शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

‘अ’ श्रेणीचा दर्जा हवाच

By admin | Updated: August 28, 2015 03:10 IST

पात्रतेचा सर्व अटी पूर्ण करूनही दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला नाही.

संघटनांचा वाढता दबाव : शासनाने दखल घ्यावीनागपूर : पात्रतेचा सर्व अटी पूर्ण करूनही दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला नाही. तेव्हा दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात लोकमतने पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या या पुढाकारास आंबेडकरी जनतेसह विविध संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज विविध संघटनांतर्फे यासंदर्भात मागणी केली जात आहे. संवेदनशीलता दाखवावी मानवाला हजारो वर्षांच्या धार्मिक गुलामगिरीतून तथा शोषणातून मुक्त करून, त्याला समानतेचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या दीक्षाभूमीला अ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करा, अशी मराठा सेवा संघातर्फे आम्ही मागणी करीत आहोत. जगातून सर्वच ठिकाणावरून अनेक लोक दीक्षाभूमीवर येऊन समानता व मानवतेचा संदेश घेऊन जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवरून सर्व जगाला धम्मचक्रक्रांतीचा प्रकाश दिला. जागतिक महत्त्व लक्षात घ्यावे दीक्षाभूमीचे महत्त्व हे देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते जागतिक बौद्धांचे केंद्र बनले आहे. दीक्षाभूमीचे हे जागतिक महत्त्व लक्षात घेण्याची गरज आहे. दीक्षाभूमीला कुठल्याही श्रेणीत बसवता येणार नाही, मात्र शासन दरबारी त्याची श्रेणी ठरवली जात असेल तर ती ‘अ’ श्रेणीचीच असायला हवी. तेव्हा यासंदर्भात शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा व ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा. नरेश वाहाणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मुव्हमेंट ‘अ’ श्रेणीच हवी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र दीक्षाभूमीवर ऐतिहासिक धम्मक्रांती घडवली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी जागतिक कीर्तीचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचाच दर्जा हवा. आजपर्यंतच्या सरकारने जे काम केले नाही ते सध्याच्या सरकारने केले, त्याचे स्वागत आहेच. परंतु दीक्षाभूमीचे एकूण महत्त्व लक्षात घेऊन राज्य सराकरने दीक्षाभूमीला अ श्रेणीचाच दर्जा द्यायला हवा. तेव्हा शासनाने यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा. प्रकाश रामटेके, केंद्रीय अध्यक्ष - दलित पँथर भारतातीलच नव्हे तर जगाच्या विविध प्रांतामधील दलित समाजाला मानवतेच्या पातळीवर आणण्याचे कार्य याच भूमीवर झाले. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचे पर्यटन स्थळ घोषित करावे. सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीला सुद्धा अ श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन त्याचा सुद्धा विकास सरकारने करावा. -विजयकुमार शिंदे, मराठा सेवा संघ