शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

‘सहकारा’च्या गवताने विकासाची हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:44 IST

पारंपरिक शेती आता शेतकºयांना परवडण्यासारखी राहिली नाही, काहीतरी नावीन्यपूर्ण करावे, असे वारंवार शेतीतज्ज्ञांकडून, शासनाकडूनसुद्धा सांगण्यात येते.

ठळक मुद्देअरोली होतेय समृद्ध : जिल्ह्यात चारा उत्पादनाचा पहिला प्रयोग

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारंपरिक शेती आता शेतकºयांना परवडण्यासारखी राहिली नाही, काहीतरी नावीन्यपूर्ण करावे, असे वारंवार शेतीतज्ज्ञांकडून, शासनाकडूनसुद्धा सांगण्यात येते. ही आवाहने स्वीकारण्यास मुळात शेतकरीच धजावत नाही. पण एखादा पाठीराखा मिळाला तर शेतकरीही आपले कसब दाखवायला तयार असतात. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली येथील शेतकºयांना एक मार्गदर्शक, पाठीराखा भेटला. एक दोन नव्हेत तर ४५ शेतकºयांनी त्याने दाखविलेल्या मार्गावर पाऊल ठेवले. यातून सामूहिक शेती फुलली, त्याचे फळ आता शेतकºयांनाच मिळत आहे.शेतकºयांचे हे मार्गदर्शक कोण तर निवृत्त झालेले विमा कंपनीचे अधिकारी डॉ. उल्हास निमकर, निवृत्त अतिरिक्त आयुक्त डॉ. जगदीश कुरळकर, मनपाचे निवृत्त कर अधिकारी शिवनाथ बन्सोड होत. हे तिघेही अरोली या गावाचे. निवृत्तीनंतर व्यवस्थित सेटल झालेले, परंतु त्यांची नाळ ही गावातील शेतीशी आणि गावकºयांशी आजही जुळलेली आहे. हीच जाणीव ठेवत आणि गावाच्या विकासाचे ध्येय बाळगत हे तिघेही मित्र एकत्र आले. शेती, शेतकºयांची परिस्थिती आणि गावाचा विकास यावर अभ्यास करून, शेतकºयांना शेती कशी किफायतशीर ठरेल, याचे प्रयत्न सुरू झाले. शेतकरी तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा अडते, दलाल हे उत्पादक ते ग्राहकांदरम्यान राहणार नाही. याच संकल्पनेवर त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जनावरांसाठी प्रोटीनयुक्त चारा निर्मिती करण्याचे ठरविले. त्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, मार्केटचे सर्वेक्षण, गावकºयांची मानसिकता बदलविण्यासाठी संबोधन, गावकºयांचा फिल्ड सर्वे, शेतीचे व्यवस्थापन आदी सर्व गोष्टी जुळवून आणल्या. त्यासाठी शिबिर घेतले, गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. स्वयंसेवी संस्था उघडली. यातून एक, दोन नव्हे तर ४५ शेतकरी पुढे आले.आपल्या शेतीतील कुणी एक एकर, कुणी दीड एकर अशी शेती या प्रयोगासाठी उपलब्ध करून दिली. जनावरांसाठी पोषक असलेले आफ्रिकेतील हायब्रिड नेफिअर डीएचएन-१० या गवताच्या ५.५ लाख रुपयांच्या बेण्या भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान येथून मागविण्यात आल्या. सॉईल टेस्टिंग लॅब तयार करण्यात आली. जमिनीची मशागत करून, या बेण्या लावण्यात आल्या. गवत मोठे झाले, शासनाकडून सबसिडीवर गावकºयांना चॉपर मशीन उपलब्ध करून दिल्या. डॉ. निमकर यांनी स्वत: गाई,म्हशी पाळणाºयांचा एक समूह तयार केला.दसºयापासून खºया अर्थाने व्यवसाय सुरू झाला. गाई, म्हशी पाळणाºयांना ताजा चारा केवळ सहा रुपये किलोने शेतकरी घरपोच उपलब्ध करून देतात. गेल्या दीड ते दोन महिन्यातच पाच ते सहा टन चारा दररोज गुराख्यांना पुरविला जातो. शेतकºयांना त्याचे रोख पैसेही मिळतात. या चाºयाचे वर्षाला प्रति एकर १०० टन उत्पादन होते. चाºयाच्या शेतीला कीड लागत नाही. त्यामुळे कुठलीही फवारणी करावी लागत नाही. मशागतीचासुद्धा खर्च कमी आहे. त्यामुळे प्रति एकरी एक लाख रुपये शेतकºयांना मिळवून देणारे हे पीक आहे. या चाºयाचे गाई पाळणाºयांनाही चांगले निकाल मिळत आहे. ‘सरकी आणि ढेप’ च्या तुलनेत चाºयाची किंमतही कमी आहे. त्यामुळे या चाºयाला गुराख्यांकडून प्रतिसाद मिळतो आहे.या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत, समूह शेतीच्या माध्यमातून अरोलीच्या शेतकºयांना आर्थिक बळ मिळत आहे.माझ्या गावचा शेतकरी सधन व्हावागाव आणि शेतीशी नाळ जुळली असल्यामुळे निवृत्तीनंतर आपले अनुभव कामात यावे आणि गावाची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने आम्ही संकल्प केला आहे. एक रुपयाही शेतकºयांच्या व्यवसायातला आम्हाला नको आहे. फक्त आमच्या गावचा शेतकरी सधन व्हावा, हीच अपेक्षा आहे.- डॉ. उल्हास निमकर, निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स