शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेला मिळणार ‘ग्रीन सिग्नल’?

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेला गुरुवारी हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूर विद्यापीठ : विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णयाची शक्यतानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेला गुरुवारी हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित परीक्षा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमांच्या विरुद्ध असल्याचा आक्षेप परीक्षा नियंत्रकांनी घेतला होता. परंतु राज्य सरकारने दिलेले निर्देश व उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका यामुळे ही परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाची तयारी असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.प्रवेशबंदी असताना ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे २३ जून रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतु विशेष परीक्षेचे आयोजन केल्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे कशाप्रकारे उल्लंघन होऊ शकते, अशी भूमिका घेऊन काही सदस्यांनी परीक्षेला आक्षेप घेतला. परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी नियमांनुसार विशेष परीक्षेची तरतूदच नसल्याचे स्पष्ट करीत याला विरोध केला होता. त्यानंतर विद्वत परिषदेची बैठक गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली होती. प्रवेशबंदीच्या यादीमधल्या ६३ महाविद्यालयांतील ६६१६ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गुरुवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत पुनर्विचार करण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी मंगळवारी दिले होते. याप्रकरणावर १ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता पुढील सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्वत परिषदेच्या बैठकीत सर्वसंमतीने पारित निर्णय न्यायालयात सादर करायचा आहे. संस्थाचालकांचा दबावदरम्यान, विद्यापीठाने विशेष परीक्षा घ्यावी याकरिता संस्थाचालकांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे संस्थाचालक विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना भेटून वारंवार यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करीत आहेत. त्यांनी गुरुवारी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले. ही भेट होऊ शकली की नाही याची माहिती उपलब्ध झाली नाही. (प्रतिनिधी)