शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ग्रामीण भागात वाढतोय लसीकरणाचा आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये जनजागृती घडविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामसंवादातून जनजागृती साधत अधिकाऱ्यांनी नागरिकांना ...

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये जनजागृती घडविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामसंवादातून जनजागृती साधत अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटून मार्गदर्शन केले आणि गैरसमज दूर करून लसीकरण वाढविण्यावर भर दिला.

रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामभेटीतून प्रबोधन, वृक्षलागवड, पथनाट्य, जनजागृती, क्षेत्रीय भेटी साधण्यात आल्या. प्रत्यक्ष संवादावर भर देऊन गावकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. रामटेक तालुक्याअंतर्गत नवरगाव फुलझरी पुनर्वसन, संग्रामपूर पुनर्वसन, पुसदा पुनर्वसन, आरोग्य केंद्र हिवरा बाजार, करवाई, बेलदा आश्रमशाळा तसेच पारशिवनी तालुक्यात किरंगीसर्रा गावांना भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार योगेश कुंभेजकर, उपवन संरक्षक शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत गावांमध्ये भेटी देऊन पहाणी करण्यात आली. यात शाळा व आश्रमशाळांना भेटी, जनसंपर्क, वृक्षलागवड, लसीकरण मार्गदर्शन, पाणी, स्वच्छता, शंकासमाधान, वैयक्तिक स्च्छता, परिसर स्वच्छता, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांच्या आणि भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य शांताबाई कुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भूयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अनिल किटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हेमके यांच्यासह अन्य अधिकारी तसेच रामटेक व पारशिवणीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.