शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

पदवीधरच्या मतदानाने गाठला फर्स्ट क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील यंदा विक्रमी मतदान झाले. मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३४.७० टक्के मतदान झाले होते. यंदा मतदारांची संख्या घटली असली तरी मतदानाची टक्केवारी २९.६८ टक्क्यांनी वाढली.

मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जारी करण्यात आली नव्हती. परंतु मतदानाचा आकडा ५५ टक्क्यांहून अधिक असेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या अपेक्षेहून पुढे जात मतदान झाले व मतदानाची अंतिम आकडेवारी ६४.३८ टक्के इतकी होती. एकूण पुरुष मतदारांपैकी ६९.४१ टक्के मतदारांनी मतदान केले तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५६.६२ इतकी होती.

गडचिरोलीत दुप्पट मतदान

मतदानाची सर्वाधिक टक्केवारी भंडारा जिल्ह्यात राहिली. तेथे ७२.५६ टक्के मतदारांनी मतदान केले. त्या खालोखाल गडचिरोली जिल्ह्यात ७२.३७ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये गडचिरोलीत ३५.८६ टक्के मतदान झाले होते. मागील वेळच्या तुलनेत यंदा तेथे मतदानाची टक्केवारी दुप्पट आहे. सर्वात कमी ६०.८८ टक्के मतदान नागपूर जिल्ह्यात झाले.

मतदानवाढीची कारणे काय

२०१४ च्या निवडणुकीत २ लाख ८८ हजार ३२३ मतदारांपैकी १ लाख ७३ हजार जणांनी मतदान केले होते. ती टक्केवारी ३४.७० टक्के इतकी होती. यंदा नवीन नोंदणीत मतदारांची संख्या घटून २ लाख ६ हजार ४५४ इतकी झाली. त्यापैकी १ लाख ३२ हजार ९२३ म्हणजेच ६४.३८ टक्के मतदारांनी मतदान केले. यंदा मागील वेळच्या तुलनेत टक्केवारी व आकडा दोन्हीही वाढले. विविध उमेदवार व पक्षांनी यंदा नोंदणी झालेल्या मतदारांशी संपर्कावर जास्त भर दिला होता. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांशी संपर्क सुरू होता. मतदानाच्या दिवशीदेखील त्यांना मतदान केले की नाही याची आठवण करून दिली जात होती. शिवाय सोशल मीडियावरदेखील प्रचार व जागृती दोन्ही सुरू होते. यामुळे यंदा मतदान वाढल्याचे दिसून येत आहे.

उमेदवारांची धाकधूक वाढली

यंदा नव्याने नोंदणी झाली असूनदेखील मतदारांची संख्या घटली. त्यामुळे नेमके किती मतदान होते याकडे उमेदवारांचे डोळे होते. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. टक्केवारी वाढल्याने चुरसदेखील वाढणार असून आता निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदानाची टक्केवारी

जिल्हामतदान (२०२०) मतदान (२०१४)

नागपूर ६०.८८ % ३७.४७ %

भंडारा ७२.५६ % ४४.२७ %

गोंदिया ६३.६८ % ४३.७३ %

वर्धा ६५.३२ % २६.२७ %

चंद्रपूर ६७.४७ % ३२.१४ %

गडचिरोली ७२.३७ % ३५.८६ %

एकूण ६४.३८ % ३४.७० %

वर्षनिहाय मतदानाची टक्केवारी

वर्षमतदान

२००८ ५२ %

२०१४ ३४.७० %

२०२० ६४.३८ %