शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

हिरवळ ३३ टक्के तर वनक्षेत्र १८ चौ. किमी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे ...

नागपूर : मेट्रो सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीवर पर्यावरणाचे संकट घोंगावू लागले आहे. कधी काळी हरित शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता हळूहळू आपला सन्मान गमावेल अशी भीती व्यक्त होत आहे. कारण स्थिती तसेच चित्र दाखवत आहे. नागपूर शहराचे ग्रीन कव्हर तब्बल ३३ टक्क्यांनी घटले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.६२ चौरस किलोमीटरची घट झाली आहे. अशात वाढते प्रदूषण आणि तापमान माणसांसाठी तापदायक ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

२००० सालापासून नागपूरच्या केंद्रबिंदूपासून ते ३० किमीच्या परिघात असलेल्या वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. १९९९ साली या परिघात ११६ चौ. किमी वनक्षेत्र होते. २०१३ पर्यंत ते ९१ चौ. किमीवर आले तर २०१८-१९ पर्यंत ते ७४ चौ. किमीपर्यंत खाली घसरले. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०१७ नंतर २०१९-२० मध्ये जिल्ह्याच्या वनक्षेत्रात १८.६२ चौ. किमीची घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. आता केवळ वनक्षेत्र घटण्याची चिंता राहिली नाही तर प्रदूषणात झालेली भरमसाट वाढ आणि तापमानात होणारी वाढ हेही चिंतेचे कारण ठरत आहे.

विकसित शहर म्हणून भरमसाट चालणाऱ्या बांधकाम कार्याने धूलिकणांच्या प्रदूषणात कित्येक पटीने वाढ झाली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या अहवालानुसार धूलिकणांच्या प्रदूषणात ५६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. अशात हिरवळ कमी झाल्याने तापमानातही २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवेची गुणवत्ता ६०-७० च्या आसपास असणे अपेक्षित असताना मुंबई, पुणे, नागपूरसह इतर प्रमुख शहरांची पातळी गेल्या काही वर्षांत १५० च्या पार गेली. शहरातील तलावांची स्थितीसुद्धा दयनीय झाली आहे. शहरात कधीतरी असलेल्या १६ तलावांपैकी केवळ पाच तलाव सुस्थितीत आहेत व त्यातील काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप काही गमावत चालल्याची चिंता करावी लागणार आहे.

२०२० पासून कोरोना महामारीच्या प्रकोपाचा काळ मानवासाठी भयावह आठवणी देणारा ठरला असला तरी पर्यावरणाबाबत दिलासा देणारा ठरला. या महामारीने जगाला थांबविले आणि प्रदूषणालाही खाली आणले. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर जे शक्य झाले नाही ते कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले. प्रदूषणाचा स्तर अनेक वर्षांच्या नीचांकीवर आला होता. एक प्रकारे पृथ्वीचा व पर्यावरणाचा जीर्णोद्धारच होण्याच्या मार्गावर होता. मात्र पुन्हा सर्व पूर्ववत होत असताना प्रदूषणाची स्थितीही जैसे थे होत आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी लॉकडाऊनसारख्या पर्यायावर विचार करावा लागेल. वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांच्या मते राज्यातील १८ शहरांसाठी ‘क्लीन एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ची योग्य अंमलबजावणी गरजेची आहे.