शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

ग्रामसेवकच गावाच्या विकासाचा खरा ‘हिरो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 02:38 IST

जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी आतापर्यंत अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडली आहे. इंदिरा आवास योजना असो की स्वच्छ भारत अभियान, नागपूर नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

शिवाजी जोंधळे : आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान नागपूर : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी आतापर्यंत अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडली आहे. इंदिरा आवास योजना असो की स्वच्छ भारत अभियान, नागपूर नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आम्ही केवळ मॉनिटरिंग करण्याचे काम करीत असून, गावाच्या विकासाचा खरा ‘हिरो’ हा ग्रामसेवक असल्याचे गौरवोद्गार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काढले. नागपूर जिल्हा परिषदेच्यावतीने रविवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. काटोल रोडवरील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर होत्या. मंचावर अतिथी म्हणून शिक्षण सभापती उकेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.यानंतर जि.प.अध्यक्षा निशा सावरकर व जोंधळे यांच्या हस्ते एकूण ९५ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार प्रदान करून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. जोंधळे पुढे म्हणाले, ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे सुरू झाली आहेत. पूर्वी ज्या गावांमध्ये राजकीय पुढारी असेल, तेथेच ग्रामपंचायत भवन किंवा स्मशानभूमी तयार होत असे. परंतु आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक गावात ग्रामपंचायत भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात जिल्ह्यातील १७१ गावांत ग्रामपंचायत भवन बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गावांच्या विकासासाठी भरपूर निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो निधी योग्य कसा खर्च होईल, याची ग्रामसेवकांवर जबाबदारी वाढली आहे. ग्रामसेवकांना अत्यंत पारदर्शकपणे काम करावे लागणार आहे. नरेगाच्या माध्यमातून सध्या १६५ गावांमध्ये काँक्रिटच्या रोडचे काम सुरू झाले आहे. अशाप्रकारे भविष्यात नागपूर जिल्हा एक विकासाचे चांगले मॉडेल ठरू शकते, असा आशावाद त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)आदर्श पुरस्काराचे मानकरी विशेष म्हणजे, मागील १० वर्षांपासून आदर्श ग्रामसेवक या पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमात मागील २००५-०६ ते २०१३-१४ पर्यंत या पुरस्कारासाठी निवड झालेल्या ९५ ग्रामसेवकांना तो प्रदान करण्यात आला. यात प्रामुख्याने एम. झेड़ देशमुख, आर. आर. रहाटे, एस. बी. केचे, हितेंद्र फुले, रतन शृंगारे, किशोर अलोणे, प्रमोद वऱ्हाडे, बाबूराव कठाणे, गुणवंता चिमोटे, शैलेंद्र टेंभूर्णे, एन. जी. शेळके, व्ही. जी. मस्के, पी. के. लोलूसरे, दिलीप टेंभेकर, छात्रपाल पटले, एस. पी. पिसे, चिंतामण बेलेकर, शरद मुंगे, देवेंद्र खडसे व एम. आर. भोयर यांच्यासह आदींचा समावेश होता.