे. कारण स्थिती तसेच चित्र दाखवत आहे. नागपूर शहराचे ग्रीन कव्हर तब्बल ३३ टक्क्यांनी घटले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.६२ चौरस किलोमीटरची घट झाली आहे. अशात वाढते प्रदूषण आणि तापमान माणसांसाठी तापदायक ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

२००० सालापासून नागपूरच्या केंद्रबिंदूपासून ते ३० किमीच्या परिघात असलेल्या वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ. किमी वनक्षेत्र होते. २०१३ पर्यंत ते ९१ चौ. किमीवर आले तर २०१८-१९ पर्यंत ते ७४ चौ. किमीपर्यंत खाली घसरले. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०१७ नंतर २०१९-२० मध्ये जिल्ह्याच्या वनक्षेत्रात १८.६२ चौ. किमीची घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. आता केवळ वनक्षेत्र घटण्याची चिंता राहिली नाही तर प्रदूषणात झालेली भरमसाट वाढ आणि तापमानात होणारी वाढ हेही चिंतेचे कारण ठरत आहे.

विकसित शहर म्हणून भरमसाट चालणाऱ्या बांधकाम कार्याने धूलिकणांच्या प्रदूषणात कित्येक पटीने वाढ झाली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या अहवालानुसार धूलिकणांच्या प्रदूषणात ५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशात हिरवळ कमी झाल्याने तापमानातही २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवेची गुणवत्ता ६०-७० च्या आसपास असणे अपेक्षित असताना मुंबई, पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांची पातळी गेल्या काही वर्षांत १५० च्या पार गेली. शहरातील तलावांची स्थितीसुद्धा दयनीय झाली आहे. शहरात कधीतरी असलेल्या १६ तलावांपैकी केवळ पाच तलाव सुस्थितीत आहेत व त्यातील काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काही गमावत चालल्याची चिंता करावी लागणार आहे.

२०२० पासून कोरोना महामारीच्या प्रकोपाचा काळ मानवासाठी भयावह आठवणी देणारा ठरला असला तरी पर्यावरणाबाबत दिलासा देणारा ठरला. या महामारीने जगाला थांबविले आणि प्रदूषणालाही खाली आणले. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जे शक्य झाले नाही ते कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले. प्रदूषणाचा स्तर अनेक वर्षांच्या नीचांकीवर आला होता. एक प्रकारे पृथ्वीचा व पर्यावरणाचा जीर्णोद्धारच होण्याच्या मार्गावर होता. मात्र पुन्हा सर्व पूर्ववत होत असताना प्रदूषणाची स्थितीही जैसे थे होत आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी लॉकडाऊनसारख्या पर्यायावर विचार करावा लागेल. वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांच्या मते राज्यातील १८ शहरांसाठी ‘क्लीन एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे.